शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

कचऱ्यापासून तयार करणार ‘हरित कोळसा’

By admin | Updated: October 10, 2015 05:08 IST

संकलित होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या गंभीर होत आहे. बारामती नगरपालिकेच्या हद्दवाढीनंतर शहरात जवळपास ओला व सुका असा ३२ टन कचरा संकलित होतो.

बारामती : संकलित होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या गंभीर होत आहे. बारामती नगरपालिकेच्या हद्दवाढीनंतर शहरात जवळपास ओला व सुका असा ३२ टन कचरा संकलित होतो. या कचऱ्यावर प्रक्रिया करून ‘हरित कोळसा’ करण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामुळे कचऱ्यापासून सुटणाऱ्या दुर्गंधीचा त्रास होणार नाही. तसेच दररोजच्या कचऱ्याची विल्हेवाट लागणार आहे. हा कोळसा सिमेंट कंपन्यांना लागतो. त्यामुळे पालिकेला कचऱ्यापासून आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. नगरपालिकांच्या हद्दीत कचऱ्यापासून कोळसा निर्मितीचा प्रकल्प राबविणारी बारामती पालिका पहिलीच ठरणार आहे. या प्रकल्पाची सर्व तयारी झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीच्या अहवालानंतर प्रस्तावित जागेवर कोळसा निर्मितीचा प्रकल्प राबविला जाईल. कचरामुक्त बारामतीला यामुळे मूर्त स्वरूप येईल, असे नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांनी सांगितले. (वार्ताहर)बायोगॅसपासून वीजनिर्मिती...ओल्या कचऱ्याची विल्हेवाट बायोगॅस प्रकल्पात लावण्यात येणार आहे. सध्या ५ टन ओला कचरा शहरातील सर्व्हे नं. २२०मध्ये उभारण्यात आलेल्या बायोगॅस प्रकल्पासाठी वापरला जातो. बायोगॅसद्वारे वीजनिर्मिती केली जात आहे. या वीजनिर्मितीचा वापर पथदिव्यांसाठी केला जात आहे. त्यामुळे अन्य भागांतदेखील करण्यात येणाऱ्या बायोगॅस प्रकल्पाद्वारे वीजनिर्मिती करण्यात येईल.सध्या बारामती शहरात कचरा संकलित करण्याची समस्या आहे. पूर्वीच्या जळोची येथील २२ एकरांतील कचरा डेपो रस्ते विकास महामंडळाला कराराने देण्यात आला आहे. महामंडळाने ही जागा पालिकेकडून मागितली आहे. ढाकाळे (ता. बारामती) येथे पर्यायी २२ एकर जागेवर कचऱ्याचा पर्याय शोधला आहे. मात्र, तेथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिका कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे तंत्रज्ञान अवलंबणार असल्याचे सांगितले. या संदर्भात मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी सांगितले की, ढाकाळे येथील जागेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या चार जणांच्या समितीने पाहणी केली आहे. जवळ असलेले पाण्याचे स्रोत, वन्यजीवांसह अन्य पर्यावरणाला धोका होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे तेथे विरोध आहे. प्रत्यक्षात शहरातील कचरा त्या ठिकाणी टाकला जाणार नाही. संकलित होणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी १५ टन कचऱ्यापासून ‘हरित कोळसा’ तयार करण्यात येणार आहे.सिमेंट कंपन्यांना दगडी कोळशाला पर्याय म्हणून हा कोळसा उपयुक्त ठरतो. त्याचे दरदेखील परवडणारे असतात, असा प्रकल्प नवीन मुंबई महानगरपालिकेने राबविला आहे. त्यामुळे बारामती पालिकेच्या माध्यमातून या प्रकल्पाला चालना देण्यात येणार आहे. नगरोत्थान योजना, नगरपालिका निधीतून हा प्रकल्प मार्गी लावता येईल का, याबाबत सध्या विचार सुरू आहे.दररोज शहरातून ३२ टन कचरा गोळा होतो. संकलित झालेला ओला व सुका कचरा शहरातच वेगवेगळा केला जाणार आहे. शहरात बारामती ग्रामीण, रुई, जळोची, तांदूळवाडी या उपनगरांत बायोगॅस प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट दररोज लागणार आहे. २० टक्के कचऱ्यावर गांडूळखत, सेंद्रिय खताचा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव आहे. कचऱ्याचे विकेंद्रीकरण करून दररोज संकलित होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यामुळे कचरा साठविण्याची समस्या सुटणार आहे. या प्रकल्पाला ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत ५० टक्के अनुदान मिळविण्याचा प्रयत्न आहे. प्रकल्पासाठी कमी जागा लागणार आहे. त्यामुळे ढाकाळेसारख्या ग्रामीण भागात कचरा डेपोमुळे दुर्गंधी सुटेल, हा नागरिकांपुढे असलेला प्रश्न मार्गी लागणार आहे.