शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
6
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
7
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
8
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
9
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
10
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
11
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
12
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
13
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
14
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
15
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
16
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
17
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
18
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
19
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
20
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग

खानापूर वनक्षेत्रात साचू लागले कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:14 IST

खोडद : जुन्नर तालुक्यातील खानापूर जवळील वनक्षेत्रात सडलेले कांदे, मेलेली जनावरे, कचरा, दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिक आदी केरकचरा मोठ्या ...

खोडद : जुन्नर तालुक्यातील खानापूर जवळील वनक्षेत्रात सडलेले कांदे, मेलेली जनावरे, कचरा, दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिक आदी केरकचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात असल्याने या वनक्षेत्रात कचऱ्याचे ढीग पाहायला मिळू लागले आहे. या कचऱ्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून या प्रकाराकडे वन विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, यावर उपाययोजना करण्याबरोबरच कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होऊ लागली आहे.

मानमोडी डोंगररांगेच्या पायथ्याशी वनविभागाची वनजमीन आहे. या मानमोडी डोंगररांगेत भीमाशंकर लेणी समूह, अंबा अंबिका लेणी समूह, भूत लेणी समूह हे तीन बुद्धलेणी समूह आहेत. या लेण्यांकडे जाण्याचा मार्ग हा या वनक्षेत्रामधून आहे. या बुद्ध लेणी पाहण्यासाठी बाहेरून अनेक पर्यटक व अभ्यासक या ठिकाणी येत आहेत. पुरातत्त्व विभाग व वनविभागाने यांनी संयुक्तपणे बुद्धलेण्यांकडे जाणाऱ्या मार्ग स्वच्छ व सुरक्षित करावेत, ठिकठिकाणी माहिती फलक लावावेत व या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी अनेक दिवसांपासून पर्यटक व अभ्यासक करत आहेत.

या लेण्यांकडे जाणाऱ्या मार्गात काचा, प्लॅस्टिक ग्लास, दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि अन्य कचरा टाकला जात आहे. या ठिकाणी सडलेले कांदे देखील मोठ्या प्रमाणात टाकलेले आहेत. सडलेल्या या कांद्यांमुळे येथे दुर्गंधी पसरली आहे. मेलेली जनावरे देखील या ठिकाणी आणून टाकली जातात .महत्त्वाची बाब म्हणजे लेण्यांकडे जाणाऱ्या मार्गालगतच ही घाण टाकली जात असल्याने लेण्यांकडे जाताना अगदी सुरुवातीलाच ही घाण लक्ष वेधून घेते. या सर्व प्रकारामुळे बाहेरून येणारे पर्यटक व लेणी अभ्यासक नाराजी व्यक्त करत आहेत. पर्यटकांना सुरुवातीलाच लेणीच्या पायथ्याशी टाकण्यात आलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीला तसेच असुविधांना सामोरे जावे लागते. जुन्नरचा हा प्राचीन वारसा जगापुढे आणण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत, परंतु जुन्नर मध्ये आलेल्या पर्यटकांना या असुविधांमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

खानापूर जवळील मानमोडी डोंगररांगेत तीन लेणी समूह आहेत. हे लेणी समूह म्हणजे जागतिक कीर्तीचा असा वारसा आहे. पुरातत्त्व व वनविभागामार्फत येथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून इकडे येणारे पर्यटक कसे वाढतील, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र, पुरातत्त्व व वनविभागाकडून या परिसरात कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. बुद्धलेण्यांकडे जाणाऱ्या मार्गात जे अडथळे आहेत, त्याबाबत वनविभागाला निवेदन देणार आहोत.

- गणेश बिंबाजी वाव्हळ, अध्यक्ष, प्रबुद्ध भारत फाउंडेशन, जुन्नर

२३ खोडद

खानापूर वनक्षेत्रात टाकलेला कचरा.