शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीबाबत सरकारचे वेळकाढूपणाचे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:10 IST

अमोल अवचिते पुणे : राज्य सरकार आढावा बैठका घेऊन तारखांचा घोळ घालत आहे. केवळ आदेश दिले, विविध विभागांनी रिक्त ...

अमोल अवचिते

पुणे : राज्य सरकार आढावा बैठका घेऊन तारखांचा घोळ घालत आहे. केवळ आदेश दिले, विविध विभागांनी रिक्त पदांची माहिती द्यावी, भरती प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, अशा घोषणा देऊन राज्य सरकारकडून एमपीएससीबाबत वेळकाढूपणाचे धोरण राबविले जात असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच, आढावा बैठक घेण्याऐवजी आता थेट भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी देखील विद्यार्थ्यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी परीक्षा प्रक्रियेत होत असलेल्या दिरंगाईमुळे स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. यावर राज्यभरातून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. हा असंतोष शांत करण्यासाठी सरकारने पुढे येत रखडलेल्या नियुक्त्या, परीक्षा आणि मुलाखती नियमित कशा होतील. याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली जाईल, अशी घोषणा केली. तसेच विधिमंडळात एमपीएससीतील रिक्त सदस्य पदे ३१ जुलैपर्यंत भरले जातील, अशी घोषणा करण्यात आली. मात्र यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही. यावर राज्य पातळीवर निर्णय प्रक्रिया सुरू आहे. हे दाखविण्यासाठीच आढावा बैठका घेतल्या जात आहेत. केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात असून कृती मात्र शून्य आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

चौकट

समितीसाठी सदस्य भेटत नाहीत का?

राज्य सरकारने एमपीएससीबाबत समिती नेमण्याचे कोणत्या आधारावर जाहीर केले होते. हे समजण्यापलीकडचे आहे. समिती नेमली जाईल, अहवाल येईल आणि परीक्षा पद्धती वेगाने पार पडेल असे वाटले होते. तसेच एमपीएससीचे रिक्त सदस्य भरले जाऊन तत्काळ रखडलेल्या नियुक्त्या, मुलाखती पार पडतील, असे वाटले होते. मात्र हे आभासी चित्र उभे केले असल्याचे सरकारच्या कृती वरून दिसून येत आहे, अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे.

कोट

एमपीएससीबाबत सरकारच्या बैठका होतात, घोषणा होते, परंतु त्याचे पुढे काहीच होत नाही. संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख लवकरात लवकर जाहीर करावी. तसेच करोनामुळे वर्ष वाया गेले असल्याने विद्यार्थ्यांच्या वयाच्या अटींमध्ये सवलत द्यावी. तसेच तत्काळ रिक्त पदे भरावीत.

- रोहिणी पाटील, परीक्षार्थी.

सरकारने विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळणे बंद करावे. नुसती घोषणा नको अंमलबजावणी हवी. २०२१ च्या सर्व जाहिरातींचे मागणीपत्र सरकारने तत्काळ एमपीएससीकडे द्यावे. सरकारने विधिमंडळात दिलेला शब्द पाळावा. भरती प्रक्रियेत विनाकारण वेळकाढूपणा करू नये.

- प्रशांत इंगळे, परीक्षार्थी.