शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

एमपीएससीला सुधारित निकाल लावण्याचा विसर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षा २०१९ या परीक्षेचा अंतिम निकाल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षा २०१९ या परीक्षेचा अंतिम निकाल लागून दोन वर्ष झाली आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघताच तत्काळ सुधारीत निकाल लावण्यात यावा, असे ५ जुलैच्या अध्यादेशात म्हटले आहे. मात्र या अध्यादेशाचा विसर एमपीएससीला पडला की काय, असा प्रश्न उपस्थित करून तत्काळ या शब्दाचा अर्थ सांगावा, अशी संतापजनक मागणी नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० या परीक्षेचा निकाल लावण्यात आला आहे. त्यामुळे २०२० या परीक्षेची प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी सुद्धा २०१९ च्या परीक्षेमध्ये पात्र ठरूनही नियुक्ती रखडली आहे. ही परीक्षा ४१३ पदांसाठी घेण्यात आली होती. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी आदी पदांवर राज्यसेवा २०१९ मधून निवड झालेल्या उमेदवारांचा सुधारित अंतिम निकाल जाहीर करण्यास एमपीएससी चालढकल करीत आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

अद्यापही नियुक्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नवीन सदस्य भरती झाल्यावर सर्व निर्णय लवकर होणे अपेक्षित होते. मात्र याकडे एमपीएससीचे लक्ष नाही. प्रभारी अध्यक्षांनी राज्यसेवा २०१९ चा अंतिम सुधारित निकाल १० सप्टेंबरपूर्वी जाहीर करावा. अन्यथा एमपीएससी कार्यालयासमोर आत्मदहनाचा करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.