शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

महामार्गाचे काम संथ गतीने

By admin | Updated: May 13, 2014 02:49 IST

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने होत आहे.

कापूरव्होळ : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने होत आहे. काही सुरु असलेल्या कामांच्या माध्यमातून ते जोरात चालल्याचे भासवण्याचे प्रकार महामार्ग प्राधिकरण व रिलायन्स इन्फ्रा यांच्याकडून दिसत आहे. या धिम्या कामाच्या प्रकाराने अनेक नागरिकांना अडथळे निर्माण होत आहे. गेल्या वर्षापासून चाललेले राष्ट्रीय महामार्गाचे सुरुवातीचे काम प्रगतीपथावर दिसून येत असल्याचे नागरिकांना वाटत होते. हळूहळू याच कामाला पठारावस्था निर्माण झाली. याच काळात शिंदेवाडी येथील दुर्घटनेतील निष्पाप मायलेकींच्या बळीने प्रशासनाचे डोळे उघडले. पण कार्यवाही मात्र शून्य झाली. जी कामे आवश्यक होती ती झाली नाहीत. या राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण विकासाच्या वृद्धीला वाळवंटाचे स्वरुप निर्माण होऊन कित्येक अडचणी व समस्या यांची संख्या वाढली. राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण व सुविधांचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सबठेकेदार रिलायन्स इन्फ्राला दिले. या रिलायन्स इन्फ्राचे विविध राज्यांमध्ये मोठी कामे चाललेली असून त्यांनी या महामार्गाचे काम काही इतर उपकंपन्यांना दिले. उपकंपन्यांना कामाचा मोबदला रिलायन्सने वेळेवर न दिल्याने त्या कार्यक्षमतेने काम करीत नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रिलायन्स इन्फ्राला दिलेल्या कामासंबंधी कोठेही तप्तरता नाही. प्राधिकरण याविषयी उदासीन असून रिलायन्सवर अंकुश नाही. राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या २ वर्षांपासून सुरू आहे. ठेकेदारांना विचारले असता काम कधी पूर्ण होईल हे सांगता येत नाही अशी उत्तरे मिळतात. आताचे सुरु असणारे काम म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशा गर्तेत सापडून रस्त्यांचे दुभाजक तुटलेले, उड्डाण पुलाचा राडारोडा त्याच ठिकाणी पडलेला आहे. पूर्वी काढलेल्या अतिक्रमणांनी डोके पुन्हा वर काढून ‘‘हम करे सो कायदा’’ असे चित्र निर्माण झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावर काहीच ठिकाणी दिशादर्शक फलक आहेत. अन्य महत्वाच्या ठिकाणी रिफ्लेक्टरचा अभाव दिसून येत आहे. प्रचंड पोलीस बंदोबस्तात काढलेली अतिक्रमणे मूळरुप कशी घेतायेत याची सर्वत्र चर्चा नागरिकांमध्ये आहे. (वार्ताहर)