शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

देशी भाज्यांना परदेशातही चांगली पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भारतामधील भाज्यांना परदेशातही चांगली पसंती मिळत आहे. त्यातही महाराष्ट्र आघाडीवर असून येत्या काही वर्षात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भारतामधील भाज्यांना परदेशातही चांगली पसंती मिळत आहे. त्यातही महाराष्ट्र आघाडीवर असून येत्या काही वर्षात उद्दिष्ट वाढवण्यावर भर दिला जात आहे.

भेंडी, मिरची, कारले, काकडी, गाजर, बीट, पालक, मेथी, सुरण, बटाटा या भाज्यांना जगातील ७० ते ८० देशांमध्ये चांगली मागणी आहे. देशाची या भाज्यांची निर्यात सध्या ३ ते ४ लाख मेट्रिक टन आहे. त्यातील ५० ते ५५ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. राज्यातील साधारण अडीच हजार शेतकरी सध्या भाज्यांच्या निर्यातीत आहेत. नाशिक, सोलापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, बीड, भंडारा, ठाणे, अमरावती या जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे.

देशातील शेतीमाल निर्यातीसाठी एपेडा ही संस्था केंद्र सरकारने स्थापन केली आहे. त्यांच्या व्हेजनेट या उपक्रमाच्या माध्यमातून राज्य सरकारचा कृषी विभाग व निर्यात कक्ष महाराष्ट्राची भाज्यांमधील निर्यात अधिक वाढावी यासाठी प्रयत्न करत आहे.

परदेशात पाठवण्यात येणाऱ्या भाज्यांचे निकष पाळणे महत्वाचे असते. त्यासाठी शेतक-यांनी भाज्यांची लागवड करण्याआधी व्हेजनेटवर त्यांच्या शेतीक्षेत्राची नोंदणी करणे आवश्यक असते. ही नोंदणी झाली की व्हेजनेटच्या माध्यमातून संबधित शेतक-याला कोणती खते किती प्रमाणात वापरायची, बियाणे कोणते वापरायचे याची माहिती दिली जाते. निर्यातदार कंपनीची निवड, भाज्यांचे पॅकिंग, त्या कुठे पाठवायच्या, कशाने पाठवायच्या, त्यासाठीची प्रक्रिया या सर्व स्तरावर व्हेजनेटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाते.

राज्यातील भाज्या सर्व निकषांवर पार पडत असल्याने आता निर्यातक्षम भाज्यांचे क्षेत्र वाढवण्यावर भर दिला जात असल्याची माहिती राज्याच्या निर्यात कक्षाचे सल्लागार गोविंद हांडे यांनी दिली. कांद्याची निर्यातही राज्यातून जास्त प्रमाणात होते. देशातून १२ ते १३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात होतो. त्यातील निम्मा वाटा राज्याचा आहे.