शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

माळीणला तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: June 3, 2016 00:39 IST

माळीण गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तात्पुरत्या निवारा शेडमध्ये राहणारे लोक बुब्रा नदीत पुलाखाली केलेल्या डवऱ्यातून पिण्यासाठी पाणी काढत आहेत.

घोडेगाव : माळीण गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तात्पुरत्या निवारा शेडमध्ये राहणारे लोक बुब्रा नदीत पुलाखाली केलेल्या डवऱ्यातून पिण्यासाठी पाणी काढत आहेत. माळीण गाव गाडले गेल्यानंतर वाचलेल्या ग्रामस्थांसाठी माळीण फाट्यावर तात्पुरती निवारा शेड बांधून देण्यात आली आहे. या शेडवर पाण्यासाठी पाणी योजना, बोअरदेखील करण्यात आली. मात्र, कोणत्याही स्रोताला पाणी राहिले नसल्याने सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माळीण ग्रामस्थांनी बुब्रा नदीत डवरा केला असून, यातून पिण्यासाठी पाणी नेत आहेत. या डवऱ्याला कमी पाणी येत असल्याने एक तासात दोन हंडे पाणी भरते. हे पाणीदेखील वाटीने भरण्याची वेळ माळीण ग्रामस्थांवर आली आहे. तसेच पुनर्वसन होत असलेल्या माळीणसाठी देखील लाखो रुपयांची पाणी योजनेचे काम सध्या सुरू आहे. परंतु योजनेच्या विहिरीला व बोअरला पाणी लागले नसल्याने पाण्यासाठी वेगळ्या पर्यायांची शोधाशोध सुरू झाली आहे. बुब्रा नदीत मोठा बंधारा करून याद्वारे पाणीपुरवठा होऊ शकतो किंवा आसाणे गावाच्यावर पाईलडोहचे काम पूर्ण करून पाणी आणण्याचे नियोजन सुरू आहे. आंबेगाव तालुक्यात सध्या ३ टँकरद्वारे सहा गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. यातील दोन टँकर सरकारी व एक टँकर खासगी आहे. तर उर्वरित टंचाईग्रस्त गावांसाठी जिल्हाधिकारी यांनी ४ टँकर मंजूर केले आहेत.यामध्ये प्रामुख्याने आदिवासी भागातील गावांचा समावेश आहे. हे टॅँंकर पुरवठा करण्याचे काम सोनाई दूध वाहतूक संस्थेला असून, तसे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्याकडून टॅँकर मिळत नसल्याने टंचाईग्रस्त गावांचे सध्या हाल सुरू आहेत. डवऱ्याला कमी पाणी येत असल्याने एक तासात दोन हंडे पाणी भरते. हे पाणीदेखील वाटीने भरण्याची वेळ माळीण ग्रामस्थांवर आली आहे. कायमस्वरूपी पुनर्वसन होत असलेल्या माळीण गावासाठी देखील लाखो रुपयांची पाणी योजना करण्याचे काम सुरू आहे.> घोडेगाव शहरात टंचाईघोडेगाव : घोडेगाव शहराला अनेक वर्षांनंतर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. घोड नदीपात्र कोरडे पडल्याने विहिरीला पाणी कमी पडले असून, पाणीपुरवठ्याच्या टाक्या पूर्ण भरत नाहीत. त्यामुळे सध्या दिवसाआड पाणी येत असून, लवकर पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे.‘पाण्याबाबत घोडेगाव सुखी’ असल्याचे सर्वजण म्हणतात; मात्र या वर्षी प्रथमच घोडेगावला पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. डिंभे धरणात शून्य टक्के पाणीसाठा झाल्याने धरणातून नदी, कालवे यांना पाणी बंद झाले आहे. त्यामुळे नदीला पाणी येण्याचा स्रोत बंद झाल्याने नदीपात्र कोरडे पडू लागले आहे. नदीतून विहिरीत येणारे पाणी कमी झाल्याने पाणीपुरवठ्याच्या टाक्या पूर्ण भरत नाहीत. त्यामुळे घोडेगाव शहराला सध्या दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. लवकर पाऊस न झाल्यास भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. हीच परिस्थिती घोडेगावजवळील धोंडमाळ, शिंदेवाडी, काळेवाडी, गोनवडी गावांची झाली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांचाही गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. घोडेगाव व परिसरात प्रत्येक शेतकरी कुटुंबाकडे जनावरे आहेत.