शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

‘कोटा प्रवेश’ निकालानंतर चार दिवसांत

By admin | Updated: June 14, 2014 00:09 IST

अकरावीसाठी विविध कोट्यांतील प्रवेश दहावीची मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर पहिल्या चार दिवसांत गुणवत्तेनुसार पूर्ण करण्याची सूचना शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांनी कनिष्ठ महाविद्यालयांना दिली आहे

पुणे : अकरावीसाठी विविध कोट्यांतील प्रवेश दहावीची मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर पहिल्या चार दिवसांत गुणवत्तेनुसार पूर्ण करण्याची सूचना शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांनी कनिष्ठ महाविद्यालयांना दिली आहे. त्याचप्रमाणे कोट्यांतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना यंदा अकरावी आॅनलाईन प्रवेश पद्धतीतूनही अर्ज करण्याची मुभा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.सर्व कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेश आॅनलाईन पद्धतीने केले जाणार आहेत. ६० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पद्धतीने प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरला आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांना पसंतिक्रम भरावे लागतील. निकाल लागल्यानंतर चार दिवसांत कोट्यांतील प्रवेश पूर्ण करावे लागणार आहेत. अल्पसंख्याक कोटा तसेच माध्यमिक शाळेशी कनिष्ठ महाविद्यालय जोडलेल्या महाविद्यालयांत इनहाऊस कोटा असतो. अल्पसंख्याक कोटा ५० टक्के, तर इनहाऊस कोटा २० टक्के एवढा आहे. व्यवस्थापन कोट्यांतर्गत ५ टक्के प्रवेश देता येतात.अल्पसंख्याक व इनहाऊस कोट्यातील प्रवेशास दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर होताच सुरुवात करावी लागणार आहे. परंतु, मूळ गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर पहिल्या चार दिवसांत कोट्यांतर्गत प्रवेश पूर्ण करणे अनिवार्य आहे. हे सर्व प्रवेश गुणवत्तेनुसार होणे आवश्यक आहे. अल्पसंख्याक राखीव जागा ५० टक्के, इनहाऊस कोट्यातील २० टक्के जागांवरील प्रवेशाची माहिती संवर्गनिहाय आणि विद्यार्थ्यांच्या नावासह चौथ्या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिक्षण उपसंचालकांच्या संकेतस्थळावर जाहीर करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)