शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

विकास आराखडा शासनाने ताब्यात घ्यावा

By admin | Updated: February 17, 2015 23:43 IST

महापालिकेच्या विकास आराखड्यावर आलेल्या ८७ हजार हरकती व सूचनांची सुनावणी घेणाऱ्या सात सदस्य समितीचा अहवाल एकच असणे कायद्याने बंधनकारक

पुणे : महापालिकेच्या विकास आराखड्यावर आलेल्या ८७ हजार हरकती व सूचनांची सुनावणी घेणाऱ्या सात सदस्य समितीचा अहवाल एकच असणे कायद्याने बंधनकारक असताना, प्रत्यक्षात समितीचे दोन स्वतंत्र अहवाल प्रशासनास सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन स्वतंत्र अहवालावर निर्णय घेण्याचा अधिकार नियोजन प्राधिकरणाला (मुख्यसभा) नाही. त्यामुळे हा विकास आराखडा राज्य शासनाने ताब्यात घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी पुणे बचाव समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आराखड्यावरील अहवाल सादर करणाऱ्या नियोजन समितीबाबत महाराष्ट्र नगररचना अधिनियम २८ (४) मध्ये नियोजन समितीकडून सादर केल्या जाणाऱ्या अहवालाचा उल्लेख ‘नियोजन समितीचा अहवाल’ असा असल्याने दोन अहवाल कायद्यात अभिप्रेत नाहीत. तसेच, अहवाल सादर करण्याची मुदत डिसेंबर २०१४ मध्येच संपली होती. त्यानंतर मुख्यसभेने अद्याप ही मुदत वाढवून दिलेली नसताना, मुदतवाढ तसेच अहवालांचा प्रस्ताव एकाच सभेत घेण्यात आला आहे. ही बाब चुकीची असल्याने राज्य शासनाने हा आराखडा ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करावी, असे पत्र समितीचे उज्ज्वल केसकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले आहेत.४डीपीवर ८४ हजार हरकती नोंदविण्यात आल्या. डीपीनुसार मध्यवस्तीमध्ये, तसेच उर्वरित शहरात रस्तारूंदीकरणासाठी अनेक इमारती बाधित होत होत्या. त्यामुळे त्यावर हरकतींचा पाऊस पुणेकरांनी पाडला. एकूण हरकतीपैकी सुमारे ७० टक्के हरकती या त्याबाबतच होत्या. त्याशिवाय आलेल्या हरकतींमध्ये वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी होत्या. त्या सर्वांचा समितीने सखोल विचार करून निर्णय घेण्यात आले.९ महिने चालले काम४डीपीवर नोंदविण्यात आलेल्या ८४ हजार हरकतींची सुनावणी करून त्यावर मुख्य सभेकडे करावयाच्या शिफारशींचा अहवाल तयार करण्याचे नियोजन समितीचे काम ९ महिने चालले. त्यात आचारसंहितेच्या काळात निर्णय घेता येत नसल्याने काम थांबवावे लागले होते. समितीच्या सदस्यांना एकूण ८ हजार पानांवर ठिकठिकाणी सह्या करून अहवाल तयार करावा लागला. निवृत्त नगररचना उपसंचालक ए. आर. पाथकर यांना यापूर्वी डीपी तयार करण्याचा अनुभव असल्याने त्यांनी यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.डीपीतील प्रमुख शिफारशी४मध्यवस्तीमध्ये घरमालकांना दोन, तर भाडेकरूंना अर्धा, असे अडीच एफएसआय.४मेट्रोमार्गावर चारऐवजी तीन एफएसआय.४रस्तारूंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्यांना मोठा दिलासा.४सोसायट्यांच्या पुनर्विकासासाठी ०.३३ टक्के एफएसआय मिळणार.४छोट्या जागेतील भाडेकरूला किमान २५० स्क्वेअर फुटाचे घर देणे बंधनकारक.४बांधकामांची नियमावली सुटसुटीत होणार.४नदीकाठचा लकडी पूल ते शनिवारवाडा रस्ता वगळण्याची शिफारस.शहराच्या हितासाठीच दुसरा अहवालनियोजन समितीमधील तज्ज्ञ सदस्य सारंग यादवाडकर, डॉ. सचिन पुणेकर, प्रा. अख्तर चौहान यांनी डीपीवरील हरकतींवर स्वतंत्रपणे २९ पानांचा अहवाल दिलेला आहे. याबाबत सारंग यादवाडकर यांनी सांगितले की, ‘‘जुन्या हदद्ीच्या विकास आराखडयावरील सुनावणी झाल्यानंतर अहवाल पूर्ण करूनच आमच्यापुढे ठेवण्यात आला, त्याचा अभ्यास करायलाही पुरेसा वेळ मिळाला नाही. इतर सदस्यांनी तयार केलेल्या या अहवालाशी पूर्ण मतभेद नसले तरी काही बाबतीत वेगळी मते असल्याने ती स्वतंत्रपणे मांडण्यात आली आहेत. शहराच्या पुढील २० वर्षाचा विचार करून दूरदृष्टिने निर्णय घ्यायला हवे असतात त्याचबरोबर नगररचनेचे नॉर्मचा विचार व्हायला हवा असतो. प्रशासनाने मॅप तयार करताना अनेक चुका केल्या होत्या. कचऱ्याच्या प्रश्नावर गांभीर्याने विचार व्हायला हवा होता यासह महत्त्वाचे वाटलेले इतर मुदद्े स्वतंत्रपणे मांडण्यात आले आहे.’’