शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

एमपीएससीबाबत सरकारचे वेळकाढूपणाचे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:10 IST

अमोल अवचिते पुणे : राज्य सरकार आढावा बैठका घेऊन तारखांचा घोळ घालत आहे. केवळ आदेश दिले, विविध विभागांनी रिक्त ...

अमोल अवचिते

पुणे : राज्य सरकार आढावा बैठका घेऊन तारखांचा घोळ घालत आहे. केवळ आदेश दिले, विविध विभागांनी रिक्त पदांची माहिती द्यावी, भरती प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, अशा घोषणा देऊन राज्य सरकारकडून एमपीएससीबाबत वेळकाढूपणाचे धोरण राबविले जात असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच, आढावा बैठक घेण्याऐवजी आता थेट भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी देखील विद्यार्थ्यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी परीक्षा प्रक्रियेत होत असलेल्या दिरंगाईमुळे स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. यावर राज्यभरातून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. हा असंतोष शांत करण्यासाठी सरकारने पुढे येत रखडलेल्या नियुक्त्या, परीक्षा आणि मुलाखती नियमित कशा होतील. याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली जाईल, अशी घोषणा केली. तसेच विधिमंडळात एमपीएससीतील रिक्त सदस्य पदे ३१ जुलैपर्यंत भरले जातील, अशी घोषणा करण्यात आली. मात्र यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही. यावर राज्य पातळीवर निर्णय प्रक्रिया सुरू आहे. हे दाखविण्यासाठीच आढावा बैठका घेतल्या जात आहेत. केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात असून कृती मात्र शून्य आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

चौकट

समितीसाठी सदस्य भेटत नाहीत का?

राज्य सरकारने एमपीएससीबाबत समिती नेमण्याचे कोणत्या आधारावर जाहीर केले होते. हे समजण्यापलीकडचे आहे. समिती नेमली जाईल, अहवाल येईल आणि परीक्षा पद्धती वेगाने पार पडेल असे वाटले होते. तसेच एमपीएससीचे रिक्त सदस्य भरले जाऊन तत्काळ रखडलेल्या नियुक्त्या, मुलाखती पार पडतील, असे वाटले होते. मात्र हे आभासी चित्र उभे केले असल्याचे सरकारच्या कृती वरून दिसून येत आहे, अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे.

कोट

एमपीएससीबाबत सरकारच्या बैठका होतात, घोषणा होते, परंतु त्याचे पुढे काहीच होत नाही. संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख लवकरात लवकर जाहीर करावी. तसेच करोनामुळे वर्ष वाया गेले असल्याने विद्यार्थ्यांच्या वयाच्या अटींमध्ये सवलत द्यावी. तसेच तत्काळ रिक्त पदे भरावीत.

- रोहिणी पाटील, परीक्षार्थी.

सरकारने विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळणे बंद करावे. नुसती घोषणा नको अंमलबजावणी हवी. २०२१ च्या सर्व जाहिरातींचे मागणीपत्र सरकारने तत्काळ एमपीएससीकडे द्यावे. सरकारने विधिमंडळात दिलेला शब्द पाळावा. भरती प्रक्रियेत विनाकारण वेळकाढूपणा करू नये.

- प्रशांत इंगळे, परीक्षार्थी.