शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

नाझरे धरणावर धोका!

By admin | Updated: May 15, 2014 05:17 IST

नाझरे जलाशयात गेल्या महिनाभरात एकूण चार भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचेच निदर्शनास येत आहे.

जेजुरी : नाझरे जलाशयात गेल्या महिनाभरात एकूण चार भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचेच निदर्शनास येत आहे. अजून किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा सवाल स्थानिक नागरिकांबरोबरच भाविकही विचारू लागले आहेत. तीर्थक्षेत्र जेजुरी येथे कुलदैवत खंडेरायाच्या दर्शनाला दररोज हजारो भाविक येत असतात. देवदर्शनाला आल्यानंतर भाविक मोठ्या श्रद्धेने कºहास्नानासाठी जलाशयावर जातात. स्नान उरकून तेथेच कुलधर्म कुळाचाराचे विधीही करून घरातील देवघरातील देवमूर्र्तीसह खंडोबागडावर देवदशर्नासाठी जातात. या अत्यंत धार्मिक श्रद्धेमुळे नाझरे जलाशयावर महिला, पुरुष, लहान मुले यांची मोठी संख्या असते. जलाशयात स्नान करण्यासाठी सर्वच जण जलाशयात पाण्यात उतरतात. या ठिकाणी कोणत्याच प्रकारची सुरक्षेची यंत्रणा नसताना जलाशयात उतरल्याने अनेकदा भाविकांना दु:खद घटनांना सामोरे जावे लागते.गेल्या महिनाभरात एका लहान मुलासह तीन तरुण भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या परिसरात गेल्या उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर गाळ उपासण्याचा कार्यक्रम राबवण्यात आला असल्याने तेथे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झालेले आहेत. यामुळे भाविकांना स्नान करताना खोलीचा अंदाज येत नाही. यामुळे अशा घटना घडू लागल्या आहेत. घडलेल्या घटनाबाबत वर्तमानपत्रातून सातत्याने बातम्या प्रसिद्ध होत आहेत. बातम्यांनंतर केवळ कार्यवाहीच्या घोषणा होत आहेत. भाविकांत लहान मुले, महिला, पुरुष मोठ्या संख्येने आजही स्नानासाठी जलाशयात उतरत आहेत. भाविकांतूनच नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकही याबाबत मोठी नाराजी व्यक्त करीत आहेत. अजून किती बळी गेल्यावर प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याबाबत स्वयंसेवी संस्थांनीही पुढे येणे गरजेचे आहे. (वार्ताहर)