शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकारने तिजोरी उघडली
3
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
4
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
5
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
6
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
7
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
8
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
9
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
10
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
11
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
12
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
13
बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...
14
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
16
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
17
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
18
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
19
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
20
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर

अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:15 IST

अण्णा भाऊंच्या शाहिरी आणि साहित्यनिर्मितीने मराठी साहित्य आणि संस्कृती विश्व कायमच प्रभावित केले असून, त्यांच्या लेखणीतून जागतिक कर्तृत्व लक्षात घेऊन निदान मृत्यूनंतर तरी त्यांना मरणोत्तर भारतरत्न

पुणे : अण्णा भाऊंच्या शाहिरी आणि साहित्यनिर्मितीने मराठी साहित्य आणि संस्कृती विश्व कायमच प्रभावित केले असून, त्यांच्या लेखणीतून जागतिक कर्तृत्व लक्षात घेऊन निदान मृत्यूनंतर तरी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवांकित करावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षडॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली.अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे या प्रमुख मागणीकडे राज्य आणिकेंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक-अध्यक्षभगवान वैराट यांच्या नेतृत्वाखाली आयोजित साहित्यिक क्रांतिज्योत दिंडीचा समारोप सोमवारी झाला,त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून तेबोलत होते.सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मगावातून२६ जुलै रोजी निघालेल्या या साहित्यिक क्रांतिज्योत आणण्यात आली. सारसबागेसमोरील अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित या कार्यक्रमाला साहित्यिक रतनलाल सोनग्रा, उपमाहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रवींद्र माळवदकर, रूपाली चाकणकर, अशोक राठी, महंमद शेख, दत्ता सायकर, वामन कदम, सुनीता अडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते.भगवान वैराट म्हणाले, ‘‘वाटेगाव या अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मगावातून निघालेल्या साहित्यिक क्रांतिज्योत माजी खासदारजयवंतराव आवळे यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. या दिंडीत सुमारे ५०० कार्यकर्त्यांचा समावेश होता. ज्योत घेऊन दिंडीच्या अग्रभागी असलेल्या कार्यकर्यांनी संपूर्ण दिंडी मार्गावर अण्णा भाऊ साठे यांचा जयघोष केला. वाटेगाव येथून निघालेल्या या दिंडीचे कराड-सातारा-कवठे-खंडाळा-शिरवळ-राजगड साखर कारखाना-निघडे-खेड शिवापूर आणि कात्रज मार्गे पुणे येथेआगमन झाले.संपूर्ण दिंडीदरम्यान त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक राजकीय, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी दिंडीचे स्वागत करून अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन केले. तसेच, अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा, ही मागणी असून तिला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. काशिनाथ गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.