शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:15 IST

जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि अन्य प्रकारचे प्रदूषण कमी करण्यासाठी परिसरातील सर्व गणेश मंडळांनी तसेच नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर ...

जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि अन्य प्रकारचे प्रदूषण कमी करण्यासाठी परिसरातील सर्व गणेश मंडळांनी तसेच नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा तसेच गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्व मंडळांनी स्वयंशिस्तीचे पालन करावे, असे आवाहन महाळुंगे पोलीस चौकीचे उपनिरीक्षक महेश चिटमपल्ली यांच्याकडून करण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सार्वजनिक गणेशोत्सव सण हा साध्या पद्धतीने साजरा करून ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविण्याच्या सूचना महाळुंगे पोलिसांनी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिल्या.

महाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे सदस्य व ग्रामस्थांच्या समवेत महाळुंगे येथील अस्मिता भवनमध्ये बैठक घेण्यात आली.

यावेळी पोलिसांनी महाराष्ट्र शासन व पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ बाबत दिलेल्या सूचनांची माहिती दिली. अनंत चतुर्दशीदिवशी महाळुंगे ग्रामपंचायतीमार्फत, महाळुंगे गावातील सर्व मूर्ती एकत्र करून विसर्जनस्थळी नेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. यावेळी ग्रामपंचायतीकडून मूर्ती दान हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, तसेच गावात गाडी फिरवून गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी जमा करणार आहे.

बैठकीसाठी महाळुंगे ग्रामपंचायत, गावातील ग्रामस्थ व विविध मंडळांचे कार्यकर्ते, पोलीस पाटील, महाळुंगे पोलीस चौकीचे उपनिरीक्षक महेश चिटमपल्ले उपस्थित होते. बैठकीदरम्यान सर्व ग्रामस्थांना व गणेश मंडळांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. गर्दी होईल असे गणेश उत्सव काळात कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम, अन्नदान, महाप्रसाद इ. कार्यक्रमांना परवानगी नाही. कृपया कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सूचनांचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे. जे गणेश मंडळ शासन आदेशांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलिसांनी केले.

महाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे सदस्य व ग्रामस्थांच्या समवेत महाळुंगे येथील अस्मिता भवनमध्ये बैठक घेण्यात आली.