शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

खानापूर वनक्षेत्रात साचू लागले कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:14 IST

खोडद : जुन्नर तालुक्यातील खानापूर जवळील वनक्षेत्रात सडलेले कांदे, मेलेली जनावरे, कचरा, दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिक आदी केरकचरा मोठ्या ...

खोडद : जुन्नर तालुक्यातील खानापूर जवळील वनक्षेत्रात सडलेले कांदे, मेलेली जनावरे, कचरा, दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिक आदी केरकचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात असल्याने या वनक्षेत्रात कचऱ्याचे ढीग पाहायला मिळू लागले आहे. या कचऱ्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून या प्रकाराकडे वन विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, यावर उपाययोजना करण्याबरोबरच कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होऊ लागली आहे.

मानमोडी डोंगररांगेच्या पायथ्याशी वनविभागाची वनजमीन आहे. या मानमोडी डोंगररांगेत भीमाशंकर लेणी समूह, अंबा अंबिका लेणी समूह, भूत लेणी समूह हे तीन बुद्धलेणी समूह आहेत. या लेण्यांकडे जाण्याचा मार्ग हा या वनक्षेत्रामधून आहे. या बुद्ध लेणी पाहण्यासाठी बाहेरून अनेक पर्यटक व अभ्यासक या ठिकाणी येत आहेत. पुरातत्त्व विभाग व वनविभागाने यांनी संयुक्तपणे बुद्धलेण्यांकडे जाणाऱ्या मार्ग स्वच्छ व सुरक्षित करावेत, ठिकठिकाणी माहिती फलक लावावेत व या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी अनेक दिवसांपासून पर्यटक व अभ्यासक करत आहेत.

या लेण्यांकडे जाणाऱ्या मार्गात काचा, प्लॅस्टिक ग्लास, दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि अन्य कचरा टाकला जात आहे. या ठिकाणी सडलेले कांदे देखील मोठ्या प्रमाणात टाकलेले आहेत. सडलेल्या या कांद्यांमुळे येथे दुर्गंधी पसरली आहे. मेलेली जनावरे देखील या ठिकाणी आणून टाकली जातात .महत्त्वाची बाब म्हणजे लेण्यांकडे जाणाऱ्या मार्गालगतच ही घाण टाकली जात असल्याने लेण्यांकडे जाताना अगदी सुरुवातीलाच ही घाण लक्ष वेधून घेते. या सर्व प्रकारामुळे बाहेरून येणारे पर्यटक व लेणी अभ्यासक नाराजी व्यक्त करत आहेत. पर्यटकांना सुरुवातीलाच लेणीच्या पायथ्याशी टाकण्यात आलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीला तसेच असुविधांना सामोरे जावे लागते. जुन्नरचा हा प्राचीन वारसा जगापुढे आणण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत, परंतु जुन्नर मध्ये आलेल्या पर्यटकांना या असुविधांमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

खानापूर जवळील मानमोडी डोंगररांगेत तीन लेणी समूह आहेत. हे लेणी समूह म्हणजे जागतिक कीर्तीचा असा वारसा आहे. पुरातत्त्व व वनविभागामार्फत येथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून इकडे येणारे पर्यटक कसे वाढतील, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र, पुरातत्त्व व वनविभागाकडून या परिसरात कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. बुद्धलेण्यांकडे जाणाऱ्या मार्गात जे अडथळे आहेत, त्याबाबत वनविभागाला निवेदन देणार आहोत.

- गणेश बिंबाजी वाव्हळ, अध्यक्ष, प्रबुद्ध भारत फाउंडेशन, जुन्नर

२३ खोडद

खानापूर वनक्षेत्रात टाकलेला कचरा.