शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

आरोग्य यंत्रणा सक्षम असायला हवी

By admin | Updated: April 25, 2015 05:09 IST

आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जवळ येत आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात घटना घडली, तर त्याचा परिणाम दुसऱ्या टोकावर होतो

पिंपरी : आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जवळ येत आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात घटना घडली, तर त्याचा परिणाम दुसऱ्या टोकावर होतो. कोणतीही घटना घडली, तरी ती निवारण्यासाठी आरोग्य यंत्रणांना काम करावे लागते. त्यामुळे या यंत्रणांनी कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी उपयुक्त व सज्ज असले पाहिजे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील ‘सार्वजनिक आरोग्य सज्जता आणि व्यवस्थापन’ या विषयावरील दोनदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन झाले. कार्यशाळा अटलांटा (अमेरिका) येथील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि प्रीव्हेन्शन (सीडीसी) केंद्र सरकारच्या नॅशनल डिझॅस्टार मॅनेजमेंट अ‍ॅथॉरिटी (एनडीएमए) आणि नवी दिल्ली येथील एम्सच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. सीडीसीचे सहयोगी संचालक डॉ. विकास कपिल, अमेरिकेतील इमोरी विद्यापीठाचे डॉ. झियाद काझी, डॉ. राजीव शर्मा, डॉ. प्रवीण अग्रवाल, इंडुसेमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सागर गलवणकर, डॉ. सचदेव, इमोरी विद्यापीठाचे डॉ. डेरेन इसनोर, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे संचालक डॉ. पी. डी. पाटील, उपसंचालक भाग्यश्री पाटील, सचिव यशराज पाटील, सचिव सोमनाथ पाटील, विद्यापीठाच्या ट्रस्टी स्मिता जाधव उपस्थित होत्या. डॉ. कपिल म्हणाले, ‘‘जगात मोठ्या प्रमाणावर नवनवीन रोगांच्या साथी येत आहेत. त्याचा परिणाम लगेच सगळीकडे पडतो. त्यामुळे कोणत्याही देशातील आरोग्य यंत्रणांनी गाफील राहून चालणार नाही. त्यासाठी त्यांनी आधीच येणाऱ्या संकटावर मात करण्याची तयारी केली पाहिजे. या साथी मोठ्या प्रमाणात पसरत असतात. त्यासाठी सरकार, खासगी संस्था, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.’’ गलवणकर म्हणाले, ‘‘कोणत्याही आजाराचे रुग्ण रुग्णालयात आल्यानंतर त्यांच्यावर तातडीचे काय उपचार करायचे, याची माहिती असली पाहिजे. त्यासाठी नवीन डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. कोणतीही नैसर्गीक आपत्ती आणली, तर त्यामध्ये काम करण्यासाठी सैन्य दलातील लोकांना प्रशिक्षण दिलेले असते. तसे प्रशिक्षण आरोग्य यंत्रणांनाही असले पाहिजे. सामान्य नागरिकांना ते नसते. मात्र, त्यांनाही आपत्तीमध्ये काम करण्याची माहिती दिली पाहिजे.’’ डॉ. पाटील म्हणाले, ‘‘देशातील व राज्यातील सर्वच घटनांमध्ये अनेक ठिकाणी तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध केली आहे. त्यातील अनुभव विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडत आहेत. तरीही अशा घटनांमध्ये व्यवस्थित माहिती देऊन नागरिकांचे प्राण वाचणे महत्त्वाचे असते.’’ (प्रतिनिधी)