शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

निरोगी शरीर काळाची गरज

By admin | Updated: May 8, 2017 03:31 IST

निरोगी मन आणि निरोगी शरीर ही काळाची गरज आहे. देशातील आरोग्य सेवा विकसित करण्याच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र येऊन काम

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : निरोगी मन आणि निरोगी शरीर ही काळाची गरज आहे. देशातील आरोग्य सेवा विकसित करण्याच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे. सर्वसाधारणपणे लोकांमध्ये आरोग्य सेवेशी संबंधित विविध पैलूंवर जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ  अ‍ॅड. राम जेठमलानी यांनी व्यक्त केले.सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय महाविद्यालयाच्या लवळे कॅम्पस येथे जागतिकीकरणावरील आरोग्य सेवेवर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप नुकताच झाला. यावेळी जेठमलानी यांच्यासह जागतिक आरोग्य संस्थेचे भारतातील प्रतिनिधी डॉ. हेंक बेकदम, फिनलँड दुतावासातील नवी दिल्लीतील राजदूत नीना वास्कुनलाहती, सिंबायोसिसचे कुलपती डॉ. शां. ब. मुजूमदार उपस्थित होते.समारोपाप्रसंगी पदवीप्रदान समारंभही पार पडला. भारत आणि परदेशातून आरोग्यसेवेशी संबंधित जवळपास १००० ते १२०० व्यावसायिक, रुग्णालये आणि आरोग्यसेवा व्यवस्थापन, न्यायवैद्यक पद्धती, वैद्यकीय विमा, जनरल प्रॅक्टिशनर्स, प्रशासक, फार्मा विभागाचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  शेवटच्या सत्रात लिंडा रॉबटसन, डॉ. शिरशेंदू मुखर्जी, डॉ. श्रीकांत, डॉ. के. एस. सेठी, डॉ. आर. नागरत्ना, डॉ. डी. सी. कटोच आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.भारत हा लसींच्या निर्मितीसाठी प्रमुख केंद्र मानले जाते. सध्याच्या काळात जगासमोर संक्रमक आजारांचे आव्हान उभे आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे गरजेचे आहे. आरोग्य सेवेवरील खर्चामुळे ६० दशलक्ष जनता दारिद्र्यरेषेखाली उतरली आहे. वाढत्या प्रदूषणाची दखल घेणेही गरजेचे आहे.- हेंक बेकदम