शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

नाझरे धरणावर धोका!

By admin | Updated: May 15, 2014 05:17 IST

नाझरे जलाशयात गेल्या महिनाभरात एकूण चार भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचेच निदर्शनास येत आहे.

जेजुरी : नाझरे जलाशयात गेल्या महिनाभरात एकूण चार भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचेच निदर्शनास येत आहे. अजून किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा सवाल स्थानिक नागरिकांबरोबरच भाविकही विचारू लागले आहेत. तीर्थक्षेत्र जेजुरी येथे कुलदैवत खंडेरायाच्या दर्शनाला दररोज हजारो भाविक येत असतात. देवदर्शनाला आल्यानंतर भाविक मोठ्या श्रद्धेने कºहास्नानासाठी जलाशयावर जातात. स्नान उरकून तेथेच कुलधर्म कुळाचाराचे विधीही करून घरातील देवघरातील देवमूर्र्तीसह खंडोबागडावर देवदशर्नासाठी जातात. या अत्यंत धार्मिक श्रद्धेमुळे नाझरे जलाशयावर महिला, पुरुष, लहान मुले यांची मोठी संख्या असते. जलाशयात स्नान करण्यासाठी सर्वच जण जलाशयात पाण्यात उतरतात. या ठिकाणी कोणत्याच प्रकारची सुरक्षेची यंत्रणा नसताना जलाशयात उतरल्याने अनेकदा भाविकांना दु:खद घटनांना सामोरे जावे लागते.गेल्या महिनाभरात एका लहान मुलासह तीन तरुण भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या परिसरात गेल्या उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर गाळ उपासण्याचा कार्यक्रम राबवण्यात आला असल्याने तेथे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झालेले आहेत. यामुळे भाविकांना स्नान करताना खोलीचा अंदाज येत नाही. यामुळे अशा घटना घडू लागल्या आहेत. घडलेल्या घटनाबाबत वर्तमानपत्रातून सातत्याने बातम्या प्रसिद्ध होत आहेत. बातम्यांनंतर केवळ कार्यवाहीच्या घोषणा होत आहेत. भाविकांत लहान मुले, महिला, पुरुष मोठ्या संख्येने आजही स्नानासाठी जलाशयात उतरत आहेत. भाविकांतूनच नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकही याबाबत मोठी नाराजी व्यक्त करीत आहेत. अजून किती बळी गेल्यावर प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याबाबत स्वयंसेवी संस्थांनीही पुढे येणे गरजेचे आहे. (वार्ताहर)