शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

‘भारतरत्न’ पंडित भीमसेन जोशींच्या जन्मशताब्दीचा शासनाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:20 IST

पुणे : सुरांची दैवी देणगी लाभलेल्या आणि भारतीय अभिजात संगीताच्या सर्वोच्च शिखरावर अखंडपणे तळपत राहणाऱ्या ‘स्वरभास्करा’च्या जन्मशताब्दी वर्षास उद्यापासून ...

पुणे : सुरांची दैवी देणगी लाभलेल्या आणि भारतीय अभिजात संगीताच्या सर्वोच्च शिखरावर अखंडपणे तळपत राहणाऱ्या ‘स्वरभास्करा’च्या जन्मशताब्दी वर्षास उद्यापासून (दि. ४) प्रारंभ होत आहे. ‘भारतीय शास्त्रीय संगीताचा मानदंड’, ‘भारतीय शास्त्रीय संगीताचा अध्वर्यू’ अशा अनेक बिरुदांबरोबरच ‘भारतरत्न’ ही उपाधी देखील पंडितजींच्या नावामागे जोडली गेली. ज्या शासनाने त्यांना हा सर्वोच्च किताब बहाल केला, त्या केंद्रच काय पण राज्य सरकारला देखील त्यांच्या जन्मशताब्दीचा विसर पडल्याने पंडितजींच्या शिष्यवर्गातून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.

पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९२२ रोजी कर्नाटकमधील गदग येथे झाला. उद्या पंडितजींची ९९ वी जयंती असून, त्यांच्या जन्मशताब्दीस सुरुवात होत आहे. पंडितजींनी आयुष्यभर गानसेवेतून रसिकांना ब्रह्मानंद दिला. पुण्यात ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची मुहूर्तमेढ रोवली. आपल्या अद्वितीय सुरांनी पंडित भीमसेन जोशी यांनी शेवटच्या श्वासापर्यंत अखंडपणे ‘गानयज्ञ’ सुरू ठेवला. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शासनातर्फे वर्षभर विविध कार्यक्रम केले जावेत किंवा एखादा पुरस्कार सुरू करावा अथवा एखादा विशेषांक तरी प्रसिद्ध करावा, अशी त्यांच्या शिष्यांची इच्छा आहे. तसेच, रसिकमनावर सुरांची मनसोक्त पखरण करणाऱ्या पंडितजींच्या कार्याची दखल घेऊन किमान तीन दिवस महोत्सव आयोजित केला जावा अशी रसिकांची अपेक्षा आहे. मात्र, अद्याप तरी शासन स्तरावर कोणतीच घोषणा झालेली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

---

पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, कोरोनामुळे तूर्तास तरी मोठा कार्यक्रम घेणे शक्य नाही.

- विभीषण चावरे, संचालक, राज्य कार्य संचालनालय

---

शासनाने पंडितजींच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. त्याकरिता आम्ही काही मंत्र्यांच्याही भेटीगाठी घेतल्या. मात्र, पुढे काहीच घडलं नाही.

- पं. उपेंद्र भट, शिष्य पं. भीमसेन जोशी