शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाच्या करारांमुळे तरुणाईत फ्रस्ट्रेशन

By admin | Updated: June 18, 2017 03:36 IST

प्रेमाचा करार... शब्द ऐकूनच धक्का बसला ना! प्रेमात कसला आलाय करार! पण तरुणाईही आता प्रॅक्टिकल बनलीय. कोणतीही भावनिक गुंतवणूक न ठेवता

- नम्रता फडणीस। लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : प्रेमाचा करार... शब्द ऐकूनच धक्का बसला ना! प्रेमात कसला आलाय करार! पण तरुणाईही आता प्रॅक्टिकल बनलीय. कोणतीही भावनिक गुंतवणूक न ठेवता एकमेकांबरोबर काही क्षण एन्जॉय करायचे आणि लग्नाच्या कोणत्याही आणाभाका घ्यायच्या भानगडीत पडायचे नाही असे प्रेमाचे करारच तरुण-तरुणींमध्ये होऊ लागले आहेत, असे निरीक्षण समुपदेशकांनी नोंदविले आहे. तरुण फ्रस्टे्रशनमध्ये गेल्याच्या अनेक तक्रारी पालक मांडत आहेत, त्यासाठी समुपदेशकांची मदत घेतली जात आहे. ‘प्रेम’ ही एक सुंदर भावना आहे पण त्यातही तरुणाई आता प्रॅक्टिकल होत चालली आहे. प्रेम तर करायचं, पण कुठलीही भावनिक गुंतवणूक नको. मी तुझ्याबरोबर रिलेशनशिपमध्ये असताना दुसऱ्या मुलीलाही फिरवू शकतो, मला तीदेखील आवडू शकते, हे लक्षात ठेव, अशा गोष्टी सांगूनच प्रेमाचे मौखिक करार तरुणाईमध्ये होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तरुणीही यामध्ये मागे नाहीत, हे यातील विशेष! मात्र अशा करारांमधून तरुण-तरुणींमध्ये नैराश्याची भावना वाढत असल्याच्या केसेस समुपदेशकांकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. विवाहित पुरुषांबरोबरही प्रेमाचे करारकाही तरुणी तर विवाहित पुरुषांबरोबर प्रेमाचे करार करीत असल्याचे निरीक्षण समुपदेशकांनी नोंदविले आहे. घरातून मुलींना जास्त पैसे दिले जात नसल्याने मौजमजा, दर्जात्मक जीवनशैली विकसित करण्यासाठी या मुली विवाहित पुरुषांबरोबर अफेअर करण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र दोघांमध्ये जर काही बिनसले तर मुली त्या पुरुषांविरुद्ध पोलिसांकडे तक्रारी करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत, असे समुपदेशकांकडून सांगण्यात आले. महाविद्यालयीन जीवनात कोणत्याही मुला-मुलींना कमिटमेंट नको असते. आत्तापासूनच एकमेकांना गृहीत धरणेच त्यांना नको आहे. जे वाटते ते नक्की प्रेम आहे की आकर्षण हेच त्यांना नीट समजलेले नसते. कारण आत्ताची पिढी ही खूप प्रॅक्टिकल आहे. कितीतरी तरुण-तरुणी असे आहेत, की ते इतके करिअरिस्टिक आहेत त्यांना जीवनात नक्की काय करायचे आहे याबाबत त्यांची मते क्लिअर आहेत, त्यांना प्रेमाबिमात पडायचे नाही असे जेव्हा ते सांगतात तेव्हा खरंचा आश्चर्य वाटते.- दीपा निलेगावकर, समुपदेशकमहाविद्यालयीन तरुण-तरुणींमध्ये प्रेमाचे करार होत आहेत. मात्र करार केले तरी कोणाची तरी एकाची भावनिक गुंतवणूक नात्यामध्ये होत असल्याने दोघांपैकी एकाला तरी नैराश्याचा सामना करावा लागत आहे. ही बाब तरुणांशी संवाद साधल्यानंतरच समोर आली आहे. यात मुलीदेखील मागे नाहीत. सगळ्या गोष्टी दोघांच्या संमतीनेच केल्या जातात, पण जेव्हा ब्रेकअप होते तेव्हा ती गोष्ट स्वीकारणे अवघड जाते, अशा तक्रारींचे प्रमाण वाढत असून, प्रेमाचे करार त्यांच्या नैराश्याचे कारण बनत आहेत.- डॉ. गणेश शिंदे, समुपदेशक/ मानसोपचारतज्ज्ञ