शहरं
Join us  
Trending Stories
1
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
2
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
3
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
4
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
5
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
8
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
9
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
10
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
11
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
12
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
13
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
14
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
15
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
16
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
17
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
18
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
19
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
20
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

विकास आराखडा शासनाने ताब्यात घ्यावा

By admin | Updated: February 17, 2015 23:43 IST

महापालिकेच्या विकास आराखड्यावर आलेल्या ८७ हजार हरकती व सूचनांची सुनावणी घेणाऱ्या सात सदस्य समितीचा अहवाल एकच असणे कायद्याने बंधनकारक

पुणे : महापालिकेच्या विकास आराखड्यावर आलेल्या ८७ हजार हरकती व सूचनांची सुनावणी घेणाऱ्या सात सदस्य समितीचा अहवाल एकच असणे कायद्याने बंधनकारक असताना, प्रत्यक्षात समितीचे दोन स्वतंत्र अहवाल प्रशासनास सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन स्वतंत्र अहवालावर निर्णय घेण्याचा अधिकार नियोजन प्राधिकरणाला (मुख्यसभा) नाही. त्यामुळे हा विकास आराखडा राज्य शासनाने ताब्यात घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी पुणे बचाव समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आराखड्यावरील अहवाल सादर करणाऱ्या नियोजन समितीबाबत महाराष्ट्र नगररचना अधिनियम २८ (४) मध्ये नियोजन समितीकडून सादर केल्या जाणाऱ्या अहवालाचा उल्लेख ‘नियोजन समितीचा अहवाल’ असा असल्याने दोन अहवाल कायद्यात अभिप्रेत नाहीत. तसेच, अहवाल सादर करण्याची मुदत डिसेंबर २०१४ मध्येच संपली होती. त्यानंतर मुख्यसभेने अद्याप ही मुदत वाढवून दिलेली नसताना, मुदतवाढ तसेच अहवालांचा प्रस्ताव एकाच सभेत घेण्यात आला आहे. ही बाब चुकीची असल्याने राज्य शासनाने हा आराखडा ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करावी, असे पत्र समितीचे उज्ज्वल केसकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले आहेत.४डीपीवर ८४ हजार हरकती नोंदविण्यात आल्या. डीपीनुसार मध्यवस्तीमध्ये, तसेच उर्वरित शहरात रस्तारूंदीकरणासाठी अनेक इमारती बाधित होत होत्या. त्यामुळे त्यावर हरकतींचा पाऊस पुणेकरांनी पाडला. एकूण हरकतीपैकी सुमारे ७० टक्के हरकती या त्याबाबतच होत्या. त्याशिवाय आलेल्या हरकतींमध्ये वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी होत्या. त्या सर्वांचा समितीने सखोल विचार करून निर्णय घेण्यात आले.९ महिने चालले काम४डीपीवर नोंदविण्यात आलेल्या ८४ हजार हरकतींची सुनावणी करून त्यावर मुख्य सभेकडे करावयाच्या शिफारशींचा अहवाल तयार करण्याचे नियोजन समितीचे काम ९ महिने चालले. त्यात आचारसंहितेच्या काळात निर्णय घेता येत नसल्याने काम थांबवावे लागले होते. समितीच्या सदस्यांना एकूण ८ हजार पानांवर ठिकठिकाणी सह्या करून अहवाल तयार करावा लागला. निवृत्त नगररचना उपसंचालक ए. आर. पाथकर यांना यापूर्वी डीपी तयार करण्याचा अनुभव असल्याने त्यांनी यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.डीपीतील प्रमुख शिफारशी४मध्यवस्तीमध्ये घरमालकांना दोन, तर भाडेकरूंना अर्धा, असे अडीच एफएसआय.४मेट्रोमार्गावर चारऐवजी तीन एफएसआय.४रस्तारूंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्यांना मोठा दिलासा.४सोसायट्यांच्या पुनर्विकासासाठी ०.३३ टक्के एफएसआय मिळणार.४छोट्या जागेतील भाडेकरूला किमान २५० स्क्वेअर फुटाचे घर देणे बंधनकारक.४बांधकामांची नियमावली सुटसुटीत होणार.४नदीकाठचा लकडी पूल ते शनिवारवाडा रस्ता वगळण्याची शिफारस.शहराच्या हितासाठीच दुसरा अहवालनियोजन समितीमधील तज्ज्ञ सदस्य सारंग यादवाडकर, डॉ. सचिन पुणेकर, प्रा. अख्तर चौहान यांनी डीपीवरील हरकतींवर स्वतंत्रपणे २९ पानांचा अहवाल दिलेला आहे. याबाबत सारंग यादवाडकर यांनी सांगितले की, ‘‘जुन्या हदद्ीच्या विकास आराखडयावरील सुनावणी झाल्यानंतर अहवाल पूर्ण करूनच आमच्यापुढे ठेवण्यात आला, त्याचा अभ्यास करायलाही पुरेसा वेळ मिळाला नाही. इतर सदस्यांनी तयार केलेल्या या अहवालाशी पूर्ण मतभेद नसले तरी काही बाबतीत वेगळी मते असल्याने ती स्वतंत्रपणे मांडण्यात आली आहेत. शहराच्या पुढील २० वर्षाचा विचार करून दूरदृष्टिने निर्णय घ्यायला हवे असतात त्याचबरोबर नगररचनेचे नॉर्मचा विचार व्हायला हवा असतो. प्रशासनाने मॅप तयार करताना अनेक चुका केल्या होत्या. कचऱ्याच्या प्रश्नावर गांभीर्याने विचार व्हायला हवा होता यासह महत्त्वाचे वाटलेले इतर मुदद्े स्वतंत्रपणे मांडण्यात आले आहे.’’