शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
7
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
8
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
9
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
10
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
11
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
12
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
13
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
14
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
15
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
16
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
17
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
18
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
19
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
20
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली

लोणेरे विद्यापीठाकडे शासनाचे दुर्लक्षच

By admin | Updated: November 2, 2015 01:07 IST

तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने होणाऱ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ स्थापन करण्यात आले

पुणे : तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने होणाऱ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ स्थापन करण्यात आले. परंतु, स्थापनेपासून शासनाचे विद्यापीठाकडे दुर्लक्ष झाले. तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठाकडे केवळ एक लहान महाविद्यालय म्हणूनच पाहिले. परिणामी विद्यापीठात पायाभूत व शैक्षणिक सुविधांचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने विद्यापीठाकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.विद्यापीठाची स्थापना १९८९ मध्ये करण्यात आली. मात्र, त्यानंतर शासनाने या विद्यापीठाच्या विकासासाठी ठोस पावले उचलली नाहीत. विद्यापीठात कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी या प्रमुख पदांसह शासनाने मंजूर केलेल्या पदांपैकी तब्बल ५० टक्के पदे रिक्त आहेत. विद्यापीठासाठी सुमारे ५०० एकर जागा राखून ठेवण्यात आली आहे. मात्र, परिसरात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सोय, अत्याधुनिक रुणालये आदींचा विचार झालेला नाही. परिणामी या क्षेत्रातील तज्ज्ञ प्राध्यापक येथे येत नाहीत. परंतु, विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच येथील १० विद्यार्थ्यांना शुक्रवारी पॉस्को कंपनीतर्फे तब्बल ५०० डॉलरची पाठ्यवृत्ती देण्यात आली. त्यामुळे विद्यापीठाचे अधिकारी आणि विद्यार्थ्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या सर्व महाविद्यालयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी जोडण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला आहे. मात्र, विद्यापीठाची एकूण स्थिती विचारात घेता सर्व महाविद्यालयांना विद्यापीठाशी संलग्न केल्यास राज्यातील तंत्रशिक्षणाचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय स्थगित ठेवला आहे. तंत्रशिक्षण विभागाकडे प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चिती व पदोन्नतीचे प्रश्न प्रलंबित असून, अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नवीन अभ्यासक्रम सुरू करणे शक्य होत नाही. येथील स्थानिक विद्यापीठाचा उल्लेख लोणेरे कॉलेज असाच करतात. एकूण अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी सर्वाधिक महाविद्यालये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. या महाविद्यालयांना लोणेरे विद्यापीठाशी संलग्न करण्यास संस्थाचालकांचा विरोध आहे. मात्र, तंत्रशिक्षणात सुसूत्रता आणण्यासाठी सर्व महाविद्यालये जोडण्याबाबत शासनाने सकारात्मक विचार सुरू केला आहे.