शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य यंत्रणा सक्षम असायला हवी

By admin | Updated: April 25, 2015 05:09 IST

आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जवळ येत आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात घटना घडली, तर त्याचा परिणाम दुसऱ्या टोकावर होतो

पिंपरी : आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जवळ येत आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात घटना घडली, तर त्याचा परिणाम दुसऱ्या टोकावर होतो. कोणतीही घटना घडली, तरी ती निवारण्यासाठी आरोग्य यंत्रणांना काम करावे लागते. त्यामुळे या यंत्रणांनी कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी उपयुक्त व सज्ज असले पाहिजे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील ‘सार्वजनिक आरोग्य सज्जता आणि व्यवस्थापन’ या विषयावरील दोनदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन झाले. कार्यशाळा अटलांटा (अमेरिका) येथील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि प्रीव्हेन्शन (सीडीसी) केंद्र सरकारच्या नॅशनल डिझॅस्टार मॅनेजमेंट अ‍ॅथॉरिटी (एनडीएमए) आणि नवी दिल्ली येथील एम्सच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. सीडीसीचे सहयोगी संचालक डॉ. विकास कपिल, अमेरिकेतील इमोरी विद्यापीठाचे डॉ. झियाद काझी, डॉ. राजीव शर्मा, डॉ. प्रवीण अग्रवाल, इंडुसेमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सागर गलवणकर, डॉ. सचदेव, इमोरी विद्यापीठाचे डॉ. डेरेन इसनोर, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे संचालक डॉ. पी. डी. पाटील, उपसंचालक भाग्यश्री पाटील, सचिव यशराज पाटील, सचिव सोमनाथ पाटील, विद्यापीठाच्या ट्रस्टी स्मिता जाधव उपस्थित होत्या. डॉ. कपिल म्हणाले, ‘‘जगात मोठ्या प्रमाणावर नवनवीन रोगांच्या साथी येत आहेत. त्याचा परिणाम लगेच सगळीकडे पडतो. त्यामुळे कोणत्याही देशातील आरोग्य यंत्रणांनी गाफील राहून चालणार नाही. त्यासाठी त्यांनी आधीच येणाऱ्या संकटावर मात करण्याची तयारी केली पाहिजे. या साथी मोठ्या प्रमाणात पसरत असतात. त्यासाठी सरकार, खासगी संस्था, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.’’ गलवणकर म्हणाले, ‘‘कोणत्याही आजाराचे रुग्ण रुग्णालयात आल्यानंतर त्यांच्यावर तातडीचे काय उपचार करायचे, याची माहिती असली पाहिजे. त्यासाठी नवीन डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. कोणतीही नैसर्गीक आपत्ती आणली, तर त्यामध्ये काम करण्यासाठी सैन्य दलातील लोकांना प्रशिक्षण दिलेले असते. तसे प्रशिक्षण आरोग्य यंत्रणांनाही असले पाहिजे. सामान्य नागरिकांना ते नसते. मात्र, त्यांनाही आपत्तीमध्ये काम करण्याची माहिती दिली पाहिजे.’’ डॉ. पाटील म्हणाले, ‘‘देशातील व राज्यातील सर्वच घटनांमध्ये अनेक ठिकाणी तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध केली आहे. त्यातील अनुभव विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडत आहेत. तरीही अशा घटनांमध्ये व्यवस्थित माहिती देऊन नागरिकांचे प्राण वाचणे महत्त्वाचे असते.’’ (प्रतिनिधी)