शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

रिक्षाचालकांवर कोरोना टाळेबंदीनंतर इंधन दरवाढीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: कोरोना टाळेबंदीमध्ये बंद असलेला व्यवसाय कसाबसा सुरू झाल्यानंतर रिक्षाचालकांना आता इंधन दरवाढीचा सामना करावा लागतो ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: कोरोना टाळेबंदीमध्ये बंद असलेला व्यवसाय कसाबसा सुरू झाल्यानंतर रिक्षाचालकांना आता इंधन दरवाढीचा सामना करावा लागतो आहे. त्याच्या उत्पन्नाचे गणितच बिघडले आहे. कर्जाचे हप्ते द्यायचे की घर चालवायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील रिक्षा चालकांची अधिकृत परवानाधारक संख्या साधारण १ लाख १० हजार आहे. अनधिकृतपणे व्यवसाय करणारे ४० हजारांच्या आसपास असतील. या दीड लाख रिक्षाचालकांचा व्यवसाय कोरोना टाळेबंदी काळात सलग ६ महिने पूर्ण बंद होता. त्यानंतर अनलॉकमध्ये तो सुरू झाला तर आता त्यांच्यामागे इंधन दरवाढीचे भूत लागले आहे. व्यवसाय कमी झालाच आहे, पण त्यातही आता इंधनाचे भाव वाढल्यामुळे मिळणाऱ्याºतोकड्या उत्पन्नातही घट झाली आहे.

बहुसंख्य रिक्षा आता सरकारी धोरणामुळे सीएनजी गॅसवरच चालतात. दीड लाखांमधील १० ते १५ हजार रिक्षा पेट्रोलवर राहिल्या असतील. सात वर्षांपूर्वी गॅस सुरू झाला त्या वेळी तो १६ रूपये किलो होता. आता त्याची किंमत ५५ रूपये ५० पैसे झाली आहे. एक किलो गॅसमध्ये रिक्षा साधारण २५ ते ३० किलोमीटर धावते. त्यात प्रवासी फेऱ्याºतीन किंवा लांबचे अंतर असेल तर दोनच होतात. दिवसभर म्हणजे १२ तास रिक्षा चालवली तर साधारण ५०० ते ६०० रूपये उत्पन्न मिळते. इंधनखर्च वजा जाता त्यातील फक्त २५० ते ३०० रूपये घरासाठी म्हणून मिळतात. त्यातूनच रिक्षासाठीच्या कर्जाचा हप्ता चालवावा लागतो.

रिक्षाचे भाडे पहिल्या किलोमीटरला १८ रूपये व नंतरच्या प्रत्येक किलोमीटरला १२ रूपये ३१ पैसे असे आहे. त्यात मागील ५ वर्षांत काहीही बदल झालेला नाही. या पाच वर्षात रिक्षाच्या किंमतीत ७० हजार रूपयांनी वाढ झाली. पेट्रोल ९४ रूपये झाले. सीएनजी गॅस ५५ रूपयांच्या पुढे गेला. प्रवासी भाडे वाढवण्याची मागणी होत असते, मात्र त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळेच उत्पन्न कमीकमी होत चालले आहे व खर्च वाढत चालला आहे, असे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.