शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

राज्यातील वारसास्थळे दुर्लक्षितच

By admin | Updated: April 19, 2016 01:03 IST

वारसास्थळांच्या सुरक्षिततेकडे आपण पुरेसे लक्ष देत नाही. वर्षातून एकदा वारसादिन साजरा करणे आणि त्यात समाधान मानणे ही वृत्ती चुकीची आहे.

वारसास्थळांच्या सुरक्षेबाबत काय वाटते? - वारसास्थळांच्या सुरक्षिततेकडे आपण पुरेसे लक्ष देत नाही. वर्षातून एकदा वारसादिन साजरा करणे आणि त्यात समाधान मानणे ही वृत्ती चुकीची आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर वारसास्थळांकडे आपण सोयीस्कर दुर्लक्ष करत आहोत, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. प्रत्येकच महत्त्वाच्या स्थळाला वारश्याचा दर्जा मिळतो, असे नाही. मात्र, आपल्या राज्यात जी निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित वारसास्थळे आहेत त्यांचे रक्षण करणे हे समाजाचे आणि शासनाचे काम आहे. ते योग्य पद्धतीने व्हायला हवे. या सर्व कामासाठी शासन पुरे पडेल, असे नाही. त्यामुळे स्थानिकांनी यासाठी पुढाकार घेऊन या वास्तू जपायला हव्यात. महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तूंबाबत काय वाटते? - महाराष्ट्रात सिंधुदुर्गसारखा सागरी किल्ला, समुद्रातील अष्टपैलू हिरा म्हणावा असा जंजिरा किल्ला आहे. शिवरायांचा पराक्रम दुमदुमत ठेवणारे राजगड, रायगडसारखे गड आहेत. याबरोबरच नाशिकजवळ थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या मातोश्री असलेल्या गोपिकाबार्इंचा वाडा, तर कोपरगाव येथे आनंदीबार्इंचा असलेला वाडा या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वास्तू आहेत. पुण्यातही नाना वाडा, विश्रामबाग वाडा, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू अशा क्रांतिकारकांची घरे आहेत. त्याकडे लक्ष देण्याचे कर्तव्य कोणाचे? राज्यातील वारसा असलेल्या कोणत्या वास्तू दुर्लक्षित आहेत?- महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक तालुक्यात कलासंपन्न असे मंदिर आहे. वास्तुरचनेच्या दृष्टीने एकमेव अशीही अनेक मंदिरे आहेत. यातील अनेक मंदिरे आज अखेरचा श्वास घेत आहेत. काही दुर्मिळ मूर्ती भग्नावस्थेत आणि दुलर्क्षित आहेत. हा वारसा जपणे आपले काम आहे. परभणीतील धारासुर येथील बाराव्या शतकातील घडीव विटांचे शिखर असलेल्या मंदिरात विष्णूच्या केशवादी २४ मूर्ती आहेत. याकडे शासन आणि समाज कोणाचेच लक्ष नाही. बीड जिल्ह्यातील धर्मपुरी येथेही केदारेश्वरचे उत्कृष्ट शिल्पाकृती असलेले मंदिर आहे. विदर्भातही ब्रह्मा, विष्णू, सूर्य, शीव असे एकत्रित असलेल्या अनेक मूर्ती आहेत. आपल्याकडील नाही, मात्र परदेशातील अभ्यासक याचा अभ्यास करताना दिसतात. कोणती काळजी घ्यायला हवी?- अनेक अद्वितीय अशा मूर्ती आता कमी झाल्याचे दिसते. या मूर्तींची तस्करी होऊ नये यासाठी प्रत्येकाने जागरुक असायला हवे. असे न झाल्यास आपल्याच वारशाचा अभ्यास आपल्याला परदेशात जाऊन करावा लागेल आणि येत्या काही दिवसांतच हे होईल. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे शासन व समाज यांनी वारसा संभाळायची, त्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात अनेक वारसास्थळे असून, त्याची योग्य पद्धतीने देखभाल होत नसल्याची भावना मूर्ती शास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ऐतिहासिक मूर्तींची तस्करी होऊन त्या परदेशात जाण्याचे प्रमाण मोठे असून, भारतातून ही तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. वर्षाला होणाऱ्या तस्करीतून कित्येक हजार कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक ठेवा असून, त्याची आपण योग्य ती काळजी घेत नसल्याने तो आपल्याकडून दुसरीकडे जात आहे. त्यामुळे विशिष्ट भागातील स्थानिक आणि शासनाने याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.