शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

जिल्हा परिषदेच्या चारशे वर्गखोल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात गेल्या एक-दीड वर्षात आलेली दोन चक्रीवादळे, अतिवृष्टीचा मोठा फटका शाळा वर्गखोल्यांना बसला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात गेल्या एक-दीड वर्षात आलेली दोन चक्रीवादळे, अतिवृष्टीचा मोठा फटका शाळा वर्गखोल्यांना बसला आहे. याशिवाय जुन्या व दुरुस्तीअभावी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या तब्बल चारशे वर्गखोल्या धोकादायक बनल्या आहेत. सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्या, तरी भविष्यात अशा वर्गखोल्यांमध्ये शाळा भरविणे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोकादायक ठरू शकतात.

जिल्ह्यात बहुतेक सर्व तालुक्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. शाळांचे पत्रे फुटलेत, कौलांखालच्या लाकडी पट्ट्या खराब झाल्या आहेत. काही ठिकाणी पट्ट्या तुटल्या आहेत. लाकडी कैची, वासे सडले आहेत. कैची वाकली आहे. छप्पर कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. फुटक्या कौलातून, पत्र्यांतून पावसाळ्यात शाळेत पाणी वाहत असते. अति पाऊस असलेल्या तालुक्यातील नव्यानेच बांधण्यात आलेले स्लॅब गळतात. खिडक्या तुटल्या आहेत.

केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोठ्याप्रमाणात शाळा वर्ग खोल्यासाठी निधी देण्यात येत होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून ही योजना बंद पडल्याने बांधकामासाठी अपेक्षित निधी उपलब्ध होत नाही. सध्या पुणे जिल्ह्यासाठी ७६३ नवीन वर्ग खोल्यांची गरज असून, जिल्हा नियोजन आणि जिल्हा परिषद निधीतून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

---------

जिल्ह्यातील एकूण शाळा : ३६४८

जिल्हा परिषदेची एकूण विद्यार्थी संख्या : २,३३,९७७

- वर्गखोल्यांची दुरुस्ती आवश्यक : ७६३

--------

जिल्ह्यात तालुकानिहाय धोकादायक वर्गखोल्यांची संख्या

तालुका वर्गखोल्या

आंबेगाव ३३

बारामती १५

भोर ०५

दौंड ७७

हवेली ३०

इंदापूर ५६

जुन्नर ६९

खेड ३६

मावळ १७

मुळशी १२

पुरंदर १७

शिरूर २५

वेल्हा ०८

एकूण ४००

----------

यंदा अडीचशे नवीन वर्गखोल्यांचे काम

जिल्ह्यात तब्बल ७६३ नवीन वर्गखोल्यांची गरज आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज असून, सध्या कोरोनामुळे निधी उपलब्ध होण्यास अडचण येत आहे, तरी देखील यंदा अडीचशे नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम मंजूर करण्यात आले असून, जिल्हा नियोजन आणि जिल्हा परिषद निधीतून २६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच बांधकाम सुरू होणार आहे.

चौकट

केंद्राने निधी उपलब्ध करून द्यावा

केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात शाळा वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. परंतु गेल्या चार-पाच वर्षांपासून ही योजना बंद पडली आहे. आजही ग्रामीण भागात धोकादायक वर्गखोल्यांची संख्या मोठी आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. जिल्हा नियोजन व जिल्हा परिषद निधीतून हे सर्व बांधकाम करण्यासाठी मर्यादा येतात.

- रणजित शिवतरे, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती पुणे जिल्हा परिषद