शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

अण्णापूरमध्ये ५६ घरांवर हातोडा

By admin | Updated: October 27, 2016 05:04 IST

शिरूर तालुक्याचे लक्ष लागलेल्या अण्णापूर (ता. शिरूर) येथील गायरान जमिनीवरील ५६ घरांचे अतिक्रमण प्रशासनाने आज काढले. या धडक कारवाईमुळे तालुक्यातील

टाकळी हाजी : शिरूर तालुक्याचे लक्ष लागलेल्या अण्णापूर (ता. शिरूर) येथील गायरान जमिनीवरील ५६ घरांचे अतिक्रमण प्रशासनाने आज काढले. या धडक कारवाईमुळे तालुक्यातील अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत. शिरूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये गायरान जमिनी, तसेच गावठाण हद्दी अतिक्रमणाने वेढलेल्या आहेत. त्यांच्यावर राजकीय पुढाऱ्यांचाच वरदहस्त असल्यामुळे काही ठिकाणी पक्की घरे, व्यापारी गाळे आणि बंगलेही उभे राहिले आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही ही अतिक्रमणे वर्षानुवर्षे तशीच आहेत. त्यामुळे गावच्या विकासाच्या नवीन योजना राबविताना जागेसाठी ग्रामपंचायतीसमोरच समस्या उभी राहत आहे. अण्णापूर (ता. शिरूर) येथे गट नं. ३०५२ मध्ये शिरूर-भीमाशंकर रस्त्याच्या शेजारी महत्त्वाच्या जागेवर ५६ लोकांनी घर, गोठा अशा पद्धतीने अतिक्रमण केले होते. ग्रामपंचायतीने या लोकांना नोटिसा दिल्या होत्या. मात्र काही लोकांनी आयुक्तांकडून स्थगिती मिळविली होती. याबाबत गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ म्हणाले, की सन २०११ला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे. त्यांच्यानुसार तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ, सहायक गटविकास अधिकारी ए. व्ही. बांगर यांच्यासह पोलीस निरीक्षक दयानंद गावडे त्यांच्या पोलीस बंदोबस्तासह हे अतिक्रमण काढण्यात आले. पश्चिम भागातील पिंपरखेड, टाकळीहाजी, वडनेर, जांबुत, मलठणमध्येदेखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. तसेच पूर्व भागातील मांडवगण फराटा, इनामगाव सादलगाव यांसारख्या अनेक गावांत अतिक्रमणे आहेत. बसस्थानक व मोक्याच्या जागांवरील अतिक्रमणे काढल्यास मुलासाठी खेळाची मैदाने, शाळा, दवाखाना यांसारख्या सार्वजनिक उपक्रमांसाठी जागा उपलब्ध होऊ शकते. (वार्ताहर)