शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

वारीच्या मुक्कामांचे ‘हगणदरीमुक्त’ मॉडेल

By admin | Updated: July 19, 2015 03:48 IST

संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी हगणदरीमुक्त मॉडेलचा उपक्रम सेवा सहयोग फाउंडेशनने राबविला आहे. पुणे ते पंढरपूर मार्गावरील यवत

- हणमंत पाटील,  पुणेसंत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी हगणदरीमुक्त मॉडेलचा उपक्रम सेवा सहयोग फाउंडेशनने राबविला आहे. पुणे ते पंढरपूर मार्गावरील यवत व लोणी येथील मुक्कामाच्या ठिकाणी पोर्टेबल स्वच्छतागृहे उभारून दोन्ही गावे हगणदरीमुक्त करण्यात आली आहेत. पुणे शहरात संत तुकाराममहाराज यांच्या पालख्यांचे जंगी स्वागत दर वर्षी केले जाते. शहरातील मुक्कामा वेळी महापालिकेकडून वारकऱ्यांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा देण्यात येते. मात्र, गावांतील मुक्कामा वेळी उघड्यावर शौचास जाण्याचे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर, तुकाराममहाराज पालखीमध्ये जनजागृती करून मुक्कामाची गावे हगणदरीमुक्त करण्याचा पथदर्शी प्रयोग राबविण्यासाठी पुण्यातील सेवा सहयोग फाउंडेशनने पुढाकार घेतला. हा पहिला प्रकल्प राबविण्यासाठी यवत व लोणी गावांची निवड केली. त्यानुसार लोकवर्गणीतून दोन्ही गावांत सुमारे ४०० पोर्टेबल स्वच्छतागृहे उभारण्यात आली. शहरातील ‘आयटी’ व खासगी कंपन्यांतील तरुणांनी या उपक्रमांत भाग घेतला. दोन्ही पालख्या यवत व लोणी या ठिकाणी मुक्कामाला येण्यापूर्वीपासून ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक व स्थानिक नागरिकांच्या लोकसहभागातून सेवा फाउंडेशनने वारकऱ्यांमध्ये जनजागृती केली. त्यामुळे मुक्कामाच्या दिवशी दोन्ही गावे हगणदारीमुक्त ठेवण्याचा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाला. या अभियानाचे संयोजन माजी खासदार प्रदीप रावत यांनी केले. रावत म्हणाले, ‘‘यवत व लोणी गावांत सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून पथके नियुक्त केली होती. त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शैैलेश घाटपांडे, निनाद संस्थेचे उदय जोशी, शिवाजी मोरे, अतुल लिमये, संदीप जाधव, मारुती तुपे, नंदकिशोर काळभोर, संतोष दाभाडे, बाळासाहेब आमराळे, धनंजय वाडेकर यांनी स्वयंसेवकांच्या पथकांची जबाबदारी पार पाडली. लोकवर्गणी व लोकसहभागातून हा प्रयोग करण्यात आल्याने साधारण एका गावात ४ लाख रुपये खर्च झाला आहे. दोन्ही पालख्यांची सुमारे ४० मुक्कामाची ठिकाणे आहेत. सर्व ठिकाणी हे मॉडेल राबविल्यास साधारण दीड ते दोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे आग्रह धरणार आहे.’’ संत तुकाराममहाराजांच्या पालखीचे दर वर्षी लोणीचे ग्रामस्थ आनंदाने स्वागत करून अन्नदान करतात. परंतु, स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने परिसरात वारीनंतर दुर्गंधी निर्माण होते. या वर्षी वारीचा मुक्काम हगणदरीमुक्त करण्याचा प्रयोग लोकसहभागामुळे यशस्वी झाला.- नंदकिशोर काळभोर, ग्रामस्थ, लोणी.