शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

वाचकांना नवं काही दिल्यास वाचनसंस्कृतीला बळकटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सध्याचे वाचन हे केवळ पुस्तकांपुरतेच मर्यादित राहिलेले नाही. सोशल मीडिया, इ-बुक च्या माध्यमातून वाचकवर्ग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सध्याचे वाचन हे केवळ पुस्तकांपुरतेच मर्यादित राहिलेले नाही. सोशल मीडिया, इ-बुक च्या माध्यमातून वाचकवर्ग विस्तारलेला आहे. तो नवनवीन चांगल्या गोष्टींच्या शोधात आहे. त्यामुळे यापुढील काळात नवं काय देता येईल? याचा विचार लेखकांनी केला पाहिजे. मल्टीचँनेलमधून वाचनसंस्कृतीच्या बळकटीकरिता प्रयत्न होणे आवश्यक आहे, असा सूर साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून ‘मराठी वाचक काय वाचतात’ या चर्चासत्रात रविवारी उमटला.

पुणे लिटररी फेस्टिव्हलतर्फे आयोजित या चर्चासत्रात विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे संपादक मनोहर सोनावणे, ’रहस्य’ कादंबरीचे लेखक गणेश महादेव आणि प्रसिद्ध लेखिका डॉ. चित्रलेखा पुरंदरे सहभागी झाले होते. विश्वास

देशपांडे यांनी चर्चासत्रामध्ये मान्यवरांशी संवाद साधला.

गेल्या चार दशकांपासून पुस्तक निर्मिती, लेखन व संपादन क्षेत्रात कार्यरत आहेत. तेव्हापासूनच मराठीत कुणी वाचत नाही असे वारंवार म्हटले जात आहे. तरीही लेखक लेखन करीत आहेत आणि पुस्तकं वाचली जात आहेत. मग खरंच प्रश्न पडतो वाचक वाचत नाहीत का? याचं उत्तर म्हणजे वाचक कमी झालेला नाही तर तो वाढलेला आहे. पण त्या तुलनेत वाचन वाढलेले नाही. वाचकांचे चार प्रकार पाहायला मिळतात. त्यात मंद वाचक (नवखा), गोंधळेला वाचक, भान असलेला वाचक आणि प्रगल्भ वाचक यांचा समावेश आहे. वाचनाचा प्रवास हा मंदापासून प्रगल्भ वाचकांपर्यंत व्हायला हवा. मात्र दुस-या स्तरावरचा जो गोंधळलेला वाचक आहे. त्याची संख्या जास्त आहे. जे मिळेल ते झटपट मिळवण्याच्या तो मागे असतो. गाईड, युजर फ्रेंडली पुस्तकांमध्ये तो अधिक रमतो. त्यामुळे प्रगल्भ वाचक वाढला तरच वाचन वाढले असे म्हणता येईल.

गणेश महादेव यांनी त्यांच्या ’रहस्य’ या कादंबरीने लॉकडाऊन काळात 2000 चा टप्पा पूर्ण केला असल्याचे सांगितले. लेखकांनी नवीन काही दिले तर वाचक नक्की प्रतिसाद देतात. महाराष्ट्राला ऐतिहासिक स्थळांचा वारसा आहे. वाचक इतिहासाशी जोडला जाणे आवश्यक आहे. यासाठी इतिहासातील दंतकथा, पुराणकथा यांची पुनर्मांडणी करणारे साहित्य निर्माण होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

पालकांनी मुलांना बालवाडमयाची गोडी लावायला हवी. यासाठी पुस्तकांवर चर्चा, नाट्यरूपांतर, स्पर्धा यावर भर द्यायला हवा याकडे डॉ चित्रलेखा पुरंदरे यांनी लक्ष वेधले.

------------------------