शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
3
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
4
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
5
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
6
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
7
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
8
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
9
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
10
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
11
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
12
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
13
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
14
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
15
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
17
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
18
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
19
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
20
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!

निरामय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:08 IST

पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे आरोग्य सांभाळणे आवश्यक असते. त्यातच कोरोना विषाणू असल्याने थोडी अधिकची काळजी घ्यायला हवीच. आपला ...

पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे आरोग्य सांभाळणे आवश्यक असते. त्यातच कोरोना विषाणू असल्याने थोडी अधिकची काळजी घ्यायला हवीच. आपला आहार, जेवणाच्या वेळा, बाहेरचे खाणे टाळणे आदी उपाय केले तर तुम्ही निरोगी राहू शकाल.

माॅन्सून सुरू होण्याआधीच अनेक घरात आरोग्याविषयी तक्रारी सुरू होताना दिसतात. त्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पाण्यातून सर्वाधिक आजार होत असतात. त्यामुळे पावसाळ्यात पाणी पिण्याबाबत योग्य दक्षता घेणे आवश्यक आहे. पावसाच्या दुषित पाण्याने आजार पसरतात. तसेच पावसाळ्यात खाण्यापिण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

- पाणी उकळून आणि जास्तीत जास्त प्यायला पाहिजे

- शक्यतो कोल्डड्रिंकचा मोह टाळावा.

- हलके व पौष्टिक जेवण घ्यायला हवे

- या दिवसात पालक, मुळा, कांदा व लसूण खाणे टाळावे. कारण जमिनीत पावसामुळे अनेक जीवजंतू निर्माण होत असतात. त्यामुळे पालेभाज्या कमी खाव्यात, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.

- या दिवसात सुकामेवा कमी प्रमाणात खावा. कारण आपली पचनशक्ती कमजोर झालेली असते. त्यामुळे शक्यतो जड अन्न घेऊ नये. हलके व पचायला सोपे जाईल असेच अन्न घ्यावे.

- आपल्या जेवणात फळे, सलाड व ज्यूस यांचा सहभाग असावा.

- बाहेरचे उघड्यावरचे तेलकट पदार्थ खाणे टाळावे, कारण पावसाळ्यात अनेकदा सर्वत्र घाण असते. तसेच माशा, मच्छर तयार झालेले असतात. काही ठिकाणी तळण्यासाठी तेच तेल अनेकदा वापरले जाते. त्यातून अनेक आजार पसरू शकतात.