शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मानवी हक्क न्यायालय १४ वर्षांनंतरही कागदावरच

By admin | Updated: December 10, 2015 01:38 IST

प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मानवी हक्क न्यायालय स्थापन करण्याची घोषणा १४ वर्षांनंतरही कागदावर राहिली आहे. याबाबत राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने

पुणे : प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मानवी हक्क न्यायालय स्थापन करण्याची घोषणा १४ वर्षांनंतरही कागदावर राहिली आहे. याबाबत राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने मे २००१मध्ये अधिसूचना काढली. मात्र, त्यानंतर अधिसूचनेचा शासनालाच विसर पडला. मानवी हक्क संवर्धनांसाठी जागतिक पातळीवर वेळोवेळी पावले उचलल्यानंतर भारतातही १९९३मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा करण्यात आला. कायद्यातील कलम ३० नुसार प्रत्येक जिल्हा स्तरावरील सत्र न्यायालय हे मानवी हक्क न्यायालय म्हणून त्यासंंबंधित खटले चालविण्यासाठी घोषित करण्यात आली. विधी व न्याय विभागाने त्याबाबतची अधिसूचना ३० मे २००१ रोजी प्रसिद्ध केली. कलम ३० अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती व न्यायाधीश यांच्याशी विचारविनिमय करून सत्र न्यायालय हे मानवी हक्क न्यायालय म्हणून मानवी हक्क संरक्षण अधिनियमनाखाली दाखल प्रकरणे चालविण्यासाठी निर्देशित करीत आहे, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले होते.