शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:15 IST

अण्णा भाऊंच्या शाहिरी आणि साहित्यनिर्मितीने मराठी साहित्य आणि संस्कृती विश्व कायमच प्रभावित केले असून, त्यांच्या लेखणीतून जागतिक कर्तृत्व लक्षात घेऊन निदान मृत्यूनंतर तरी त्यांना मरणोत्तर भारतरत्न

पुणे : अण्णा भाऊंच्या शाहिरी आणि साहित्यनिर्मितीने मराठी साहित्य आणि संस्कृती विश्व कायमच प्रभावित केले असून, त्यांच्या लेखणीतून जागतिक कर्तृत्व लक्षात घेऊन निदान मृत्यूनंतर तरी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवांकित करावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षडॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली.अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे या प्रमुख मागणीकडे राज्य आणिकेंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक-अध्यक्षभगवान वैराट यांच्या नेतृत्वाखाली आयोजित साहित्यिक क्रांतिज्योत दिंडीचा समारोप सोमवारी झाला,त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून तेबोलत होते.सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मगावातून२६ जुलै रोजी निघालेल्या या साहित्यिक क्रांतिज्योत आणण्यात आली. सारसबागेसमोरील अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित या कार्यक्रमाला साहित्यिक रतनलाल सोनग्रा, उपमाहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रवींद्र माळवदकर, रूपाली चाकणकर, अशोक राठी, महंमद शेख, दत्ता सायकर, वामन कदम, सुनीता अडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते.भगवान वैराट म्हणाले, ‘‘वाटेगाव या अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मगावातून निघालेल्या साहित्यिक क्रांतिज्योत माजी खासदारजयवंतराव आवळे यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. या दिंडीत सुमारे ५०० कार्यकर्त्यांचा समावेश होता. ज्योत घेऊन दिंडीच्या अग्रभागी असलेल्या कार्यकर्यांनी संपूर्ण दिंडी मार्गावर अण्णा भाऊ साठे यांचा जयघोष केला. वाटेगाव येथून निघालेल्या या दिंडीचे कराड-सातारा-कवठे-खंडाळा-शिरवळ-राजगड साखर कारखाना-निघडे-खेड शिवापूर आणि कात्रज मार्गे पुणे येथेआगमन झाले.संपूर्ण दिंडीदरम्यान त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक राजकीय, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी दिंडीचे स्वागत करून अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन केले. तसेच, अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा, ही मागणी असून तिला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. काशिनाथ गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.