शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

प्राधिकरणाच्या वसाहतीत नरक यातना

By admin | Updated: April 7, 2016 00:38 IST

पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी विकसित होत असताना कष्टकरी, कामगार, मध्यमवर्गीयांना घरकुल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना झाली

विश्वास मोरे,  पिंपरीपिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी विकसित होत असताना कष्टकरी, कामगार, मध्यमवर्गीयांना घरकुल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना झाली. गृहप्रकल्प उभारले. मात्र, त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. वसाहती समस्यांच्या विळख्यात सापडल्या आहेत. निकृष्ट दर्जाचे बांधकाम, वसाहतींच्या देखभाल-दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे येथील रहिवाशांना नरक यातना सहन कराव्या लागत आहेत.पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी विकसित होऊ लागल्यानंतर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना १४ मार्च १९७२ ला झाली. पुढील ५० वर्षांतील होणारी लोकसंख्या वाढ विचारात घेता सुनियोजित शहर म्हणून प्राधिकरण उदयास आले. मूळ उद्देशापासून प्राधिकरण दूर गेले आहे, हे ढळढळीत वास्तव नाकारता येणार नाही. नवनगरसाठी प्राधिकरणाने चिंचवड, थेरगाव, काळेवाडी, वाकड, आकुर्डी, रावेत, तळवडे, चिखली, भोसरी, निगडी आदी १० गावांतील सुमारे १८४० हेक्टर जमिनींचे संपादन करण्यात आले. आराखडा तयार केला. मात्र, हा आराखडा गेल्या ४० वर्षांत पन्नास टक्केही पूर्ण झालेला नाही. सुरुवातीला जागा विकण्याबरोबरच गृहनिर्माणाचे धोरण प्राधिकरणाने अवलंबिले. एकूण ४६ पेठा विकसित करण्याचे धोरण तयार केले. त्यानुसार या शहरातील नागरिकांना सात हजार रहिवासी भूखंडाचे वाटप केले. यमुनानगर, निगडी, कृष्णानगर, वाकड, काळेवाडी, थेरगाव अशा भागात एकूण ३४ गृहयोजना राबविल्या. त्यातून सुमारे ११ हजार २२१ सदनिकांचे वाटप करण्यात आले. प्राधिकरणाने काही इमारती स्वत: बांधून संबंधित संस्थांना हस्तांतरित केल्या. गेल्या २० वर्षांत बांधलेल्या बहुतांश गृहप्रकल्पांची अवस्था दयनीय झाली आहे. प्राधिकरणाने बांधलेल्या इमारतींची अवस्था दयनीय झाली आहे.(क्रमश:)वसाहतींचे काम निकृष्ट दर्जाचेगृहयोजनेस प्रतिसाद मिळत नसल्याने प्राधिकरणाने सुरुवातीच्या कालखंडात कंपन्यांना आवाहन केले. त्यानुसार टेल्को, कुपर, सेंच्युरी एन्का, थरमॅक्स अशा विविध कारखान्यांतील कर्मचाऱ्यांच्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्या अस्तित्वात आल्या. यातील काही सोसायट्या कंपन्यांनी, तर काही सोसायट्या प्राधिकरणाने बांधून दिल्या. अशा एकूण १०० सोसायट्यांना ५० हेक्टर जमीन दिली. प्राधिकरणाने बांधून दिलेल्या सोसायट्यांची अवस्था पाहण्यासारखीच आहे. निकृष्ट कामामुळे या घरात राहणाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सर्वसामान्यांच्या घरकुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्थापन केलेल्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वसाहतींची अवस्था दयनीय झाली आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम, वसाहतींच्या देखभाल दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे वसाहती समस्यांच्या विळख्यात सापडल्या आहेत. वसाहतींच्या सद्य:स्थितीचे चित्रण करणारी वृत्तमालिका आजपासून देत आहोत.