शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

देशी भाज्यांना परदेशातही चांगली पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भारतामधील भाज्यांना परदेशातही चांगली पसंती मिळत आहे. त्यातही महाराष्ट्र आघाडीवर असून येत्या काही वर्षात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भारतामधील भाज्यांना परदेशातही चांगली पसंती मिळत आहे. त्यातही महाराष्ट्र आघाडीवर असून येत्या काही वर्षात उद्दिष्ट वाढवण्यावर भर दिला जात आहे.

भेंडी, मिरची, कारले, काकडी, गाजर, बीट, पालक, मेथी, सुरण, बटाटा या भाज्यांना जगातील ७० ते ८० देशांमध्ये चांगली मागणी आहे. देशाची या भाज्यांची निर्यात सध्या ३ ते ४ लाख मेट्रिक टन आहे. त्यातील ५० ते ५५ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. राज्यातील साधारण अडीच हजार शेतकरी सध्या भाज्यांच्या निर्यातीत आहेत. नाशिक, सोलापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, बीड, भंडारा, ठाणे, अमरावती या जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे.

देशातील शेतीमाल निर्यातीसाठी एपेडा ही संस्था केंद्र सरकारने स्थापन केली आहे. त्यांच्या व्हेजनेट या उपक्रमाच्या माध्यमातून राज्य सरकारचा कृषी विभाग व निर्यात कक्ष महाराष्ट्राची भाज्यांमधील निर्यात अधिक वाढावी यासाठी प्रयत्न करत आहे.

परदेशात पाठवण्यात येणाऱ्या भाज्यांचे निकष पाळणे महत्वाचे असते. त्यासाठी शेतक-यांनी भाज्यांची लागवड करण्याआधी व्हेजनेटवर त्यांच्या शेतीक्षेत्राची नोंदणी करणे आवश्यक असते. ही नोंदणी झाली की व्हेजनेटच्या माध्यमातून संबधित शेतक-याला कोणती खते किती प्रमाणात वापरायची, बियाणे कोणते वापरायचे याची माहिती दिली जाते. निर्यातदार कंपनीची निवड, भाज्यांचे पॅकिंग, त्या कुठे पाठवायच्या, कशाने पाठवायच्या, त्यासाठीची प्रक्रिया या सर्व स्तरावर व्हेजनेटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाते.

राज्यातील भाज्या सर्व निकषांवर पार पडत असल्याने आता निर्यातक्षम भाज्यांचे क्षेत्र वाढवण्यावर भर दिला जात असल्याची माहिती राज्याच्या निर्यात कक्षाचे सल्लागार गोविंद हांडे यांनी दिली. कांद्याची निर्यातही राज्यातून जास्त प्रमाणात होते. देशातून १२ ते १३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात होतो. त्यातील निम्मा वाटा राज्याचा आहे.