शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

‘गझल’ला मानाचे पान मिळावे

By admin | Updated: January 13, 2017 03:33 IST

लेखनाच्या संख्येत वाढ झाली असली तरी गुणवत्तेत वाढ झालेली नाही. गझलकारांनी त्या-त्या कल्पना व प्रतिमांभोवती

पुणे : लेखनाच्या संख्येत वाढ झाली असली तरी गुणवत्तेत वाढ झालेली नाही. गझलकारांनी त्या-त्या कल्पना व प्रतिमांभोवती न फिरता नाविन्याचा शोध घ्यायला हवा. तसेच गझल काव्यप्रकाराला जागतिक संस्कृतीमध्ये नामाचे नाही तर मानाचे पान मिळाले पाहिजे; तेव्हाच गझलेचा जागतिक संचार झाला असे म्हणता येईल, असे मत ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी गुरुवारी व्यक्त केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त आयोजित ‘मराठी गझलेचा जागतिक संचार’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी काळे बोलत होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू , अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, मराठी विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश संगोलेकर उपस्थित होते.गझल हे वृत्त नाही तर एक काव्य प्रकार आहे, असे नमूद करून काळे म्हणाले, ‘‘गालिब, सुरेश भट यांच्या लेखनाचा आत्ताच्या मराठी गझलकारांवर मोठा परिणाम झालेला दिसून येतो. गझलेच्या काही जमेच्या बाजू असून काही मर्यादा आहेत. गझल लेखन तंत्रशुद्ध असले पाहिजे. त्यात तंत्रशरणता येऊ नये. कवीचे हृदय जळणार नाही तोपर्यंत खरी कविता निर्माण होणार नाही. त्यामुळे वरवरचा अनुभव व्यक्त न करता अनुभूतीच्या डोहामध्ये गझलकारांना उतरता आले पाहिजे.’’श्रीपाद जोशी म्हणाले, ‘‘गझल हा वाङ्मय प्रकार नाही तर ती एक संस्कृती आहे. अरब जगतात गझल या वाङ्मय प्रकाराचे रक्षण करण्यासाठी मोठी चळवळ चालू आहे. त्यामुळे वरवर विचार न करता  गझलेच्या आत्म्याचा विचार केला पाहिजे.’’प्रास्तविकात सांगोलेकर यांनी चर्चासत्राच्या आयोजनाची भूमिका मांडली. या प्रसंगी त्यांच्या मराठी गझल प्रवाह आणि प्रवृत्ती या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. (प्रतिनिधी)