शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

कचरा डेपो आग, कोंडीबाबत सदस्यांच्या तीव्र भावना

By admin | Updated: April 20, 2017 07:04 IST

फुरसुंगी व उरुळी देवाची येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे शहरात निर्माण झालेल्या कचराकोंडीचे पडसाद महापालिकेच्या बुधवारी झालेल्या

पुणे : फुरसुंगी व उरुळी देवाची येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे शहरात निर्माण झालेल्या कचराकोंडीचे पडसाद महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उमटले. महापौरांनी कचरा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर काही सदस्यांनी याबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या. तर काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी केवळ आरोप-प्रत्यारोप केले. गेल्या पाच दिवसांपासून कचरा डेपोला आग लागली असताना महापालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. तसेच अत्यंत अपुऱ्या सामग्रीच्या आधारे आग विझविण्याचे काम सुरू असल्याचा आरोप योगेश ससाणे यांनी केला. तर ही आग कोणी लावली,याची आधी चौकशी करा व या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विशाल तांबे यांनी केली.गेल्या अनेक वर्षांपासून दर उन्हाळामध्ये येथील कचरा डेपोला आग लागते व त्यामुळे शहरात कचराकोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. यासाठी कायमस्वरूपी उपयायोजना करण्याची आवश्यकता असताना प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असे माजी महापौर वैशाली बनकर यांनी सांगितले. लँड फीलिंगमध्ये प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याची तक्रार दत्ता धनकवडे यांनी केली. पुणे शहराच्या कचरा डेपोसाठी नवीन जागा देऊ, असे आश्वासन देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप काहीच निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाचे हेमंत रासने यांनी केल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या प्रकल्पांची जबाबदारी कोणावर निश्चित केली, असा सवाल उपस्थित केला. प्रवीण चोरबेले यांनी प्रत्येक सदस्यांनी आपल्या वॉर्डमध्ये एक तरी जागा कचरा प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिली पाहिजे, असे म्हणाले. धीरज घाटे यांनी पीएमपीचे व्यवस्थापकीय अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी कचरा गाड्यांवरील ड्रायव्हर मागे घेतले, त्याला पर्यायी व्यवस्था काय केली, असा प्रश्न उपस्थित केला. कचरा डेपोच्या परिसरात हातभट्ट्यांचा धंदा सुरू असून, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक भेट देऊन या हातभट्ट्या बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर देखील आज या हातभट्ट्या येथे सुरूच आहेत, असे सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले. बाबूराव चांदेरे यांनी कचरा प्रश्नामध्ये कोणत्याही पक्षाने राजकारण आणू नये, असे सांगितले. कोथरूडकरांना कचऱ्याचा वास येतो, मग हडपसर परिसरातील लोकांना घ्राणेंद्रिय नाहीत का, असा सवाल चेतन तुपे यांनी उपस्थित केला. घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सहभागृहाला चुकीची माहिती दिली. डेपोची जागा बिल्डरांना मिळावी, यासाठी तो डेपो बंद करण्याचा घाट घातला जात आहे. पिंपरी सांडस येथील ५० एकर जागेच्या बदल्यात तुळापूर येथील जागा दिल्याचे ही त्यांनी सांगितले. कचरा प्रश्नावर लोकशाही मार्गाने आंदोलन केल्यानंतरदेखील बहुमत असलेल्या भाजपाने विरोधकांना नोटीसा दिल्याचा आरोप अरविंद शिंदे यांनी केला. (प्रतिनिधी)