शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार निष्क्रिय

By admin | Updated: May 20, 2016 02:19 IST

राज्यातील जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे

शिरूर : राज्यातील जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सगळीकडे भीषण दुष्काळ पडला आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. भाजपा-शिवसेना सरकारला उच्च न्यायालय यांना सांगावे लागते, ही अत्यंत दुर्दैवी बाब असून, हे सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप शिरूरचे माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी केला.शिरूर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन व्यवस्थित केले नाही, तर शिरूर तहसीलदार कार्यालयावर महामोर्चा काढण्याचा इशारा या वेळी त्यांनी दिला.या वेळी सरकारचा निषेध म्हणून रस्त्यांवर कांदा व दूध टाकून भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व शिरूर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी केले.या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, मंचर बाजार समिती चेअरमन देवदत्त निकम, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, पंचायत समिती सभापती सिद्धार्थ कदम, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष रविबापू काळे, युवकचे तालुकाध्यक्ष कुंडलिक शितोळे, शहराध्यक्ष जाकीर खान पठाण, युवकचे शहराध्यक्ष रंजन झांबरे, बाळासाहेब नरके, घोडगंगा कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब फराटे, शेखर पाचुंदकर, शिक्षण मंडळ माजी सभापती नीलेश खाबीया, खरेदी-विक्री चेअरमन बाळासाहेब नागवडे, उपसभापती मंगलाताई लंघे, राजेंद्र गावडे, सोमनाथ भुजबळ, दत्ता हरगुडे, शिरूर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष वर्षाताई शिवले, संतोष रणदिवे, बाबासाहेब भोर, शैलेश घाडगे, सुधीर फराटे, जयवंत सालुंके, विकास लवांडे, दिलीप मोकाशी, सुधीर फराटे, जगन्नाथ पाचर्णे, पोपट दसगुडे, सुभाष कळसकर, विक्रम वर्पे, विलास कर्डिले उपस्थितीत होते. शिरूर-न्हावरे फाटा येथे पुणे-नगर रस्त्यावर दुतर्फा वाहनांची रांग लागली होती. या वेळी भाजपा-शिवसेना सरकारचा निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. वोडाफोनला दोन हजार कोटींची सूट देणारे सरकार शेतकऱ्यांच्या कांदा, दूधदराच्या बाबतीत मूग गिळून गप्प का? असा सवाल करून, शेतकरी आत्महत्या करीत आहे. परंतु या सरकारला त्याचे देणे-घेणे नाही, असे मत अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.काळेधन आणणारे सरकार प्रत्येक नागरिकांच्या खात्यात पैसे टाकणारे व अच्छे दिन आणणारे सरकार गेले कुठे, कांद्याला बाजारभाव नाही, दुधाला बाजारभाव नाही, कर्जमाफी करणारे सरकार कुठे गेले, वीजमाफी सोडा, परंतु वीजबिलात अकरा टक्के वाढ केली आहे, ही दरवाढ शेतकरी यांनी भरू नये, कोणी अधिकारी बिल भरले नाही म्हणून वीज कनेक्शण तोडत असतील, तर युवक कॉँग्रेस त्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासेल.- मानसिंग पाचुंदकर, पुणे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस