शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

रंगभूमीवर लवकर अवतरलो असतो तर...‘नटसम्राटा’ची खंत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:37 IST

पुणे : “श्रीराम आयुष्यात खूप समाधानी होते. शेवटच्या दिवसात फक्त मला तुमच्यासारखं बरं कधी होता येईल असं ते म्हणत. ...

पुणे : “श्रीराम आयुष्यात खूप समाधानी होते. शेवटच्या दिवसात फक्त मला तुमच्यासारखं बरं कधी होता येईल असं ते म्हणत. पण त्यांची कोणतीच इच्छा अपूर्ण राहिली नव्हती. त्यांना जसं आयुष्य जगायचं होतं तसंच ते जगले. कदाचित नाटक किंवा अभिनयाकडे लवकर वळलो असतो तर, असं कधीतरी त्यांना वाटलं असेल. कारण ते अभिनयाकडे पुन्हा वळले तेव्हा ते ४३ वर्षांचे होते. लवकर आलो असतो तर? कदाचित वेगळी नाटके करायला मिळाली असती ही भावना त्यांच्या मनात कधीतरी आलेली असू शकते,” ही आठवण सांगत होत्या डॉ. श्रीराम लागू यांच्या पत्नी दीपा श्रीराम.

गुरुवारी (१७ डिसेेंबर) डॉ. श्रीराम लागू यांचा प्रथम स्मृतिदिन आहे. या निमित्ताने त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, “वेताळ टेकडीवर डॉ. श्रीराम लागू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लावण्यात आलेलं रोपटं म्हणजे त्यांची एक आठवण आहे. हा ‘स्मृतिवृक्ष’ बहरल्यानंतर त्याच्याभोवती एक चवथरा केल्यास लोक तिथं बसून नाटकाविषयी गप्पागोष्टी शकतील. लोकांसाठी हे प्रेरणादायी स्थळ व्हावं.” अशी अपेक्षा दीपा श्रीराम यांनी व्यक्त केली.

रंगभुमीवरचे अनभिषिक्त ‘नटसम्राट’ डॉ. लागू वास्तववादी जीवनात कायमच सामान्य माणसाच्याच भूमिकेत वावरले. ज्या वेताळ टेकडीवर ते फिरायला जात तिथे एका बाकावर शांतपणे बसलेली डॉ. लागू यांची मुद्रा पुणेकरांच्या सवयीची झाली होती. त्यांच्या आठवणी जागवणारा तो ‘बाक’ यापुढंही सर्वांच्या स्मरणात राहावा यासाठी डॉ. लागू यांच्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींनी त्यांच्या निधनानंतर त्या ठिकाणी स्मृतिवृक्षाचे रोपण केले. आज वर्षभरानंतर ते रोपटे बहरून आले आहे.

डॉ. लागूंच्या स्मृतीदिनी कोथरुड येथील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय)च्या म्हणजेच वेताळ टेकडीवर लागू कुटुंबीयांसह काही मोजकी मंडळी सायंकाळी पाच वाजता एकत्रित जमणार आहेत. परंतु आम्ही कोणत्याही स्मृती कार्यक्रमाचे आयोजन केले नसल्याचे दीपा श्रीराम म्हणाल्या.

चौकट

नटसम्राट, हिमालयाची सावली यासारखी अनेक नाटके डॉ. श्रीराम लागू यांनी अजरामर केली. ही नाटके नव्या पिढीसाठी पुनश्च: रंगमंचावर यावीत अशी रसिकांची इच्छा आहे याबद्दल दीपा श्रीराम यांनी आनंद व्यक्त केला. डॉ श्रीराम हे हयातीत असताना ही नाटके रंगमंचावर आणण्याबाबत त्यांचा कधीच आक्षेप नव्हता. कुणाला जर त्यांची नाटके करावीशी वाटली तर ही खूप चांगली गोष्ट आहे. ही छान कल्पना असल्याचे त्या म्हणाल्या.