शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

हायस्पीड रेल्वे मार्गाची मोजणी रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडगाव कांदळी : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. सोमवारी (दि. २६) वडगाव कांदळी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वडगाव कांदळी : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. सोमवारी (दि. २६) वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथे जमिनीच्या मोजणीसाठी आलेल्या रेल्वे व इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत त्यांना मोजणी न करू देता माघारी पाठवले.

हायस्पिड रेल्वे भूसंपादन प्रक्रियेसाठी जमीनीची मोजणी करण्यासाठी वडगाव कांदळी येथे सोमवारी महारेलचे उपमहाव्यवस्थापक शिरोळे, व्यवस्थापक मंदार विचारे, समन्वयक चंद्रकिशोर भोर, मंडलाधिकारी नितीन चौरे, वडगाव कांदळीच्या तलाठी साधना चव्हाण यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता हे सर्वजण शेतकऱ्यांच्या संभाव्य नुसकानीची प्रत्यक्ष पाहणी व पंचनामे करण्यासाठी वडगाव कांदळी या ठिकाणी आले होते. यावेळी बाधित शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध दर्शवून त्यांना माघारी पाठविले. जुन्नर तालुक्यातील

नारायणगाव, हिवरे तर्फे नारायणगाव, वडगाव कांदळी, नगदवाडी, भटकळवाडी, आळे, कोळवाडी, संतवाडी या गावातून पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग जात आहे. यासाठी महारेलने मोजणीची प्रक्रिया सुरू सुरू केली आहे. परंतु शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला किती ? याबाबत कोणतीही पूर्वकल्पना दिलेली नाही. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी या मार्गात जात आहेत. उर्वरित क्षेत्राला पाणीपुरवठा कुठून करायचा हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उपसा जलसिंचन योजनेच्या पाईपलाईन या मार्गातुन गेल्या आहेत. याबाबत महारेलने कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. अनेक प्रकल्पांना यापूर्वी तालुक्यातून आमच्या जमिनींचे संपादन झाले आहे. यामुळे रेल्वे प्रकल्पाला आम्ही जमिनी देणार नसल्याची ठाम भूमिका शेतकरी दत्तात्रय पवार, नवनाथ गायकवाड आदींनी लावून धरली. या मागणीला शेतकऱ्यांनी पाठिंबा दिल्याने महारेलचे अधिकारी व मोजणी अधिकाऱ्यांना मोजणी न करता माघारी जावे लागले.

चौकट

जमिनीचा मोबदला किती हे अनुत्तरीतच

शेतकऱ्यांची जमीन संपादित केल्यावर तिचा मोबदला काय हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. शासनाने बाजारभावाच्या चारपट मोबदला व २५ टक्के प्रोत्साहनपर भरपाई देणार असल्याचे जरी जाहीर केले तरी बाजारमूल्य कोणते हा प्रश्न अनुत्तरितच आहे. रेडीरेकनरचा दर हा जर बाजारभाव निश्चित केला तर रेडीरेकनरच्या दरापेक्षा किती तरी पटीने जास्त बाजार भाव जमिनीला मिळत आहे तर शासनाने त्या गावात झालेल्या उच्चांकी बाजारभाव काय असेल त्याच्या पाचपट रक्कम दिली पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. रेल्वेसाठी संपादित करावयाच्या गावामध्ये जो उच्चांकी बाजार भावाने मुद्रांक शुल्क भरलेले असेल त्याच्या पाच पट रक्कम शासनाने जाहीर करावी. विहिरी, घरे,फळबागा इत्यादींच्या नुसकानीचे धोरण जाहीर करावे शेतकऱ्यांमधील संभ्रम दूर करावा अन्यथा आम्ही मोजणीला विरोधच करीत राहणार अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.

फोटो : वडगाव कांदळी येथे हायस्पिड रेल्वे प्रकल्पाच्या जमिन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी माघारी पाठवल