शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

घराघरात स्वच्छता; बाहेर वाहते सांडपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:11 IST

........................................ होळकरवाडीतील विरोधाभास; गावाच्या प्रवेशद्वारावरच दुर्गंधी ..................................... दीपक मुनोत/ लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : होळकरवाडीत घरोघरी स्वच्छतागृह असल्यामुळे ...

........................................

होळकरवाडीतील विरोधाभास; गावाच्या प्रवेशद्वारावरच दुर्गंधी

.....................................

दीपक मुनोत/ लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : होळकरवाडीत घरोघरी स्वच्छतागृह असल्यामुळे गाव हागणदारीमुक्त झाले असले, तरी गावात आणि परिसरात जमा होणारे सांडपाणी हे गावाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या पुलाखाली उघड्यावर सोडून देण्यात आल्याने मोठा विरोधाभास दिसून येतो. दुर्गंधी आणि कचऱ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.

याबाबत महापालिकेने तातडीने उपाययोजना करावी, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. अन्य गावांच्या तुलनेत, गावात फार जास्त प्रमाणात नागरिकरण झाले नसल्याने अतिक्रमणांची संख्या वाढलेली नाही. रस्त्यांलगतही आजूबाजूला सुटसुटीत जागा असल्याने वाहतूककोंडीची समस्याही जाणवत नाही.

गावात पिण्याच्या पाण्यासाठी धनगर तलाव, काळूबाई तलाव आणि पिंझलवस्ती तलावातून सोय करण्यात आली आहे. परंतु तरीही ते पाणी पुरेसे नसल्याची तक्रार गावकरी करतात. यावर्षी भूजल पातळी खाली गेल्याने आता सध्या टँकर सुरू आहेत. सोसायट्यांचे प्रमाण अजून कमी आहे. सोसायट्या वाढतील तेव्हा आम्ही पाण्याचे नियोजन कसे करणार, असा प्रश्न गावकऱ्यांनी विचारला. जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींनीमार्फत पिण्याच्या पाण्यासाठी खडकवासला धरणातून पाईपलाईनसाठी प्रयत्न सुरू आहेत असेही गावकऱ्यांनी सांगितले.

गाव हागणदारीमुक्त असल्याने प्रत्येकाच्या घरी वैयक्तिक स्वच्छतागृहे आहेत. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत गावाने विशेष काळजी घेतल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.

तरुणांना कुस्तीसाठी तालमीची सुविधा आहे परंतु व्यायामशाळा नसल्याने, पालिकेने व्यायामशाळा मंजूर करून द्यावी, अशी मागणी गावातील तरुणांनी ʻलोकमतʼजवळ बोलताना केली.

गावातील मोठी लोकसंख्या ही शेतीक्षेत्राशी संबंधित असल्याने शेतकऱ्यांना जमिनीवर आरक्षण पडण्याची भीती आहे. आमच्या जमिनीवर आरक्षण पडले तर आम्ही उदरनिर्वाह कसा करायचा, याची चिंता गावकऱ्यांना आहे. महापालिकेने गाव विलीन करताना टाउनप्लॅनिंग स्कीमबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही मत गावकऱ्यांनी व्यक्त केले.

____________________________________

गावातील कचरा व सांडपाण्याच्या निवारणाची सोय उत्तम आहे, पण त्यासाठी मल्लनिस्सारण प्रकल्प व कचरा व्यवस्थापन प्रकल्प महापालिकेने मंजूर करावेत.

-एस. व्ही. काशीद

____________________________________

याआधी ११ गावे आणि आमच्या बाजूला असणाऱ्या उरुळी देवाची गावाचा समावेश पालिकेत झाला होता, आज त्यांच्या समस्या सुटल्या आहेत का, तेथेच विकास नाही तर आमच्या गावाचा समावेश करून काहीही साध्य होणार नाही.

-वामन जमादार,

ज्येष्ठ नागरिक

...................

फोटो ओळ

होळकरवाडीला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम पीएमआरडीमार्फत चांगल्या पद्धतीने करण्यात आल्याने दळणवळणाची मोठी समस्या सुटली आहे.