शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

जागेअभावी चार हजार जणांना मिळाले नाही हक्काचे छप्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेघर, कच्चे घर असलेल्या कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसाहाय्य देण्याच्या हेतूने २०१६ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेघर, कच्चे घर असलेल्या कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसाहाय्य देण्याच्या हेतूने २०१६ पासून पंतप्रधान आवास योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. मात्र, जवळपास ४ हजार १२ लोकांकडे जागाच नसल्याने त्यांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. तर जागा असतानाही २ हजार २३१ जणांच्या घराचे काम होऊ शकले नाही.

ग्रामीण भागातील बेघर तसेच दारिद्र्यरेषेखालील लोकांना त्यांच्या हक्काचे घर बांधता यावे यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी दीड लाख तर शहरी भागातील नागरिकांना अडीच लाख रुपये मदत या योजने अंतर्गत दिली जाते. जिल्ह्यातील ग्रामीण भागात २०१६ ला जवळपास २१हजार ४३८ घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. २०२१ पर्यंत ही घरकुले बांधण्याचा मानस होता. अल्पसंख्याकातून ६१५ , अनुसूचित जातीचे २ हजार ७५१, अनुसूचित जमातीचे ३ हजार ४४९ तरइतर १३ हजार ६२३ असे २१ हजार ४३८ लाभार्थी या योजनेचसाठी निवडण्यात आले होते. २०२० पर्यंत १४ हजार २३६ घरकुलांचे कामे पूर्ण करण्यात आली. मात्र, विविध कारणांमुळे योजेनेसाठी नोंदणी न होऊ शकलेल्या ९५९ लाभार्थ्यांना घरे बांधता आली नाही. उर्वरित ६ हजार २४३ जणांच्या घरकुलाचे काम प्रलंबित आहेत. यातील ४ हजार १२ जणांकडे जागाच नसल्यामुळे त्यांना घर द्यायचे कसे असा प्रश्न प्रशासनापुढे आहे. तर २ हजार २३१ जणांचे घरकुलाची कामे २०२१ मध्ये पूर्ण करायचे आहे, असे ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी संभाजी लांगोरे यांनी सांगितले.

चौकट

जागा मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू

जिल्ह्यातील घरकुल बांधण्यासाठी मिळालेल्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू आहे. घर बांधण्यासाठी जागा नसल्याने घरकुल बांधण्यासाठी अडचणी आल्या. ज्यांच्याकडे जागा नाहीत त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडून किंवा गायरानातील जागा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच जागेचा प्रश्न सोडून घरकुलाचा प्रश्न सोडवला जाणर आहे.

कोट

जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुलांचे उद्दिष्ट बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व घरकुलांचे काम करण्याचा प्रयत्न आहे. ज्यांच्याकडे जागा नाहीत. त्यांना ग्रामपंचयातीमार्फत गायरान जमिनीवर जागा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. लवकरच यावर तोडगा निघण्याची आशा आहे.

- संभाजी लांगोरे, अधिकारी, ग्रामीण विकास यंत्रणा

चौकट

जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेली घरे -२१४३८

किती लोकांना पहिला हप्ता मिळाला - ८९७२

किती नागरिकांची घरे अपूर्ण आहेत - ७२४३