शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

औद्योगिक वसाहतीमधील रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:13 IST

आंबेठाण : चाकण औद्योगिक वसाहत दोनमधील कंपन्यांना रोज निघणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एमआयडीसीकडे कचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने अनेक कंपन्या ...

आंबेठाण : चाकण औद्योगिक वसाहत दोनमधील कंपन्यांना रोज निघणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एमआयडीसीकडे कचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने अनेक कंपन्या राजरोसपणे रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असल्याने रस्त्यांच्या कडेला डंपिंग एरिया होऊन औद्योगिक वसाहतीचे विद्रूपीकरण होऊन कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोना महामारीच्या काळात स्वच्छता आणि परिसर निर्जंतुकीकरण याला महत्त्व दिले जात आहे. या कृतीला चाकण एमआयडीसीमधील कंपन्या मात्र अपवाद ठरत आहेत. एमआयडीसी भागात रस्त्याच्या कडेला, खासगी जागेत सुरू असणारे व्यवसाय किंवा काही प्रमाणात एमआयडीसीमधील कारखानदार त्यांचा कचरा रस्त्याच्याकडेला टाकून देत आहे. त्यामुळे एमआयडीसीने तयार केलेल्या प्रशस्त रस्त्यांची कचराकुंडी होत चालली आहे. रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा उचलण्यात येत नसल्याने तेथे भटकी कुत्री, कावळ्याची संख्या वाढत आहे.

एमआयडीसीमधील बहुतांश कंपन्या आणि व्यावसायिक कोणी पाहू नये म्हणून रात्रीच्या वेळेस रस्त्याच्याकडेला कचरा टाकला जात आहे. यामुळे दिवसा रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे मोठे ढीग साचल्याचे पहायला मिळत आहेत. या कचऱ्यात कोंबड्यांची पिसे, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या,कँटीनमधील उरलेले खाद्यपदार्थ, भाजी बाजारामधील उरलेला भाजीपाला, जुने बांधकामाचा राडारोडा, सलूनमधील केस यामुळे परिसराचे विद्रूपीकरण होत आहे. याशिवाय तेथेच कचरा कुजत असून दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या तसेच कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

एमआयडीसीने कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यासाठी मागील दोन वर्षांपूर्वी सात एकर जमीन देण्याचे मान्य करून सदर प्रकल्पाचे भूमिपूजन ही करण्यात आले आहे.परंतु त्यानंतर याकडे कोणीही पाहिले नाही.

औद्योगिक वसाहतीमधील महसुली आणि एमआयडीसीमध्ये येणाऱ्या गावांचा कचरा एकत्र गोळा करून सेंद्रिय खत किंवा कचरा प्रक्रिया करणारा प्लांट सुरू करून कचरा समस्या दूर करावी.

११चाकण

औद्योगिक वसाहतीमधील रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा.