शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

रेल्वेने प्रतिसाद न दिल्याने मालधक्क्याचा रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:14 IST

बारामती: बारामती-भिगवण रस्त्यालगतच्या सेवारस्त्याला रेल्वे प्रशासनाने कोणाताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बुधवारी नगर परिषदेने आक्रमक भूमिका घेत रेल्वेच्या मालधक्क्याकडे ...

बारामती: बारामती-भिगवण रस्त्यालगतच्या सेवारस्त्याला रेल्वे प्रशासनाने कोणाताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बुधवारी नगर परिषदेने आक्रमक भूमिका घेत रेल्वेच्या मालधक्क्याकडे जाणारा रस्ताच बंद करून टाकला. रस्ता बंद झाल्याने सेवारस्त्यासह रेल्वे मैदानावर मालट्रकच्या रांगा लागल्या होत्या.

बारामती शहरातील भिगवण रस्ता शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता मानला जातो. त्यामुळे या मार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या देखील तुलनेने अधिक आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून सेवारस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वेसह काही परिसर वगळता हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या कामाला परवानगी न दिल्याने रेल्वे प्रशासनानेच या सेवा रस्त्याच्या पूर्णत्वाला ‘खो’ घातल्याचे चित्र आहे. समांतर सेवा रस्ता करण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. मात्र, हे काम पूर्ण होण्यासाठी रेल्वे प्रशासनाची भूमिका महत्वाची आहे. भिगवण रस्त्यावरील या अवजड वाहनांचा धोका विचारात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेस्तव नगरपालिकेने ट्रकचा मालधक्क्याकडे जाणारा रस्ताच बंद करून टाकल्याचा नगर परिषदेचा दावा आहे.

बारामती नगर परिषदेचे गटनेते सचिन सातव म्हणाले की, भिगवण रस्त्यालगतच्या सेवारस्त्यासाठी नगर परिषद प्रशासन रेल्वे प्रशासनाला विनंती करत आहे. आम्हाला त्यांच्या जागेची मालकी नको, त्यांची आडमुठेपणाची भूमिका आहे. रेल्वेसाठी नगर परिषदेने ‘आरओबी’बांधला. तांदुळवाडीत ‘आरयूबी ’बांधतोय, त्यासाठी आपण २५ ते ३० कोटी रुपये खर्च केले आहेत. मालधक्क्यामुळे रेल्वेची अवजड वाहतूक रस्त्यावर येते. त्याचा विद्यार्थी, महिलांना त्रास होतो. त्यामुळे गंभीर अपघात झाले आहेत. त्यासाठी रेल्वे प्रशासनाला आपण सेवा रस्त्याला परवानगी देण्याबाबत परवानगी मागत आहोत. मालधक्क्यामुळे येथील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. रेल्वे प्रशासनाने त्यांच्या वाहतुकीचा प्रश्न त्यांनीच सोडवावा. खासदार सुप्रिया सुळे यांनी आत्तापर्यंत तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, पियूष गोयल यांच्यासह विद्यमान रेल्वेमंत्र्यांना सेवारस्ता परवानगीबाबत पत्राद्वारे विनंती केली आहे. कोणीही मागणीला प्रतिसाद दिलेला नाही. रेल्वे प्रशासनाकडून नगर परिषदेला साडेसात कोटी रुपये भरण्याची मागणी होत आहे. एवढे पैसे भरून देखील मालकी रेल्वे प्रशासनाचीच राहणार असेल तर मालधक्का नसलेला चांगला, अशी नगर परिषदेची भूमिका आहे. तुमचे उत्पन्न चालू, मात्र आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेचे काय, जोपर्यंत निर्णय होणार नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही. नगर परिषद प्रशासन त्या ठिकाणी रात्रभर लोकांची नेमणूक करणार आहे. कोणाच्या पोटावर पाय देण्याचा हेतू नाही. मात्र, बारामतीकरांचा जीव धोक्यात घालून परवानगी देणार नसल्याचे सातव यांनी स्पष्ट केले.

याबाबत बारामती येथील रेल्वे प्रशासनप्रमुख आर. के. सिन्हा म्हणाले की, नगर परिषदेने मालधक्क्याच्या बंद केलेल्या रस्त्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कार्यालयाला कळविण्यात आली आहे. याबाबत स्थानिक पातळीवर कोणताही निर्णय घेतला जात नाही. सेवारस्त्यासह बंद केलेल्या रस्त्याबाबत देखील वरिष्ठ अधिकारीच निर्णय घेतील.

बारामती-भिगवण रस्त्यावरील मालधक्क्याचा रस्ता बारामती नगर परिषदेने बंद केला आहे.

१८०८२०२१ बारामती—०८