शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

खानापूर वनक्षेत्रात साचू लागले कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:14 IST

खोडद : जुन्नर तालुक्यातील खानापूर जवळील वनक्षेत्रात सडलेले कांदे, मेलेली जनावरे, कचरा, दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिक आदी केरकचरा मोठ्या ...

खोडद : जुन्नर तालुक्यातील खानापूर जवळील वनक्षेत्रात सडलेले कांदे, मेलेली जनावरे, कचरा, दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिक आदी केरकचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात असल्याने या वनक्षेत्रात कचऱ्याचे ढीग पाहायला मिळू लागले आहे. या कचऱ्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून या प्रकाराकडे वन विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, यावर उपाययोजना करण्याबरोबरच कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होऊ लागली आहे.

मानमोडी डोंगररांगेच्या पायथ्याशी वनविभागाची वनजमीन आहे. या मानमोडी डोंगररांगेत भीमाशंकर लेणी समूह, अंबा अंबिका लेणी समूह, भूत लेणी समूह हे तीन बुद्धलेणी समूह आहेत. या लेण्यांकडे जाण्याचा मार्ग हा या वनक्षेत्रामधून आहे. या बुद्ध लेणी पाहण्यासाठी बाहेरून अनेक पर्यटक व अभ्यासक या ठिकाणी येत आहेत. पुरातत्त्व विभाग व वनविभागाने यांनी संयुक्तपणे बुद्धलेण्यांकडे जाणाऱ्या मार्ग स्वच्छ व सुरक्षित करावेत, ठिकठिकाणी माहिती फलक लावावेत व या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी अनेक दिवसांपासून पर्यटक व अभ्यासक करत आहेत.

या लेण्यांकडे जाणाऱ्या मार्गात काचा, प्लॅस्टिक ग्लास, दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि अन्य कचरा टाकला जात आहे. या ठिकाणी सडलेले कांदे देखील मोठ्या प्रमाणात टाकलेले आहेत. सडलेल्या या कांद्यांमुळे येथे दुर्गंधी पसरली आहे. मेलेली जनावरे देखील या ठिकाणी आणून टाकली जातात .महत्त्वाची बाब म्हणजे लेण्यांकडे जाणाऱ्या मार्गालगतच ही घाण टाकली जात असल्याने लेण्यांकडे जाताना अगदी सुरुवातीलाच ही घाण लक्ष वेधून घेते. या सर्व प्रकारामुळे बाहेरून येणारे पर्यटक व लेणी अभ्यासक नाराजी व्यक्त करत आहेत. पर्यटकांना सुरुवातीलाच लेणीच्या पायथ्याशी टाकण्यात आलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीला तसेच असुविधांना सामोरे जावे लागते. जुन्नरचा हा प्राचीन वारसा जगापुढे आणण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत, परंतु जुन्नर मध्ये आलेल्या पर्यटकांना या असुविधांमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

खानापूर जवळील मानमोडी डोंगररांगेत तीन लेणी समूह आहेत. हे लेणी समूह म्हणजे जागतिक कीर्तीचा असा वारसा आहे. पुरातत्त्व व वनविभागामार्फत येथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून इकडे येणारे पर्यटक कसे वाढतील, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र, पुरातत्त्व व वनविभागाकडून या परिसरात कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. बुद्धलेण्यांकडे जाणाऱ्या मार्गात जे अडथळे आहेत, त्याबाबत वनविभागाला निवेदन देणार आहोत.

- गणेश बिंबाजी वाव्हळ, अध्यक्ष, प्रबुद्ध भारत फाउंडेशन, जुन्नर

२३ खोडद

खानापूर वनक्षेत्रात टाकलेला कचरा.