शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
2
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
3
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
4
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
5
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
6
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
7
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
8
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
9
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
10
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
11
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
12
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
13
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
14
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
15
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
16
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
17
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
18
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
19
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
20
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
Daily Top 2Weekly Top 5

माणसं नव्हे पक्षी तयार करता जंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:10 IST

पुणे : पक्षी का वाचवायचे असतात, तर ते जंगलं निर्माण करतात म्हणून. ते अनेक बिया खातात. त्यांच्या पोटातील पाचक ...

पुणे : पक्षी का वाचवायचे असतात, तर ते जंगलं निर्माण करतात म्हणून. ते अनेक बिया खातात. त्यांच्या पोटातील पाचक रस त्या बियांना चिकटतो आणि त्या बिया विष्ठेतून बाहेर पडतात. त्या मातीत चांगल्या रुजतात आणि त्यामुळे झाडे वाढतात. अशा प्रकारे अनेक जंगले हे पक्षी तयार करतात, माणसं जंगल निर्माण करू शकत नाहीत. त्यामुळे पक्ष्यांचे या निसर्गातील स्थान महत्त्वाचे आहे, असे मत ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. किरण पुरंदरे यांनी व्यक्त केले.

इन्वॉयरमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेतर्फे दर शनिवारी पर्यावरणीय वेबिनार आयोजित केले जाते. त्यामध्ये पक्षितज्ज्ञ डॉ. किरण पुरंदरे यांचे ‘नागझिरा जंगलातून’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी या वेळी नागझिरा जंगलातील पक्ष्यांविषयीची माहिती आणि त्यांचे आवाज काढून दाखवले. वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य अनुज खरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

पुरंदरे म्हणाले, ‘‘नागझिऱ्याच्या जंगलात सुमारे ३०० प्रकारचे पक्षी दिसतात. राज्यातील पक्ष्यांपैकी ५० टक्क्यांहून अधिक पक्षी या जंगलात आहेत. या पक्ष्यांना जंगलात पाहणे आनंददायी क्षण असतो. कोणताच पक्षी किंवा प्राणी पिंजऱ्यात ठेवू नये. त्यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे. अनेक तारांकित पोपट पिंजऱ्यात ठेवले जातात.’’

——————————-

सहा झाडे महत्त्वाची

पुणे, सोलापूर, सातारा रस्त्यावर पूर्वी वडाची झाडे होती. ती तोडली गेली. पळस, पांगारा, काटेसावर, वड, पिंपळ, उंबर ही झाडे महत्त्वाची आहेत. अन्न, फळं देणारी आहेत. ती लावली पाहिजे. पक्षी, प्राण्यांना ही झाडे फळे देतात. त्यामुळे या वृक्षांना वटवृक्ष, आधारवड असे संबोधले जाते.

------------

माळरानांवर वृक्षारोपण चुकीचे

माळरानांवर वृक्षारोपण केले आहे. हे चुकीचे आहे. कुठं झाडं लावायची ते समजले पाहिजे. निसर्ग संवर्धन करण्यासाठी तो समजून घेतला पाहिजे. तरच त्याचे संरक्षण करता येईल. पण आपण काहीच करायचे नाही, हा एक चांगला मार्ग आहे. निसर्ग स्वत:चे संवर्धन स्वत: करतो. त्यात आपले नाक खुपसू नये.

- डॉ. किरण पुरंदरे, पक्षितज्ज्ञ

-------------

सह्याद्रीचे बनली बेटे

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अनेकजण जागा घेऊन घरं बांधत आहेत. आपण मिळून सह्याद्रीची ‘वाट’ लावली. सह्याद्रीची बेटे झाली आहेत. स्थानिक लोकांना विश्वास घेऊन निसर्ग संवर्धन करायला हवे, सह्याद्री वाचवायला हवा, अशी भावना पुरंदरे यांनी व्यक्त केली.