शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

माणसं नव्हे पक्षी तयार करता जंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:10 IST

पुणे : पक्षी का वाचवायचे असतात, तर ते जंगलं निर्माण करतात म्हणून. ते अनेक बिया खातात. त्यांच्या पोटातील पाचक ...

पुणे : पक्षी का वाचवायचे असतात, तर ते जंगलं निर्माण करतात म्हणून. ते अनेक बिया खातात. त्यांच्या पोटातील पाचक रस त्या बियांना चिकटतो आणि त्या बिया विष्ठेतून बाहेर पडतात. त्या मातीत चांगल्या रुजतात आणि त्यामुळे झाडे वाढतात. अशा प्रकारे अनेक जंगले हे पक्षी तयार करतात, माणसं जंगल निर्माण करू शकत नाहीत. त्यामुळे पक्ष्यांचे या निसर्गातील स्थान महत्त्वाचे आहे, असे मत ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. किरण पुरंदरे यांनी व्यक्त केले.

इन्वॉयरमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेतर्फे दर शनिवारी पर्यावरणीय वेबिनार आयोजित केले जाते. त्यामध्ये पक्षितज्ज्ञ डॉ. किरण पुरंदरे यांचे ‘नागझिरा जंगलातून’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी या वेळी नागझिरा जंगलातील पक्ष्यांविषयीची माहिती आणि त्यांचे आवाज काढून दाखवले. वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य अनुज खरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

पुरंदरे म्हणाले, ‘‘नागझिऱ्याच्या जंगलात सुमारे ३०० प्रकारचे पक्षी दिसतात. राज्यातील पक्ष्यांपैकी ५० टक्क्यांहून अधिक पक्षी या जंगलात आहेत. या पक्ष्यांना जंगलात पाहणे आनंददायी क्षण असतो. कोणताच पक्षी किंवा प्राणी पिंजऱ्यात ठेवू नये. त्यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे. अनेक तारांकित पोपट पिंजऱ्यात ठेवले जातात.’’

——————————-

सहा झाडे महत्त्वाची

पुणे, सोलापूर, सातारा रस्त्यावर पूर्वी वडाची झाडे होती. ती तोडली गेली. पळस, पांगारा, काटेसावर, वड, पिंपळ, उंबर ही झाडे महत्त्वाची आहेत. अन्न, फळं देणारी आहेत. ती लावली पाहिजे. पक्षी, प्राण्यांना ही झाडे फळे देतात. त्यामुळे या वृक्षांना वटवृक्ष, आधारवड असे संबोधले जाते.

------------

माळरानांवर वृक्षारोपण चुकीचे

माळरानांवर वृक्षारोपण केले आहे. हे चुकीचे आहे. कुठं झाडं लावायची ते समजले पाहिजे. निसर्ग संवर्धन करण्यासाठी तो समजून घेतला पाहिजे. तरच त्याचे संरक्षण करता येईल. पण आपण काहीच करायचे नाही, हा एक चांगला मार्ग आहे. निसर्ग स्वत:चे संवर्धन स्वत: करतो. त्यात आपले नाक खुपसू नये.

- डॉ. किरण पुरंदरे, पक्षितज्ज्ञ

-------------

सह्याद्रीचे बनली बेटे

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अनेकजण जागा घेऊन घरं बांधत आहेत. आपण मिळून सह्याद्रीची ‘वाट’ लावली. सह्याद्रीची बेटे झाली आहेत. स्थानिक लोकांना विश्वास घेऊन निसर्ग संवर्धन करायला हवे, सह्याद्री वाचवायला हवा, अशी भावना पुरंदरे यांनी व्यक्त केली.