शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतरच्या घोषणेचा अजित पवारांना विसर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:12 IST

एमपीएससीच्या १५ हजार पदांची केली होती घोषणा : अद्याप रिक्त पदांचीही नाही मागणी अभिजित कोळपे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे ...

एमपीएससीच्या १५ हजार पदांची केली होती घोषणा : अद्याप रिक्त पदांचीही नाही मागणी

अभिजित कोळपे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी स्वप्निल लोणकर याच्या आत्महत्येनंतर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ६ जुलै रोजी १५ हजार ५११ पदांची घोषणा केली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी)अंतर्गत महिनाभरात ही पदे भरण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले होते. मात्र, दोन महिन्यांनंतरही याबाबत कोणतीही हालचाल न झाल्याने १५ हजार पदांच्या भरतीची घोषणा हवेतच विरणार का, असा सवाल विद्यार्थी उपस्थित करत आहेत.

एमपीएससीच्या रिक्त सदस्यांची पदभरती शासनाने केली. मात्र, पुढची कार्यवाही काहीही झाली नाही. या आयोगाकडे राज्याच्या विविध भागातील रिक्त, निवृत्त झालेल्या शासकीय पदांची माहिती सादर करावी लागते. त्यानुसार एमपीएससी रिक्त जागांच्या भरतीसाठीची प्रक्रिया राबवते. मात्र, कोणत्याच विभागाने ही प्रक्रिया सुरू केलेली नाही. ३० जुलै २०२१ च्या वित्त विभाग शासन निर्णयानुसार प्रत्येक विभागाने ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे रिक्त पदांची मागणीपत्रे पाठवावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, या दृष्टीने काहीच हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातील २५ लाख तरुण-तरुणींची फसवणूक होणार का, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, अद्यापही कोणत्याही विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठवलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवीन वर्षाचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले नाही. नवीन जाहिरातीही प्रसिद्ध केलेल्या नाहीत. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नवीन जाहिरात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर सरकारने पावसाळी अधिवेशनात घोषणा केल्याने आशा निर्माण झाली होती. मात्र, ती फोल ठरण्याची भीती आम्हाला दिसत आहे.

चौकट

२५ लाख तरुणईचा जीव टांगणीला

“सुमारे २५ लाख बेरोजगार सध्या आयोगाच्या नवीन जाहिरातीची वाट पाहत आहेत. सामान्य प्रशासन विभाग आणि इतर विभागांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे लवकरात लवकर मागणीपत्र पाठवून १५ हजार ५११ पदांची भरती करण्यात यावी ही सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे.”

- महेश घरबुडे, सदस्य, एमपीएससी समन्वय समिती