शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कागदपत्रांसाठी धांदल

By admin | Updated: June 9, 2016 01:59 IST

प्रवेशप्रक्रियेत मुख्यत्वेकरून कागदपत्रे महत्त्वाची असतात.

पिंपरी : प्रवेशप्रक्रियेत मुख्यत्वेकरून कागदपत्रे महत्त्वाची असतात. याच कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रे व तहसील कार्यालय गर्दीने भरली आहेत. त्यामध्ये जातीचा दाखला, रहिवासी दाखला, नॉन क्रिमीलेअरची जुळवाजुळव करण्यासाठी पालकांचीही धांदल उडाली आहे. त्यातच नागरी सुविधा केंद्रचालकांचेही तहसील कार्यालयात हेलपाटे सुरू आहेत. दिवसाला साधारणत: ५०० नागरिक दाखल्यासाठी नोंदणी करीत आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयातही दाखले वेळेत कसे मिळतील, यावर भर दिला आहे. प्रवेशप्रक्रियेच्या कालावधीतच कागदपत्रे मिळविण्यासाठी आवश्यक असल्याने जास्त पैसे भरण्याची तयारीही काही पालकांनी दर्शविली आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांनी दहावी प्रवेशानंतर प्रथमच कागदपत्रांची जुळवाजुळव करत असल्याने, तसेच पालकांना माहिती अपुरी असल्याने धांदल उडत आहे. त्यासाठी तहसील कार्यालयात चौकशी विभाग स्वतंत्र असणे आवश्यक आहे. कारण, बहुधा कित्येक नागरिकांना याबद्दल हेलपाटे मारण्याची वेळ येत आहे. तहसील कार्यालयात कागदपत्रांसाठी रांगा लागल्या आहेत. वेळेतच कागदपत्रे कशी मिळतील, यासाठी पालकांची शर्यत लागली आहे. काही पालकांनी कागदपत्रे जुळवाजुळव करण्यासाठी कामावरून सुट्या टाकल्या आहेत, तर काही पालक ठरलेल्या वेळेत कागदपत्रे तयार करून मिळत नसल्याने संताप व्यक्त करीत आहे. उत्पन्नाचा व रहिवासी दाखला सात दिवसांच्या आत मिळणे बंधनकारक आहे, तर जात प्रमाणपत्र हे १५ दिवसांच्या आत मिळणे आवश्यक आहे. यासाठी पालकांचा खटाटोप सुरू आहे. मात्र, तहसील कार्यालयात यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे. नायब तहसीलदार ज्योती जाधव व काही कर्मचाऱ्यांच्या टेबलाभोवती नागरिक गराडा घालून बसले आहेत, तर काही नागरिक कागदपत्रे वेळेत पूर्तता करूनही मिळत नसल्याने नायब तहसीलदार यांच्याकडे विनवण्या करीत आहेत. मात्र, तहसील कार्यालयात कागदपत्रे पाहणीसाठी कर्मचाऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडत आहे. (प्रतिनिधी)>तहसीलदार : वीस हजार दाखले देणारकागदपत्रे वेळेत देण्यावर आमचा भर आहे. पालकांच्या माहितीसाठी फलक लावलेले आहेत. तसेच काही पालकांना कागदपत्रांबद्दल काहीच माहिती नसल्याने पालकांना अडचण निर्माण होत आहे. अंदाजे १५ ते २० हजार दाखले तीन महिन्यांत द्यायचे आहेत. यासाठी कर्मचाऱ्यांना कामाचे नियोजन करून दिले आहे, अशी माहिती हवेलीचे तहसीलदार किरणकुमार काकडे यांनी सांगितली.विद्यार्थ्यांना तातडीने दाखले हवे आहेत. ही गरज ओळखून दाखले लवकर मिळवून देण्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये एजंटचाही मोठ्याप्रमाणात वावर आहे. परंतु या कार्यालयातच दोन वेळा लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने छापा टाकून कारवाई केली आहे. त्यामुळे हे एजंट खुलेआमपणे काम न करता लपूनछपून काम करत आहेत.