शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

दमदार पावसाने सातगाव पठार भागातील बटाटा पिकाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:08 IST

मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. राज्यात इतरत्र पावसाने पुनरागमन केले असताना आंबेगाव तालुका मात्र याला अपवाद होता.तीन ...

मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. राज्यात इतरत्र पावसाने पुनरागमन केले असताना आंबेगाव तालुका मात्र याला अपवाद होता.तीन दिवसांपासून पावसाचे वातावरण झाले. मात्र तुरळक सरी वगळता पाऊस पडला नाही.बुधवारी पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. रात्रीही पाऊस पडत होता. गुरुवारी सकाळी मुसळधार पाऊस कोसळला.आणि शेतकऱ्यांची चिंता मिटली गेली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. विशेषता सातगाव पठार भागातील बटाटा पीक जोमदार येईल अशी माहिती भावडी येथील शेतकरी अशोकराव बाजारे यांनी दिली. पावसाअभावी बटाटा पीक धोक्यात आले होते. कुरवंडी,कोल्हारवाडी, थूगाव,भावडी,कारेगाव,पेठ,पारगाव तर्फे खेड ही गावे बटाटा पिकाचे आगार म्हणून समजली जातात. दरवर्षी येथे सुमारे दहा हजार एकर क्षेत्रात बटाटा लागवड केली जाते. मात्र मागील दोन वर्षांपासून निसर्गाची अवकृपा व कमी मिळणारा बाजारभाव यामुळे लागवड क्षेत्र कमी झाले आहे. यावर्षी केवळ पाच हजार एकर क्षेत्रावर बटाटा लागवड झाली.सुरवातीच्या ओलीवर लागवड करून शेतकरी पावसाची वाट पाहत होते.मात्र नंतर पावसाने चांगली दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले.दोन-तीन दिवसात पाऊस पडला नसता तर बटाटा पीक पूर्णपणे वाया गेले असते.आता पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आहे.काही भागात बटाट्याची उगवण झाली आहे.अशा ठिकाणी पावसाने पीक जोमदार येईल अशी माहिती कोल्हारवाडी येथील जयसिंग एरंडे यांनी दिली.पावसाने खरीपातील पिकांना जीवदान मिळाले आहे. शेतकऱ्यावर आलेले दुबार पेरणीचे संकट टळले आहे.डिंबे धरणात चांगला पाणीसाठा होऊ लागल्याने वर्षभराची काळजी मिटणार आहे.अशी माहिती राम तोडकर यांनी दिली.आज दिवसभर पाऊस पडत असल्याने शेतीतील कामे बहुतेक बंद होती. केवळ जनावरांचा चारा आणून शेतकऱ्यांनी घरी राहणेच पसंत केले.