शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

‘गझल’ला मानाचे पान मिळावे

By admin | Updated: January 13, 2017 03:33 IST

लेखनाच्या संख्येत वाढ झाली असली तरी गुणवत्तेत वाढ झालेली नाही. गझलकारांनी त्या-त्या कल्पना व प्रतिमांभोवती

पुणे : लेखनाच्या संख्येत वाढ झाली असली तरी गुणवत्तेत वाढ झालेली नाही. गझलकारांनी त्या-त्या कल्पना व प्रतिमांभोवती न फिरता नाविन्याचा शोध घ्यायला हवा. तसेच गझल काव्यप्रकाराला जागतिक संस्कृतीमध्ये नामाचे नाही तर मानाचे पान मिळाले पाहिजे; तेव्हाच गझलेचा जागतिक संचार झाला असे म्हणता येईल, असे मत ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी गुरुवारी व्यक्त केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त आयोजित ‘मराठी गझलेचा जागतिक संचार’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी काळे बोलत होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू , अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, मराठी विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश संगोलेकर उपस्थित होते.गझल हे वृत्त नाही तर एक काव्य प्रकार आहे, असे नमूद करून काळे म्हणाले, ‘‘गालिब, सुरेश भट यांच्या लेखनाचा आत्ताच्या मराठी गझलकारांवर मोठा परिणाम झालेला दिसून येतो. गझलेच्या काही जमेच्या बाजू असून काही मर्यादा आहेत. गझल लेखन तंत्रशुद्ध असले पाहिजे. त्यात तंत्रशरणता येऊ नये. कवीचे हृदय जळणार नाही तोपर्यंत खरी कविता निर्माण होणार नाही. त्यामुळे वरवरचा अनुभव व्यक्त न करता अनुभूतीच्या डोहामध्ये गझलकारांना उतरता आले पाहिजे.’’श्रीपाद जोशी म्हणाले, ‘‘गझल हा वाङ्मय प्रकार नाही तर ती एक संस्कृती आहे. अरब जगतात गझल या वाङ्मय प्रकाराचे रक्षण करण्यासाठी मोठी चळवळ चालू आहे. त्यामुळे वरवर विचार न करता  गझलेच्या आत्म्याचा विचार केला पाहिजे.’’प्रास्तविकात सांगोलेकर यांनी चर्चासत्राच्या आयोजनाची भूमिका मांडली. या प्रसंगी त्यांच्या मराठी गझल प्रवाह आणि प्रवृत्ती या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. (प्रतिनिधी)