शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

माळीणला तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: June 3, 2016 00:39 IST

माळीण गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तात्पुरत्या निवारा शेडमध्ये राहणारे लोक बुब्रा नदीत पुलाखाली केलेल्या डवऱ्यातून पिण्यासाठी पाणी काढत आहेत.

घोडेगाव : माळीण गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तात्पुरत्या निवारा शेडमध्ये राहणारे लोक बुब्रा नदीत पुलाखाली केलेल्या डवऱ्यातून पिण्यासाठी पाणी काढत आहेत. माळीण गाव गाडले गेल्यानंतर वाचलेल्या ग्रामस्थांसाठी माळीण फाट्यावर तात्पुरती निवारा शेड बांधून देण्यात आली आहे. या शेडवर पाण्यासाठी पाणी योजना, बोअरदेखील करण्यात आली. मात्र, कोणत्याही स्रोताला पाणी राहिले नसल्याने सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माळीण ग्रामस्थांनी बुब्रा नदीत डवरा केला असून, यातून पिण्यासाठी पाणी नेत आहेत. या डवऱ्याला कमी पाणी येत असल्याने एक तासात दोन हंडे पाणी भरते. हे पाणीदेखील वाटीने भरण्याची वेळ माळीण ग्रामस्थांवर आली आहे. तसेच पुनर्वसन होत असलेल्या माळीणसाठी देखील लाखो रुपयांची पाणी योजनेचे काम सध्या सुरू आहे. परंतु योजनेच्या विहिरीला व बोअरला पाणी लागले नसल्याने पाण्यासाठी वेगळ्या पर्यायांची शोधाशोध सुरू झाली आहे. बुब्रा नदीत मोठा बंधारा करून याद्वारे पाणीपुरवठा होऊ शकतो किंवा आसाणे गावाच्यावर पाईलडोहचे काम पूर्ण करून पाणी आणण्याचे नियोजन सुरू आहे. आंबेगाव तालुक्यात सध्या ३ टँकरद्वारे सहा गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. यातील दोन टँकर सरकारी व एक टँकर खासगी आहे. तर उर्वरित टंचाईग्रस्त गावांसाठी जिल्हाधिकारी यांनी ४ टँकर मंजूर केले आहेत.यामध्ये प्रामुख्याने आदिवासी भागातील गावांचा समावेश आहे. हे टॅँंकर पुरवठा करण्याचे काम सोनाई दूध वाहतूक संस्थेला असून, तसे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्याकडून टॅँकर मिळत नसल्याने टंचाईग्रस्त गावांचे सध्या हाल सुरू आहेत. डवऱ्याला कमी पाणी येत असल्याने एक तासात दोन हंडे पाणी भरते. हे पाणीदेखील वाटीने भरण्याची वेळ माळीण ग्रामस्थांवर आली आहे. कायमस्वरूपी पुनर्वसन होत असलेल्या माळीण गावासाठी देखील लाखो रुपयांची पाणी योजना करण्याचे काम सुरू आहे.> घोडेगाव शहरात टंचाईघोडेगाव : घोडेगाव शहराला अनेक वर्षांनंतर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. घोड नदीपात्र कोरडे पडल्याने विहिरीला पाणी कमी पडले असून, पाणीपुरवठ्याच्या टाक्या पूर्ण भरत नाहीत. त्यामुळे सध्या दिवसाआड पाणी येत असून, लवकर पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे.‘पाण्याबाबत घोडेगाव सुखी’ असल्याचे सर्वजण म्हणतात; मात्र या वर्षी प्रथमच घोडेगावला पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. डिंभे धरणात शून्य टक्के पाणीसाठा झाल्याने धरणातून नदी, कालवे यांना पाणी बंद झाले आहे. त्यामुळे नदीला पाणी येण्याचा स्रोत बंद झाल्याने नदीपात्र कोरडे पडू लागले आहे. नदीतून विहिरीत येणारे पाणी कमी झाल्याने पाणीपुरवठ्याच्या टाक्या पूर्ण भरत नाहीत. त्यामुळे घोडेगाव शहराला सध्या दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. लवकर पाऊस न झाल्यास भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. हीच परिस्थिती घोडेगावजवळील धोंडमाळ, शिंदेवाडी, काळेवाडी, गोनवडी गावांची झाली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांचाही गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. घोडेगाव व परिसरात प्रत्येक शेतकरी कुटुंबाकडे जनावरे आहेत.