शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

प्लॅस्टिक पत्रावळींमुळे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: April 28, 2017 05:48 IST

सध्या लग्नसराईचा ‘हंगाम’ सुरू असून जेवणावळीत प्लॅस्टिकच्या पत्रावळ्या, द्रोण, ग्लास या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.

कोरेगाव मूळ : सध्या लग्नसराईचा ‘हंगाम’ सुरू असून जेवणावळीत प्लॅस्टिकच्या पत्रावळ्या, द्रोण, ग्लास या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. जेवणावळी आटोपल्यानंतर कचऱ्यात फेकलेल्या या उष्ट्या पत्रावळ्या खाताना मोकाट जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक पत्रावळ्या जात असल्याने अनेक जनावरांना पचनसंस्थेचे आजार होत आहे. अनेकदा मृत्यूही ओढवत आहे. पूर्वी लग्नकार्यासह इतर कार्यक्रमातही जेवणावळी देताना पळस, वड, मोहाच्या झाडाच्या पानांचा पत्रावळी, द्रोण तयार करण्यासाठी उपयोग होत होता. या पत्रावळी, द्रोण नाशवंत असल्याने त्या नष्ट होत होत्या. गुरांनी त्या खाल्ल्या तरी त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत नव्हता. काही वर्षांपासून मात्र लग्नसोहळे आणि इतर कार्यक्रमांमध्ये विविध झाडांच्या पानांपासून बनविण्यात आलेल्या पत्रावळी आणि द्रोणांचा वापर करणे जवळपास बंद झाले आहे. त्या पत्रावळी आणि द्रोणांची जागा सद्यस्थितीत प्लॅस्टिकच्या पत्रावळ्या आणि द्रोणांनी घेतली आहे. शहरासोबतच ग्रामीण भागातही लग्नकार्यासह इतर कार्यक्रमांमध्ये प्लॅस्टिकच्या पत्रावळ्यांचा वापर अधिक प्रमाणात करण्यात येत आहे.कार्यक्रमांमध्ये झालेल्या जेवणावळीनंतर प्लॅस्टिकच्या उष्ट्या पत्रावळ्या, द्रोण आणि प्लॅस्टिकचे ग्लास उघड्यावर कोठेही फेकले जातात. त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी कोणाकडूनही प्रयत्न केले जात नाहीत. या फेकण्यात आलेल्या पत्रावळ्या मोकाट जनावरांद्वारे अन्न खाताना खाल्ल्या जातात. पत्रावळ्या व द्रोणांच्या माध्यमातून प्लॅस्टिक खाण्यात आल्याने गुरांच्या पचनसंस्थेवर गंभीर परिणाम होत होतो. विशेषत: गायी-म्हशींचा यामुळे गर्भपात होत असल्याचे पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितले जाते. यासोबत जनावरांच्या यकृतावर आणि शरीरातील विविध अवयवांवरही गंभीर परिणाम होत आहे. (वार्ताहर)