शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

जागेअभावी चार हजार जणांना मिळाले नाही हक्काचे छप्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेघर, कच्चे घर असलेल्या कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसाहाय्य देण्याच्या हेतूने २०१६ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेघर, कच्चे घर असलेल्या कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसाहाय्य देण्याच्या हेतूने २०१६ पासून पंतप्रधान आवास योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. मात्र, जवळपास ४ हजार १२ लोकांकडे जागाच नसल्याने त्यांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. तर जागा असतानाही २ हजार २३१ जणांच्या घराचे काम होऊ शकले नाही.

ग्रामीण भागातील बेघर तसेच दारिद्र्यरेषेखालील लोकांना त्यांच्या हक्काचे घर बांधता यावे यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी दीड लाख तर शहरी भागातील नागरिकांना अडीच लाख रुपये मदत या योजने अंतर्गत दिली जाते. जिल्ह्यातील ग्रामीण भागात २०१६ ला जवळपास २१हजार ४३८ घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. २०२१ पर्यंत ही घरकुले बांधण्याचा मानस होता. अल्पसंख्याकातून ६१५ , अनुसूचित जातीचे २ हजार ७५१, अनुसूचित जमातीचे ३ हजार ४४९ तरइतर १३ हजार ६२३ असे २१ हजार ४३८ लाभार्थी या योजनेचसाठी निवडण्यात आले होते. २०२० पर्यंत १४ हजार २३६ घरकुलांचे कामे पूर्ण करण्यात आली. मात्र, विविध कारणांमुळे योजेनेसाठी नोंदणी न होऊ शकलेल्या ९५९ लाभार्थ्यांना घरे बांधता आली नाही. उर्वरित ६ हजार २४३ जणांच्या घरकुलाचे काम प्रलंबित आहेत. यातील ४ हजार १२ जणांकडे जागाच नसल्यामुळे त्यांना घर द्यायचे कसे असा प्रश्न प्रशासनापुढे आहे. तर २ हजार २३१ जणांचे घरकुलाची कामे २०२१ मध्ये पूर्ण करायचे आहे, असे ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी संभाजी लांगोरे यांनी सांगितले.

चौकट

जागा मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू

जिल्ह्यातील घरकुल बांधण्यासाठी मिळालेल्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू आहे. घर बांधण्यासाठी जागा नसल्याने घरकुल बांधण्यासाठी अडचणी आल्या. ज्यांच्याकडे जागा नाहीत त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडून किंवा गायरानातील जागा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच जागेचा प्रश्न सोडून घरकुलाचा प्रश्न सोडवला जाणर आहे.

कोट

जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुलांचे उद्दिष्ट बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व घरकुलांचे काम करण्याचा प्रयत्न आहे. ज्यांच्याकडे जागा नाहीत. त्यांना ग्रामपंचयातीमार्फत गायरान जमिनीवर जागा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. लवकरच यावर तोडगा निघण्याची आशा आहे.

- संभाजी लांगोरे, अधिकारी, ग्रामीण विकास यंत्रणा

चौकट

जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेली घरे -२१४३८

किती लोकांना पहिला हप्ता मिळाला - ८९७२

किती नागरिकांची घरे अपूर्ण आहेत - ७२४३