शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
2
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
3
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
4
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
5
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
6
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
7
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
8
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
9
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
10
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
11
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
12
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
13
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
15
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
16
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
17
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
18
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
19
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
20
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...

वाचकांना नवं काही दिल्यास वाचनसंस्कृतीला बळकटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सध्याचे वाचन हे केवळ पुस्तकांपुरतेच मर्यादित राहिलेले नाही. सोशल मीडिया, इ-बुक च्या माध्यमातून वाचकवर्ग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सध्याचे वाचन हे केवळ पुस्तकांपुरतेच मर्यादित राहिलेले नाही. सोशल मीडिया, इ-बुक च्या माध्यमातून वाचकवर्ग विस्तारलेला आहे. तो नवनवीन चांगल्या गोष्टींच्या शोधात आहे. त्यामुळे यापुढील काळात नवं काय देता येईल? याचा विचार लेखकांनी केला पाहिजे. मल्टीचँनेलमधून वाचनसंस्कृतीच्या बळकटीकरिता प्रयत्न होणे आवश्यक आहे, असा सूर साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून ‘मराठी वाचक काय वाचतात’ या चर्चासत्रात रविवारी उमटला.

पुणे लिटररी फेस्टिव्हलतर्फे आयोजित या चर्चासत्रात विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे संपादक मनोहर सोनावणे, ’रहस्य’ कादंबरीचे लेखक गणेश महादेव आणि प्रसिद्ध लेखिका डॉ. चित्रलेखा पुरंदरे सहभागी झाले होते. विश्वास

देशपांडे यांनी चर्चासत्रामध्ये मान्यवरांशी संवाद साधला.

गेल्या चार दशकांपासून पुस्तक निर्मिती, लेखन व संपादन क्षेत्रात कार्यरत आहेत. तेव्हापासूनच मराठीत कुणी वाचत नाही असे वारंवार म्हटले जात आहे. तरीही लेखक लेखन करीत आहेत आणि पुस्तकं वाचली जात आहेत. मग खरंच प्रश्न पडतो वाचक वाचत नाहीत का? याचं उत्तर म्हणजे वाचक कमी झालेला नाही तर तो वाढलेला आहे. पण त्या तुलनेत वाचन वाढलेले नाही. वाचकांचे चार प्रकार पाहायला मिळतात. त्यात मंद वाचक (नवखा), गोंधळेला वाचक, भान असलेला वाचक आणि प्रगल्भ वाचक यांचा समावेश आहे. वाचनाचा प्रवास हा मंदापासून प्रगल्भ वाचकांपर्यंत व्हायला हवा. मात्र दुस-या स्तरावरचा जो गोंधळलेला वाचक आहे. त्याची संख्या जास्त आहे. जे मिळेल ते झटपट मिळवण्याच्या तो मागे असतो. गाईड, युजर फ्रेंडली पुस्तकांमध्ये तो अधिक रमतो. त्यामुळे प्रगल्भ वाचक वाढला तरच वाचन वाढले असे म्हणता येईल.

गणेश महादेव यांनी त्यांच्या ’रहस्य’ या कादंबरीने लॉकडाऊन काळात 2000 चा टप्पा पूर्ण केला असल्याचे सांगितले. लेखकांनी नवीन काही दिले तर वाचक नक्की प्रतिसाद देतात. महाराष्ट्राला ऐतिहासिक स्थळांचा वारसा आहे. वाचक इतिहासाशी जोडला जाणे आवश्यक आहे. यासाठी इतिहासातील दंतकथा, पुराणकथा यांची पुनर्मांडणी करणारे साहित्य निर्माण होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

पालकांनी मुलांना बालवाडमयाची गोडी लावायला हवी. यासाठी पुस्तकांवर चर्चा, नाट्यरूपांतर, स्पर्धा यावर भर द्यायला हवा याकडे डॉ चित्रलेखा पुरंदरे यांनी लक्ष वेधले.

------------------------