शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

“मी बाबासाहेबांना साष्टांग नमस्कार करतो...”

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “मी बाबासाहेबांना साष्टांग नमस्कार करतो. त्यांनी शिवाजी महाराजांचा जो आदर्श उभा केला आहे आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “मी बाबासाहेबांना साष्टांग नमस्कार करतो. त्यांनी शिवाजी महाराजांचा जो आदर्श उभा केला आहे आणि जी शिकवण दिली आहे. त्याचे आचरण करण्याची शक्ती परमेश्वराने मला द्यावी, अशी प्रार्थना मी देवाकडे करतो,” अशा खास मराठमोळ्या शैलीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे अभीष्टचिंतन करताना उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. देशाच्या पंतप्रधानांनी शुभेच्छा देणे ही मोठी गोष्ट असल्याची भावना शिवशाहिरांनी व्यक्त केली.

निमित्त होते ओजस्वी वाणीतून शिवचरित्र घराघरात पोहोचविणाऱ्या शिवशाहीर पुरंदरे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे. तिथीनुसार शुक्रवारी (दि.१३) शिवशाहिरांनी शंभरीत पदार्पण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी पद्धतीने या सोहळ्यात सहभागी झाले होते.

मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती बाबासाहेबांची असलेली निष्ठा आणि त्यांचे विचार जगभरात पोहोचविण्यासाठी घेतलेली मेहनत याविषयी कौतुकाद्गार काढले. “शिवाजी महाराजांचे जीवन आणि विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी त्यांनी जे योगदान दिले त्याबद्दल आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे ऐतिहासिक पुरुष असले तरी वर्तमानही त्यांच्या अमरगाथांनी प्रभावित आहे. वर्तमान आणि भविष्याचा एकच प्रश्न आहे की शिवाजी महाराज नसते तर काय झाले असते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय भारताच्या गौरवाची कल्पना करणेदेखील मुश्किल आहे.”

ऐतिहासिक कालखंडात छत्रपती शिवरायांची जी भूमिका होती तिच भूमिका त्यांच्या गाथांमधून निरंतर पुढे चालत आली आहे. हिंदवी स्वराज्य, अनुशासन, वंचितांना न्याय देणे, नौसेनाची उपयुक्तता हे त्यांचे प्रयोग आजही अनुकरणीय आहेत. बाबासाहेब यांनीच नव्या पिढीला शिवाजी महाराजांचे हे रूप अवगत करून दिले. शिवाजी महाराजांविषयीच्या गोष्टी सांगण्याच्या बाबासाहेबांच्या शैलीतून प्रत्येकाच्या मनात शिवाजी महाराजांची प्रतिमा जिवंत होते. ‘जाणता राजा’च्या प्रारंभीच्या काळात हा प्रयोग पाहण्यासाठी मी पुण्यालाही गेलो होतो. खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. आज देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशाचा इतिहास लिहिताना बाबासाहेबांसारखीच प्रेरणा आणि प्रामाणिकतेच्या कसोटीवर लेखन करावे,” असे आवाहनही मोदी यांनी तरुण इतिहासकारांना केले.

---------------------