शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

...आता जगायचं कसं?

By admin | Updated: August 18, 2015 03:45 IST

माळरानावर चारा नाही... शेतात पाणी नाही... बागायती भागात रानं मोकळी नाहीत... पूर्वीसारखं मेंढरं घेऊन कोकण अथवा बागायती भागाकडे जावं तर

लोणी भापकर : माळरानावर चारा नाही... शेतात पाणी नाही... बागायती भागात रानं मोकळी नाहीत... पूर्वीसारखं मेंढरं घेऊन कोकण अथवा बागायती भागाकडे जावं तर मुलांच्या शिक्षणाचं काय? घरातील वृद्ध व्यक्तींची हेळसांड होते. दिवसेंदिवस पाऊस-पाणी कमी होतोय. त्यामुळे शेती उजाड तर माळरानावर चारा नाही. पूर्वी मेंढरांवर उदरनिर्वाह व्हायचा. त्यामुळे पिढ्यान्पिढ्या याच व्यवसायात राहिलो. त्यातून शिक्षण घेतलं नाही. आता सततची चारा व पाणी टंचाई; बागायती भागात उसाखालील क्षेत्र वाढले. त्यामुळे मेंढरं सांभाळणे जिकिरीचे होत आहे. शिक्षण नाही, इतर कला नाही. त्यामुळे आता जगायचं कसं?... ही व्यथा आहे बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील मेंढपाळ दत्तू मासाळ, शिवाजी मासाळ यांची. बारामतीच्या जिरायती भागातील मासाळवाडी, पळशी, मुढाळे, मोराळवाडी, कानाडवाडी, मोढवे, जोगवडी, तरडोली या वढाणे, बाबुर्डी या भागात मेंढपाळांची मोठी संख्या आहे. मागील चार वर्षे पावसाने ओढ दिल्याने येथील मेंढपाळांपुढे चारा व पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यापूर्वी उन्हाळयातील महिना दोन महिने जाणवणारी टंचाई मागील काही वर्षांपासून पावसाळ्यातही जाणवू लागली आहे. पूर्वी या भागातील मेंढपाळ उन्हाळ्यात दोन महिने चाऱ्यासाठी मेंढरांसह कुटुंबे घेऊन कोकण, उत्तर महाराष्ट्रात जात असत. पावसाळा सुरू होताच गावाकडे परतत असत. कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असल्याने व गावाकडील शेती करता येत असल्याने मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत मेंढपाळवर्ग या व्यवसायात टिकून होता. मागील काही वर्षात पावसाचे प्रमाण घटले. त्यातच पुण्या- मुंबईकडील भांडवलदारांनी जिरायती भागातील पडीक जमिनी घेऊन तारेची कंपाऊंड घातली. तर बागायती भागात उसाखालील क्षेत्रात वाढ झाली. याबरोबरच शासनाच्या सामाजिक वनीकरणाचा जाच वाढत राहिल्याने मेंढरांना चरण्यासाठी क्षेत्रच उरले नाही. स्वत:च्या शेतात चारा करावा, तर पाऊस नाही. विहिरी कोरड्या आहेत. त्यामुळे मेंढरांना सध्या टँकरने विकत घेऊन घमेल्यात पाणी पाजावे लागत असल्याची खंत पळशी येथील मेंढपाळ रामा माने, मुढाळे येथील अण्णा ठोंबरे यांनी व्यक्त केली. शिक्षण घेतलेली पिढी या व्यवसायातून बाहेर पडेल. परंतु, ती संख्या अल्प आहे. शिक्षणाअभावी हा व्यवसाय करणाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे. मेंढपाळ व्यवसाय केवळ कोरडवाहू भागात आहे. मात्र, तेथील शेती पाण्याअभावी पडीक आहे. मेंढरांची खांड घेऊन बाहेर पडावे तर मुलांच्या शिक्षण थांबते, अशा कात्रीत मेंढपाळवर्ग सापडल्याची व्यथा मासाळवाडी येथील मेंढपाळांनी व्यक्त केली.

(वार्ताहर)