शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
3
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
4
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
5
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
6
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
7
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
8
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
9
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
10
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
11
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
12
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
13
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
14
पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?
15
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
16
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
17
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
18
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
19
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
20
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार निष्क्रिय

By admin | Updated: May 20, 2016 02:19 IST

राज्यातील जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे

शिरूर : राज्यातील जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सगळीकडे भीषण दुष्काळ पडला आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. भाजपा-शिवसेना सरकारला उच्च न्यायालय यांना सांगावे लागते, ही अत्यंत दुर्दैवी बाब असून, हे सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप शिरूरचे माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी केला.शिरूर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन व्यवस्थित केले नाही, तर शिरूर तहसीलदार कार्यालयावर महामोर्चा काढण्याचा इशारा या वेळी त्यांनी दिला.या वेळी सरकारचा निषेध म्हणून रस्त्यांवर कांदा व दूध टाकून भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व शिरूर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी केले.या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, मंचर बाजार समिती चेअरमन देवदत्त निकम, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, पंचायत समिती सभापती सिद्धार्थ कदम, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष रविबापू काळे, युवकचे तालुकाध्यक्ष कुंडलिक शितोळे, शहराध्यक्ष जाकीर खान पठाण, युवकचे शहराध्यक्ष रंजन झांबरे, बाळासाहेब नरके, घोडगंगा कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब फराटे, शेखर पाचुंदकर, शिक्षण मंडळ माजी सभापती नीलेश खाबीया, खरेदी-विक्री चेअरमन बाळासाहेब नागवडे, उपसभापती मंगलाताई लंघे, राजेंद्र गावडे, सोमनाथ भुजबळ, दत्ता हरगुडे, शिरूर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष वर्षाताई शिवले, संतोष रणदिवे, बाबासाहेब भोर, शैलेश घाडगे, सुधीर फराटे, जयवंत सालुंके, विकास लवांडे, दिलीप मोकाशी, सुधीर फराटे, जगन्नाथ पाचर्णे, पोपट दसगुडे, सुभाष कळसकर, विक्रम वर्पे, विलास कर्डिले उपस्थितीत होते. शिरूर-न्हावरे फाटा येथे पुणे-नगर रस्त्यावर दुतर्फा वाहनांची रांग लागली होती. या वेळी भाजपा-शिवसेना सरकारचा निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. वोडाफोनला दोन हजार कोटींची सूट देणारे सरकार शेतकऱ्यांच्या कांदा, दूधदराच्या बाबतीत मूग गिळून गप्प का? असा सवाल करून, शेतकरी आत्महत्या करीत आहे. परंतु या सरकारला त्याचे देणे-घेणे नाही, असे मत अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.काळेधन आणणारे सरकार प्रत्येक नागरिकांच्या खात्यात पैसे टाकणारे व अच्छे दिन आणणारे सरकार गेले कुठे, कांद्याला बाजारभाव नाही, दुधाला बाजारभाव नाही, कर्जमाफी करणारे सरकार कुठे गेले, वीजमाफी सोडा, परंतु वीजबिलात अकरा टक्के वाढ केली आहे, ही दरवाढ शेतकरी यांनी भरू नये, कोणी अधिकारी बिल भरले नाही म्हणून वीज कनेक्शण तोडत असतील, तर युवक कॉँग्रेस त्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासेल.- मानसिंग पाचुंदकर, पुणे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस