शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीबाबत सरकारचे वेळकाढूपणाचे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:10 IST

अमोल अवचिते पुणे : राज्य सरकार आढावा बैठका घेऊन तारखांचा घोळ घालत आहे. केवळ आदेश दिले, विविध विभागांनी रिक्त ...

अमोल अवचिते

पुणे : राज्य सरकार आढावा बैठका घेऊन तारखांचा घोळ घालत आहे. केवळ आदेश दिले, विविध विभागांनी रिक्त पदांची माहिती द्यावी, भरती प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, अशा घोषणा देऊन राज्य सरकारकडून एमपीएससीबाबत वेळकाढूपणाचे धोरण राबविले जात असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच, आढावा बैठक घेण्याऐवजी आता थेट भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी देखील विद्यार्थ्यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी परीक्षा प्रक्रियेत होत असलेल्या दिरंगाईमुळे स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. यावर राज्यभरातून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. हा असंतोष शांत करण्यासाठी सरकारने पुढे येत रखडलेल्या नियुक्त्या, परीक्षा आणि मुलाखती नियमित कशा होतील. याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली जाईल, अशी घोषणा केली. तसेच विधिमंडळात एमपीएससीतील रिक्त सदस्य पदे ३१ जुलैपर्यंत भरले जातील, अशी घोषणा करण्यात आली. मात्र यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही. यावर राज्य पातळीवर निर्णय प्रक्रिया सुरू आहे. हे दाखविण्यासाठीच आढावा बैठका घेतल्या जात आहेत. केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात असून कृती मात्र शून्य आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

चौकट

समितीसाठी सदस्य भेटत नाहीत का?

राज्य सरकारने एमपीएससीबाबत समिती नेमण्याचे कोणत्या आधारावर जाहीर केले होते. हे समजण्यापलीकडचे आहे. समिती नेमली जाईल, अहवाल येईल आणि परीक्षा पद्धती वेगाने पार पडेल असे वाटले होते. तसेच एमपीएससीचे रिक्त सदस्य भरले जाऊन तत्काळ रखडलेल्या नियुक्त्या, मुलाखती पार पडतील, असे वाटले होते. मात्र हे आभासी चित्र उभे केले असल्याचे सरकारच्या कृती वरून दिसून येत आहे, अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे.

कोट

एमपीएससीबाबत सरकारच्या बैठका होतात, घोषणा होते, परंतु त्याचे पुढे काहीच होत नाही. संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख लवकरात लवकर जाहीर करावी. तसेच करोनामुळे वर्ष वाया गेले असल्याने विद्यार्थ्यांच्या वयाच्या अटींमध्ये सवलत द्यावी. तसेच तत्काळ रिक्त पदे भरावीत.

- रोहिणी पाटील, परीक्षार्थी.

सरकारने विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळणे बंद करावे. नुसती घोषणा नको अंमलबजावणी हवी. २०२१ च्या सर्व जाहिरातींचे मागणीपत्र सरकारने तत्काळ एमपीएससीकडे द्यावे. सरकारने विधिमंडळात दिलेला शब्द पाळावा. भरती प्रक्रियेत विनाकारण वेळकाढूपणा करू नये.

- प्रशांत इंगळे, परीक्षार्थी.