शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

प्रेमाच्या करारांमुळे तरुणाईत फ्रस्ट्रेशन

By admin | Updated: June 18, 2017 03:36 IST

प्रेमाचा करार... शब्द ऐकूनच धक्का बसला ना! प्रेमात कसला आलाय करार! पण तरुणाईही आता प्रॅक्टिकल बनलीय. कोणतीही भावनिक गुंतवणूक न ठेवता

- नम्रता फडणीस। लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : प्रेमाचा करार... शब्द ऐकूनच धक्का बसला ना! प्रेमात कसला आलाय करार! पण तरुणाईही आता प्रॅक्टिकल बनलीय. कोणतीही भावनिक गुंतवणूक न ठेवता एकमेकांबरोबर काही क्षण एन्जॉय करायचे आणि लग्नाच्या कोणत्याही आणाभाका घ्यायच्या भानगडीत पडायचे नाही असे प्रेमाचे करारच तरुण-तरुणींमध्ये होऊ लागले आहेत, असे निरीक्षण समुपदेशकांनी नोंदविले आहे. तरुण फ्रस्टे्रशनमध्ये गेल्याच्या अनेक तक्रारी पालक मांडत आहेत, त्यासाठी समुपदेशकांची मदत घेतली जात आहे. ‘प्रेम’ ही एक सुंदर भावना आहे पण त्यातही तरुणाई आता प्रॅक्टिकल होत चालली आहे. प्रेम तर करायचं, पण कुठलीही भावनिक गुंतवणूक नको. मी तुझ्याबरोबर रिलेशनशिपमध्ये असताना दुसऱ्या मुलीलाही फिरवू शकतो, मला तीदेखील आवडू शकते, हे लक्षात ठेव, अशा गोष्टी सांगूनच प्रेमाचे मौखिक करार तरुणाईमध्ये होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तरुणीही यामध्ये मागे नाहीत, हे यातील विशेष! मात्र अशा करारांमधून तरुण-तरुणींमध्ये नैराश्याची भावना वाढत असल्याच्या केसेस समुपदेशकांकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. विवाहित पुरुषांबरोबरही प्रेमाचे करारकाही तरुणी तर विवाहित पुरुषांबरोबर प्रेमाचे करार करीत असल्याचे निरीक्षण समुपदेशकांनी नोंदविले आहे. घरातून मुलींना जास्त पैसे दिले जात नसल्याने मौजमजा, दर्जात्मक जीवनशैली विकसित करण्यासाठी या मुली विवाहित पुरुषांबरोबर अफेअर करण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र दोघांमध्ये जर काही बिनसले तर मुली त्या पुरुषांविरुद्ध पोलिसांकडे तक्रारी करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत, असे समुपदेशकांकडून सांगण्यात आले. महाविद्यालयीन जीवनात कोणत्याही मुला-मुलींना कमिटमेंट नको असते. आत्तापासूनच एकमेकांना गृहीत धरणेच त्यांना नको आहे. जे वाटते ते नक्की प्रेम आहे की आकर्षण हेच त्यांना नीट समजलेले नसते. कारण आत्ताची पिढी ही खूप प्रॅक्टिकल आहे. कितीतरी तरुण-तरुणी असे आहेत, की ते इतके करिअरिस्टिक आहेत त्यांना जीवनात नक्की काय करायचे आहे याबाबत त्यांची मते क्लिअर आहेत, त्यांना प्रेमाबिमात पडायचे नाही असे जेव्हा ते सांगतात तेव्हा खरंचा आश्चर्य वाटते.- दीपा निलेगावकर, समुपदेशकमहाविद्यालयीन तरुण-तरुणींमध्ये प्रेमाचे करार होत आहेत. मात्र करार केले तरी कोणाची तरी एकाची भावनिक गुंतवणूक नात्यामध्ये होत असल्याने दोघांपैकी एकाला तरी नैराश्याचा सामना करावा लागत आहे. ही बाब तरुणांशी संवाद साधल्यानंतरच समोर आली आहे. यात मुलीदेखील मागे नाहीत. सगळ्या गोष्टी दोघांच्या संमतीनेच केल्या जातात, पण जेव्हा ब्रेकअप होते तेव्हा ती गोष्ट स्वीकारणे अवघड जाते, अशा तक्रारींचे प्रमाण वाढत असून, प्रेमाचे करार त्यांच्या नैराश्याचे कारण बनत आहेत.- डॉ. गणेश शिंदे, समुपदेशक/ मानसोपचारतज्ज्ञ