शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

‘कोटा प्रवेश’ निकालानंतर चार दिवसांत

By admin | Updated: June 14, 2014 00:09 IST

अकरावीसाठी विविध कोट्यांतील प्रवेश दहावीची मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर पहिल्या चार दिवसांत गुणवत्तेनुसार पूर्ण करण्याची सूचना शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांनी कनिष्ठ महाविद्यालयांना दिली आहे

पुणे : अकरावीसाठी विविध कोट्यांतील प्रवेश दहावीची मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर पहिल्या चार दिवसांत गुणवत्तेनुसार पूर्ण करण्याची सूचना शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांनी कनिष्ठ महाविद्यालयांना दिली आहे. त्याचप्रमाणे कोट्यांतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना यंदा अकरावी आॅनलाईन प्रवेश पद्धतीतूनही अर्ज करण्याची मुभा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.सर्व कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेश आॅनलाईन पद्धतीने केले जाणार आहेत. ६० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पद्धतीने प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरला आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांना पसंतिक्रम भरावे लागतील. निकाल लागल्यानंतर चार दिवसांत कोट्यांतील प्रवेश पूर्ण करावे लागणार आहेत. अल्पसंख्याक कोटा तसेच माध्यमिक शाळेशी कनिष्ठ महाविद्यालय जोडलेल्या महाविद्यालयांत इनहाऊस कोटा असतो. अल्पसंख्याक कोटा ५० टक्के, तर इनहाऊस कोटा २० टक्के एवढा आहे. व्यवस्थापन कोट्यांतर्गत ५ टक्के प्रवेश देता येतात.अल्पसंख्याक व इनहाऊस कोट्यातील प्रवेशास दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर होताच सुरुवात करावी लागणार आहे. परंतु, मूळ गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर पहिल्या चार दिवसांत कोट्यांतर्गत प्रवेश पूर्ण करणे अनिवार्य आहे. हे सर्व प्रवेश गुणवत्तेनुसार होणे आवश्यक आहे. अल्पसंख्याक राखीव जागा ५० टक्के, इनहाऊस कोट्यातील २० टक्के जागांवरील प्रवेशाची माहिती संवर्गनिहाय आणि विद्यार्थ्यांच्या नावासह चौथ्या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिक्षण उपसंचालकांच्या संकेतस्थळावर जाहीर करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)