शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रिक्षाचालकांवर कोरोना टाळेबंदीनंतर इंधन दरवाढीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: कोरोना टाळेबंदीमध्ये बंद असलेला व्यवसाय कसाबसा सुरू झाल्यानंतर रिक्षाचालकांना आता इंधन दरवाढीचा सामना करावा लागतो ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: कोरोना टाळेबंदीमध्ये बंद असलेला व्यवसाय कसाबसा सुरू झाल्यानंतर रिक्षाचालकांना आता इंधन दरवाढीचा सामना करावा लागतो आहे. त्याच्या उत्पन्नाचे गणितच बिघडले आहे. कर्जाचे हप्ते द्यायचे की घर चालवायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील रिक्षा चालकांची अधिकृत परवानाधारक संख्या साधारण १ लाख १० हजार आहे. अनधिकृतपणे व्यवसाय करणारे ४० हजारांच्या आसपास असतील. या दीड लाख रिक्षाचालकांचा व्यवसाय कोरोना टाळेबंदी काळात सलग ६ महिने पूर्ण बंद होता. त्यानंतर अनलॉकमध्ये तो सुरू झाला तर आता त्यांच्यामागे इंधन दरवाढीचे भूत लागले आहे. व्यवसाय कमी झालाच आहे, पण त्यातही आता इंधनाचे भाव वाढल्यामुळे मिळणाऱ्याºतोकड्या उत्पन्नातही घट झाली आहे.

बहुसंख्य रिक्षा आता सरकारी धोरणामुळे सीएनजी गॅसवरच चालतात. दीड लाखांमधील १० ते १५ हजार रिक्षा पेट्रोलवर राहिल्या असतील. सात वर्षांपूर्वी गॅस सुरू झाला त्या वेळी तो १६ रूपये किलो होता. आता त्याची किंमत ५५ रूपये ५० पैसे झाली आहे. एक किलो गॅसमध्ये रिक्षा साधारण २५ ते ३० किलोमीटर धावते. त्यात प्रवासी फेऱ्याºतीन किंवा लांबचे अंतर असेल तर दोनच होतात. दिवसभर म्हणजे १२ तास रिक्षा चालवली तर साधारण ५०० ते ६०० रूपये उत्पन्न मिळते. इंधनखर्च वजा जाता त्यातील फक्त २५० ते ३०० रूपये घरासाठी म्हणून मिळतात. त्यातूनच रिक्षासाठीच्या कर्जाचा हप्ता चालवावा लागतो.

रिक्षाचे भाडे पहिल्या किलोमीटरला १८ रूपये व नंतरच्या प्रत्येक किलोमीटरला १२ रूपये ३१ पैसे असे आहे. त्यात मागील ५ वर्षांत काहीही बदल झालेला नाही. या पाच वर्षात रिक्षाच्या किंमतीत ७० हजार रूपयांनी वाढ झाली. पेट्रोल ९४ रूपये झाले. सीएनजी गॅस ५५ रूपयांच्या पुढे गेला. प्रवासी भाडे वाढवण्याची मागणी होत असते, मात्र त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळेच उत्पन्न कमीकमी होत चालले आहे व खर्च वाढत चालला आहे, असे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.