शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

वादळीवारे, गारपीठीमुळे आदिवासी भागात हिरड्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:09 IST

पुणे जिल्ह्यात गेल्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने भातपिकाचे उत्पादन चांगले आले होते. परंतु परतीच्या पावसाने आपला मुक्काम लांबविला व ...

पुणे जिल्ह्यात गेल्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने भातपिकाचे उत्पादन चांगले आले होते. परंतु परतीच्या पावसाने आपला मुक्काम लांबविला व हातातोंडाशी आलेल्या भातपिकावर अवकाळीने घाला घातला. तयार होवू लागलेले भातपीक भीजून आदिवासी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी खाचरांचे नुकसान झाल्याने वर्षभर काबाडकष्ट करून केलेली आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनाचा मुख्य आधार समजली जाणारी भातशेती वाया गेली. हिवाळ्यातील हवामान बदलामुळे पठारी भागातील रब्बी पीकांचा हंगामही वाया गेला.

आदिवासी शेतकऱ्यांना हक्काचे आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे साधन म्हणजे हिरडा, मात्र यंदा हिरड्याची झाडे फळे धारणेच्या अवस्थेत आसतानाच पुणे जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात गारपीट व वादळीवाऱ्यांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. याचा फटका आंबेगाव तालुक्याच्या आहुपे, पाटण व भीमाशंकर खोऱ्यासह जुन्नर व खेड तालुक्यातील आदिवासी भागाला बसला. यामुळे अनेक ठिकाणी हिरड्याचा बहर व कोवळी लगड लागलेली हिरड्याची फळे झटकून पडली.

अवकाळी पावसामुळे यंदा हिरड्याच्या उत्पादनाचे प्रचंड नुकसान झाले. आर्थिक उत्पन्नाचे हक्काचे साधनच हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी चिंता निर्माण झाली आहे. शासनाची हिरडा खरेदी केंद्रही बंद असल्याने आदिवासी शेतकरी अडचणीत सापडला आहे.

--

चौकट

उन्हाळ्यातही संकट होतेतच

--

उन्हाळ्याच्या दिवसात आदिवासी शेतकरी जंगलातील आंबा, करवंदे, जांभळे, आवळे व इतर फळे जमा करून बाजारात विकतो. यातून आदिवासींना बऱ्यापैकी पैसे मिळतात.

कोरोना महामारीमुळे ना मोलमजूरी करता आली, ना बाजारहाट. यामुळे आदिवासी बांधवांची रोजीरोटीच हिरावली आहे. जंगलावर अवलंबून असलेले पोटही यंआ रिकामेच राहिल्याने आदिवासी शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. एकामागून एक आलेल्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करता करता आदिवासी शेतकरी पूर्णत: मेटाकुटीस आला आहे. पावसाळ्यात भातशेतीचे नुकसान तर उन्हाळ्यात गारपीट, वादळ व अवकाळी यामुळे पुणे जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी पूर्णत: हतबल झाला असून नैसर्गिक आपत्तीमुळे उध्वस्त झाला आहे.

--

फोटो क्रमांक : २३ डिंभे शेतकरी संकटात

फोटो ओळी : कोरोनाचे संकट त्यातच वर्षभरात एकापाठोपाठ एक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे रोजीरोटी हिरावल्याने आदिवासी शेतकरी यंदा हतबल झाला असून प्रचंड अर्थिक पेचात सापडला आहे. (छायाचित्र-कांताराम भवारी.)