शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
5
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
6
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
7
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
8
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
9
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
10
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
13
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
14
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
15
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
16
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
17
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
18
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
19
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

‘गझल’ला मानाचे पान मिळावे

By admin | Updated: January 13, 2017 03:33 IST

लेखनाच्या संख्येत वाढ झाली असली तरी गुणवत्तेत वाढ झालेली नाही. गझलकारांनी त्या-त्या कल्पना व प्रतिमांभोवती

पुणे : लेखनाच्या संख्येत वाढ झाली असली तरी गुणवत्तेत वाढ झालेली नाही. गझलकारांनी त्या-त्या कल्पना व प्रतिमांभोवती न फिरता नाविन्याचा शोध घ्यायला हवा. तसेच गझल काव्यप्रकाराला जागतिक संस्कृतीमध्ये नामाचे नाही तर मानाचे पान मिळाले पाहिजे; तेव्हाच गझलेचा जागतिक संचार झाला असे म्हणता येईल, असे मत ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी गुरुवारी व्यक्त केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त आयोजित ‘मराठी गझलेचा जागतिक संचार’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी काळे बोलत होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू , अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, मराठी विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश संगोलेकर उपस्थित होते.गझल हे वृत्त नाही तर एक काव्य प्रकार आहे, असे नमूद करून काळे म्हणाले, ‘‘गालिब, सुरेश भट यांच्या लेखनाचा आत्ताच्या मराठी गझलकारांवर मोठा परिणाम झालेला दिसून येतो. गझलेच्या काही जमेच्या बाजू असून काही मर्यादा आहेत. गझल लेखन तंत्रशुद्ध असले पाहिजे. त्यात तंत्रशरणता येऊ नये. कवीचे हृदय जळणार नाही तोपर्यंत खरी कविता निर्माण होणार नाही. त्यामुळे वरवरचा अनुभव व्यक्त न करता अनुभूतीच्या डोहामध्ये गझलकारांना उतरता आले पाहिजे.’’श्रीपाद जोशी म्हणाले, ‘‘गझल हा वाङ्मय प्रकार नाही तर ती एक संस्कृती आहे. अरब जगतात गझल या वाङ्मय प्रकाराचे रक्षण करण्यासाठी मोठी चळवळ चालू आहे. त्यामुळे वरवर विचार न करता  गझलेच्या आत्म्याचा विचार केला पाहिजे.’’प्रास्तविकात सांगोलेकर यांनी चर्चासत्राच्या आयोजनाची भूमिका मांडली. या प्रसंगी त्यांच्या मराठी गझल प्रवाह आणि प्रवृत्ती या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. (प्रतिनिधी)