शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
2
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
3
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार
4
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
5
असं काय घडलं की लिव्हइनमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडनं दोन मुलांच्या आईला यमसदनी धाडलं?
6
WTC Points Table : ऑस्ट्रेलिया १०० टक्केसह टॉपर! टीम इंडियापेक्षा अजूनही श्रीलंकन भारी!
7
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
8
अंगठी विकता विकता कोट्यधीश बनला, दुबईहून यायचे मौलाना; गरीब युवतींना 'असं' जाळ्यात अडकवायचे, मग...
9
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
10
हृदयद्रावक! आधी सासू-सासरे अन् आता २९ वर्षीय नवऱ्याचा मृत्यू; घरात एकटीच राहिली सून
11
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
12
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
13
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
14
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
15
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
16
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
17
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
18
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
19
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
20
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार

क्रीडांगण नसताना शाळांना परवानगी मिळते कशी?

By admin | Updated: February 17, 2015 23:48 IST

क्रीडांगण नसताना शिक्षण विभागाने शहरातील शाळांना परवानगी कशी दिली, याची चौकशी करून राज्य शासनाने संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी,

पुणे : क्रीडांगण नसताना शिक्षण विभागाने शहरातील शाळांना परवानगी कशी दिली, याची चौकशी करून राज्य शासनाने संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी, त्याचप्रमाणे शिक्षण हक्क कायद्यानुसार क्रीडांगण असणाऱ्या शाळांनाच परवानगी दिली जाते. त्यामुळे यापुढील काळात क्रीडांगण नसणाऱ्या शाळांना परवानगी देऊ नये, अशी मागणी पालक संघटनांकडून केली जात आहे.लोकमतने मंगळवारी ‘शाळांनीच हिरावलं बालपण’ हे वृत्त प्रसिद्ध करून शालेय मुलांच्या गंभीर प्रश्नाला वाचा फोडली. त्यानंतर महापॅरेन्टस असोसिएशन व शिक्षण हक्क मंचच्या पदाधिकाऱ्यांनी क्रीडांगणाची तपासणी न करता शाळांना परवानगी देणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.महापॅरेन्टस असोसिएशनचे सचिव दत्तात्रय पवार म्हणाले, की अनेक शाळांकडून अधिक शुल्क घेतले जाते; परंतु त्या तुलनेत सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही. क्रीडांगण नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना २६ जानेवारी तसेच १५ आॅगस्ट या राष्ट्रीय उत्सवाच्या दिवशी ध्वजारोहणासाठी शाळेत बोलवत नाहीत. बऱ्याच शाळांची खेळाची मैदाने सिमेंटची आहेत. सुविधा नसणाऱ्या शाळांमध्ये पालकांनी आपल्या मुलांचे प्रवेश घेऊ नये. महापॅरेन्टस असोसिएशनचे संघटक दिलीपसिंग विश्वकर्मा म्हणाले, की शाळांना परवानगी देण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची आहे. परंतु, शिक्षण विभागावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. तसेच अशा शाळांना पुढील काळात परवानगी देऊ नये. राजकीय इच्छाशक्ती असेल तरच मुले सुदृढ होतील.शिक्षण हक्क कायदा (आरटीई) डावलून कायद्याची भीती न बाळगता क्रीडांगण नसताना शाळांना परवानगी देणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची तरतूद करणे आवश्यक आहे. आरटीईचे नियम डावलणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाईची तरतूद केली गेली तर क्रीडांगणविरहित शाळा सुरूच होऊ शकणार नाही. आपल्या मुलांच्या हक्कांसाठी सर्व पालक व पालक संघटनांनी एकत्र आले पाहिजे. गुणवत्तेच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या शारीरिक वाढीकडे दुर्लक्ष करू नये.- मतीन मुजावर, अध्यक्ष, शिक्षण हक्क मंचशिक्षण विभाग घेणार क्रीडांगणांचा आढावा४शहराच्या मध्यवस्तीतील शाळांना असणारी जागेची गरज समजावून घेण्याची गरज आहे. तरीही मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याने शाळांना जागा कमी असली तरी त्यांनी विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रीडांगण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ४मात्र, शहराच्या मध्यवस्तीतील शाळांच्या जागेच्या अडचणीसुद्धा समजावून घेणे गरजेचे आहे. परंतु, शिक्षण विभागातर्फे शाळांकडे उपलब्ध असलेल्या क्रीडांगणाचा आढावा घेऊन त्याबाबतचा कालबद्ध कार्यक्रम तयार केला जाईल, असे राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी आज सांगितले.४ पालिका कार्यक्षेत्रातील बहुतांश शाळांकडे मैदाने नसल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. विद्यार्थी मनोरंजनासाठी व्हिडिओ गेम, मोबाईलवरील गेम्सचा आधार घेत आहेत. याबाबतचे ‘लोकमत’ने मंगळवारी ‘शाळांनीच हिरावलं बालपण’ या मथळ्याखालील वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावर शिक्षण आयुक्त डॉ. भापकर यांनी शाळांचा आढावा घेऊन कालबद्ध कार्यक्रम तयार केला जाईल, असे सांगितले.