शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

दबा धरून माणसांवर हल्ला करणारा बिबट्याच नरभक्षक माजी वन अधिकारी प्रभाकर कुकडोलकर : वन्यजीव धोरण आखण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:27 IST

पुणे : बिबट्या करमाळ्यात (जि. सोलापूर)धुमाकूळ घालत आला आहे. आता तो माळरानात गेल्याने तिथे त्याची दहशत पसरलेली आहे. बिबट्याने ...

पुणे : बिबट्या करमाळ्यात (जि. सोलापूर)धुमाकूळ घालत आला आहे. आता तो माळरानात गेल्याने तिथे त्याची दहशत पसरलेली आहे. बिबट्याने अनेकांचा बळी घेतल्याने त्याला नरभक्षक म्हटले जात आहे. पण तो हल्ला दबा धरून करतो? की, घाबरून करतो? माणसांवरच हल्ला करतोय का ? जर तो असेच करतो? असेल, तरच तो नरभक्षक समजावा. त्यामुळे बिबट्यांचे निरीक्षण, नोंदी आणि मग निष्कर्ष काढणे गरजेचे आहे, अशी माहिती माजी वन अधिकारी व वन्यजीव अभ्यासक प्रभाकर कुकडोलकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

गेल्या काही दिवसांपासून करमाळा बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे दोनशेहून अधिक लोकं दिवस-रात्र कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत चाळीस ट्रॅप कॅमेरे, पंधरा पिंजरे, शार्पशूटर, शस्त्रधारी पोलीस, श्वान पथक असे सर्व साहित्य असूनही बिबट्या हाती लागत नाही. कारण तिथे ऊसाचे शेत आणि केळीचे बागा आहेत. त्यात तो शोधता येत नाही.

कुकडोलकर म्हणाले,‘‘वन विभागाने आता बिबट्यांच्या आणि एकूण वन्यजीवांबाबत धोरण ठरवावे. बिबट्या आपला अधिवास सोडून इतरत्र फिरतो आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर भाग हा बिबट्यांचे प्रजोत्पदनाचे केंद्रच बनले आहे. त्यामुळे तिथून बिबटे इतर ठिकाणी जात आहेत. सोलापूर, मराठवाड्यात बिबटे नव्हते. आता तिकडेही ते जात आहेत. कारण तिकडे ऊसाची शेती खूप आहे. त्यांचे राहण्याचे ठिकाणच ऊस झाले आहे. ऊसामध्येच ते वाढत आहेत.’’

वन विभागाने ऊसाच्या क्षेत्राची ठेवावी नोंद

एखादा बिबट्या लोकांवर हल्ला करत असेल, तर तो भितीपोटी करत असू शकतो. त्यामुळे बिबट्याबाबत सखोल निरीक्षण, नोंदी आणि त्यानंतर निष्कर्ष काढून अहवाल केला पाहिजे. त्यानंतर धेारण आखावे. ऊसाचे क्षेत्र नेमके कुठे आणि किती आहे ? याची नोंद वन विभागाने ठेवावी. तिथून मग बिबट्यांचे स्थलांतर पुन्हा त्यांच्या अधिवासात कसे होईल, यावर भर हवा.

...तर बिबट्याला गोळ्या घाला !

बिबट्यांचे अधिवास शोधून ते घोषित करावेत. त्या अधिवासाच्या बाहेर जर बिबट्या दिसला तर त्याला गोळ्या घालाव्यात. पण यासाठी अगोदर वन्यजीव धोरण हवे. त्यानंतर त्यांचा अधिवास संरक्षित हवा, त्यांना खाद्य मिळायला हवे. तरच हा वन्यजीव संघर्ष कमी होऊ शकतो, असे कुकडोलकर यांनी सांगितले.