शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

नाझरे धरणावर धोका!

By admin | Updated: May 15, 2014 05:17 IST

नाझरे जलाशयात गेल्या महिनाभरात एकूण चार भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचेच निदर्शनास येत आहे.

जेजुरी : नाझरे जलाशयात गेल्या महिनाभरात एकूण चार भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचेच निदर्शनास येत आहे. अजून किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा सवाल स्थानिक नागरिकांबरोबरच भाविकही विचारू लागले आहेत. तीर्थक्षेत्र जेजुरी येथे कुलदैवत खंडेरायाच्या दर्शनाला दररोज हजारो भाविक येत असतात. देवदर्शनाला आल्यानंतर भाविक मोठ्या श्रद्धेने कºहास्नानासाठी जलाशयावर जातात. स्नान उरकून तेथेच कुलधर्म कुळाचाराचे विधीही करून घरातील देवघरातील देवमूर्र्तीसह खंडोबागडावर देवदशर्नासाठी जातात. या अत्यंत धार्मिक श्रद्धेमुळे नाझरे जलाशयावर महिला, पुरुष, लहान मुले यांची मोठी संख्या असते. जलाशयात स्नान करण्यासाठी सर्वच जण जलाशयात पाण्यात उतरतात. या ठिकाणी कोणत्याच प्रकारची सुरक्षेची यंत्रणा नसताना जलाशयात उतरल्याने अनेकदा भाविकांना दु:खद घटनांना सामोरे जावे लागते.गेल्या महिनाभरात एका लहान मुलासह तीन तरुण भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या परिसरात गेल्या उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर गाळ उपासण्याचा कार्यक्रम राबवण्यात आला असल्याने तेथे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झालेले आहेत. यामुळे भाविकांना स्नान करताना खोलीचा अंदाज येत नाही. यामुळे अशा घटना घडू लागल्या आहेत. घडलेल्या घटनाबाबत वर्तमानपत्रातून सातत्याने बातम्या प्रसिद्ध होत आहेत. बातम्यांनंतर केवळ कार्यवाहीच्या घोषणा होत आहेत. भाविकांत लहान मुले, महिला, पुरुष मोठ्या संख्येने आजही स्नानासाठी जलाशयात उतरत आहेत. भाविकांतूनच नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकही याबाबत मोठी नाराजी व्यक्त करीत आहेत. अजून किती बळी गेल्यावर प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याबाबत स्वयंसेवी संस्थांनीही पुढे येणे गरजेचे आहे. (वार्ताहर)