शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

आगाखान पॅलेसमधील गांधींचे वास्तव्य (१५ ऑगस्ट लेख)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:16 IST

महात्मा गांधींना आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध करण्यात आले होते. आगाखान यांचे मूळ नाव सुलतान महंमद शहा. ते भारतीय राजकारणातील पुढारी ...

महात्मा गांधींना आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध करण्यात आले होते. आगाखान यांचे मूळ नाव सुलतान महंमद शहा. ते भारतीय राजकारणातील पुढारी होते. ‘आगाखान’ ही पदवी त्यांना ब्रिटिशांनी बहाल केली होती. इ.स. १९०० साली भारतात मोठा दुष्काळ पडला होता. त्या वेळी अनेकांनी मदत, दानधर्म केले. आगाखान यांनी लोकांना रोजगार मिळावा, यासाठी महाल बांधला. ते स्वत: या महालात काही काळ वास्तव्यासही होते. गांधीजींना स्थानबद्ध केले तेव्हा आगाखान पॅलेस ही जागा पडकी आणि दुर्लक्षित होती. ८ आॅगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी तेथे आले. त्यांचे सचिव महादेव देसाई हेही सोबत होते. गांधींच्या कार्याचा दस्तावेज तयार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. काही काळाने कस्तुरबा गांधीही तेथे वास्तव्यास आल्या. गांधींजींच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या दुर्दैवी घटना येथे घडल्या. १५ आॅगस्ट १९४२ रोजी महादेव देसाई यांचे आगाखान महालातच निधन झाले. २२ फेब्रुवारी १९४४ रोजी कस्तुरबा गांधी यांचे निधन झाले. दोघांचीही समाधी तिथे बांधण्यात आलेली आहे.

महात्मा गांधींनी आगाखान पॅलेस येथून शासनाशी पत्रव्यवहारही केला, अनेकांशी संपर्क साधला. स्थानबद्ध करण्यात आले असले तरी महत्त्वाचे राजकीय नेते असल्यामुळे त्यांना पत्रव्यवहाराची सवलत देण्यात आली होती. त्या काळात देशभरात ‘भारत छोडो आंदोलन’ सुरू होते. सर्वसामान्य जनतेचे उठाव केला, काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. मात्र, कोणत्याही व्यक्तीला इजा पोहोचवायची नाही, हे सूत्र लोकांनी पाळले. महाराष्ट्रात पत्री सरकार अर्थात प्रतिसरकार स्थापन झाले होते. स्थानबध्दतेच्या शेवटच्या काळात गांधीजींना मलेरिया झाला होता. त्यांची प्रकृती खालावली, त्यांना अन्नही जात नव्हते. या परिस्थितीत गांधीजींचे निधन झाल्यास जनतेच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल, याची ब्रिटिशांना भीती वाटत होती. गांधीजींच्या अंत्यविधीची तयारीही करण्यात आली होती, असे सांगितले जाते. २२ एप्रिल १९४४ रोजी गांधीजींना स्थानबध्दतेतून मुक्त करण्यात आले. स्वातंत्र्यचळवळीच्या शेवटच्या टप्प्यात फाळणी, संविधान अशा अनेक घटनांची चर्चा सुरु होती आणि महात्मा गांधी या सर्व घटनांमध्ये केंद्रस्थानी होते. गांधीजींच्या आगाखान पॅलेसमधील वास्तव्यावर आधारित ‘कारावास की कहानी’ हे पुस्तक सुशिला नय्यर यांनी लिहिले आहे. शोभना रानगडे यांनी त्याचा मराठीत अनुवाद केला.

आगाखान यांना धर्मगुरू मानणाऱ्या पंथाच्या कुटुंबात माझा जन्म झाला. त्यामुळे लहानपणापासून मला आगाखान पॅलेसचे आकर्षण होते. १९६८-६९ साली आणि त्यानंतरही मी अनेकदा सायकलवर आगाखान पॅलेसमध्ये जायचो. आगाखान पॅलेस १९६९ मध्ये आगाखान यांचे नातू यांच्या उपस्थितीत सरकारला अर्पण करण्यात आले. आगाखान यांच्याबद्दल मनात आदर असला तरी श्रद्धा नाही. मात्र, या वास्तूविषयी आणि गांधीजींच्या आठवणींविषयी अपार ममत्व आहे. मासूम संस्थेच्या शिबिरांच्या निमित्ताने या वास्तूत राहण्याचीही संधी मिळाली. सोलापूरच्या माया बडनोरे यांनी लिहिलेल्या ‘कस्तुरबा’ या पुस्तकाचे प्रकाशन शोभना रानडेंच्या उपस्थितीत आगाखान पॅलेस येथे झाले. ‘कारावास की कहानी’ यांनी मराठीमध्ये अनुवादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही येथे झाले. २००७ मध्ये मला विधायक कार्यकर्ता पुरस्कार मोहन धारिया यांच्या हस्ते याच वास्तूत मिळाला होता. आगाखान पॅलेस ही गांधीविचारांनी काम करणाऱ्यांसाठी प्रेरणा आहे.

ब्रिटिशांना देशाबाहेर घालवणे एवढेच गांधीजींच्या नेतृत्वाखालील चळवळीचे उद्दिष्ट नव्हते. गांधीजींना समता, समानतेवर, प्रेमावर आधारित आधुनिक भारत निर्माण करायचा होता. सर्वधर्मसमभाव ही त्यांची विचारधारा होती आणि त्याप्रमाणे त्यांनी आचरणही केले. गांधीजींची सर्वधर्मीय प्रार्थनाही आगाखान पॅलेसमध्ये उपलब्ध आहे. उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित लोकांसाठी काम करणे आणि धर्म, जातीच्या आधारावर राजकारण करणाऱ्या राजकारण्यांचा मुकाबला गांधी विचारांनी करणे, हेच आपले उद्दिष्ट असायला हवे.

- अन्वर राजन