शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

महापौरांच्या दालनात अर्धा ग्लासच पाणी

By admin | Updated: November 16, 2015 01:59 IST

घरी, कार्यालयामध्ये पाहुणे, मित्र, नातेवाईक आले की पहिल्यांदा पाण्याचा ग्लास दिला जातो, मात्र अनेकदा एक-दोन घोट पाणी पिऊन उर्वरित पाणी तसेच ठेवले जाते.

पुणे : घरी, कार्यालयामध्ये पाहुणे, मित्र, नातेवाईक आले की पहिल्यांदा पाण्याचा ग्लास दिला जातो, मात्र अनेकदा एक-दोन घोट पाणी पिऊन उर्वरित पाणी तसेच ठेवले जाते. यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात होणारा अपव्यय टाळण्यासाठी भेटायला येणाऱ्यांना अर्धा ग्लासच पाणी देण्याचा अभिनव पायंडा शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पाडला आहे. महापौर कार्यालयाने एक अभिनव पायंडा पाडला असून, कार्यालयामध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना अर्धा ग्लासच पाणी दिले जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा निम्माच पाणीसाठा झाल्याने ३० टक्के पाणीकपात लागू करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर बांधकामे, वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव यासाठीच्या पाणी वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचबरोबर पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. महापौर कार्यालयामध्ये विविध कामानिमित्त, बैठकांसाठी अनेक लोकांची ये-जा सुरू असते. या वेळी नागरिकांना अर्धा ग्लास भरूनच पाणी देण्याच्या सूचना धनकवडे यांनी दिल्या आहेत. पाणी आणखी हवे असल्यास पुन्हा द्यावे पण पाण्याची नासाडी होऊ नये हा यामागचा हेतू आहे. महापौर कार्यालयामध्ये अर्धा-अर्धा ग्लासाने फारच छोटी पाणी बचत होणार असली तरी याचे अनुकरण संपूर्ण शहराने केल्यास खूपच मोठ्या प्रमाणात पाणी बचतीच्या मोहिमेला साह्य होऊ शकेल. शहराची लोकसंख्या ३५ लाखांच्या घरात जाऊन पोहोचली आहे, या प्रत्येकाने दररोज पाण्याचा अर्धा ग्लास वाचविला तर येत्या पावसाळ्यापर्यंत पाण्याची मोठी बचत होऊ शकेल.महापालिकेच्या वतीने नागरिकांना पाणी बचतीचे सातत्याने आवाहन केले जात आहे, त्याला प्रतिसाद देऊन नागरिकांनी विविध माध्यमातून पाणी वाचवावे असे दत्तात्रय धनकवडे यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)