शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

माणसं नव्हे पक्षी तयार करता जंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:10 IST

पुणे : पक्षी का वाचवायचे असतात, तर ते जंगलं निर्माण करतात म्हणून. ते अनेक बिया खातात. त्यांच्या पोटातील पाचक ...

पुणे : पक्षी का वाचवायचे असतात, तर ते जंगलं निर्माण करतात म्हणून. ते अनेक बिया खातात. त्यांच्या पोटातील पाचक रस त्या बियांना चिकटतो आणि त्या बिया विष्ठेतून बाहेर पडतात. त्या मातीत चांगल्या रुजतात आणि त्यामुळे झाडे वाढतात. अशा प्रकारे अनेक जंगले हे पक्षी तयार करतात, माणसं जंगल निर्माण करू शकत नाहीत. त्यामुळे पक्ष्यांचे या निसर्गातील स्थान महत्त्वाचे आहे, असे मत ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. किरण पुरंदरे यांनी व्यक्त केले.

इन्वॉयरमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेतर्फे दर शनिवारी पर्यावरणीय वेबिनार आयोजित केले जाते. त्यामध्ये पक्षितज्ज्ञ डॉ. किरण पुरंदरे यांचे ‘नागझिरा जंगलातून’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी या वेळी नागझिरा जंगलातील पक्ष्यांविषयीची माहिती आणि त्यांचे आवाज काढून दाखवले. वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य अनुज खरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

पुरंदरे म्हणाले, ‘‘नागझिऱ्याच्या जंगलात सुमारे ३०० प्रकारचे पक्षी दिसतात. राज्यातील पक्ष्यांपैकी ५० टक्क्यांहून अधिक पक्षी या जंगलात आहेत. या पक्ष्यांना जंगलात पाहणे आनंददायी क्षण असतो. कोणताच पक्षी किंवा प्राणी पिंजऱ्यात ठेवू नये. त्यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे. अनेक तारांकित पोपट पिंजऱ्यात ठेवले जातात.’’

——————————-

सहा झाडे महत्त्वाची

पुणे, सोलापूर, सातारा रस्त्यावर पूर्वी वडाची झाडे होती. ती तोडली गेली. पळस, पांगारा, काटेसावर, वड, पिंपळ, उंबर ही झाडे महत्त्वाची आहेत. अन्न, फळं देणारी आहेत. ती लावली पाहिजे. पक्षी, प्राण्यांना ही झाडे फळे देतात. त्यामुळे या वृक्षांना वटवृक्ष, आधारवड असे संबोधले जाते.

------------

माळरानांवर वृक्षारोपण चुकीचे

माळरानांवर वृक्षारोपण केले आहे. हे चुकीचे आहे. कुठं झाडं लावायची ते समजले पाहिजे. निसर्ग संवर्धन करण्यासाठी तो समजून घेतला पाहिजे. तरच त्याचे संरक्षण करता येईल. पण आपण काहीच करायचे नाही, हा एक चांगला मार्ग आहे. निसर्ग स्वत:चे संवर्धन स्वत: करतो. त्यात आपले नाक खुपसू नये.

- डॉ. किरण पुरंदरे, पक्षितज्ज्ञ

-------------

सह्याद्रीचे बनली बेटे

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अनेकजण जागा घेऊन घरं बांधत आहेत. आपण मिळून सह्याद्रीची ‘वाट’ लावली. सह्याद्रीची बेटे झाली आहेत. स्थानिक लोकांना विश्वास घेऊन निसर्ग संवर्धन करायला हवे, सह्याद्री वाचवायला हवा, अशी भावना पुरंदरे यांनी व्यक्त केली.