शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

किल्ले पुरंदर परिसर स्मृतिस्थळ विकसित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:15 IST

सासवड : महाराष्ट्र शासनाने राज्यातील गड-किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील ...

सासवड : महाराष्ट्र शासनाने राज्यातील गड-किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून किल्ले विकास व किल्ले पायथा व ५० किलोमीटर परिसरातील पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचे जाहीर केले आहे. यामध्ये पुरंदर किल्ल्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील सर्व गावांचा कायापालट होणार असून, या गावांचा इतिहास जतन केला जाणार आहे.

छत्रपती संभाजी महाराज आणि आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जन्मस्थाने एकाच परिसरात असल्याने या स्मृतिस्थळांचा विकास पर्यटन म्हणून केला जाणार आहे. असे सांगतानाच उमाजी नाईक यांचे समाधी स्थान नगरपालिकेने विकसित करण्याचे जाहीर केले आहे. त्याच प्रमाणे स्मारकाच्या विकासासाठी आमदार फंडातून २५ लाख रुपयांची घोषणा करून त्यातून त्यांचा इतिहास चित्रांच्या माध्यमातून समाजासमोर आणला जाईल, असे प्रतिपादन पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी केले आहे.

भिवडी (ता. पुरंदर) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या २३० व्या शासकीय जयंतीनिमित्त स्मारकास पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त तात्यासाहेब भिंताडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे, तहसीलदार रूपाली सरनोबत, माजी आमदार अशोक टेकवडे, भाजपचे नेते बाबाराजे जाधवराव, पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे, गटविकास अधिकारी अमर माने, उमाजी नाईक यांचे वंशज रमण खोमणे आणि चंद्रकांत खोमणे, मोहन नाना मदने, सरपंच श्वेता चव्हाण, उपसरपंच राहुल मोकाशी, रामदास धनवटे, विठ्ठल मोकाशी, साहेबराव जाधव, भैया खोमणे, बाळासाहेब भिंताडे, साधू दिघे, दिलीप वांढेकर, त्याच प्रमाणे राज्याच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

: भिवडी (ता. पुरंदर) येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त स्मारकास अभिवादन करताना उपस्थित मान्यवर.

080921\img-20210907-wa0017.jpg

फोटो ओळ ; भिवडी ( ता. पुरंदर ) येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त स्मारकास अभिवादन करताना उपस्थित मान्यवर.