शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

आळंदीच्या पाणीप्रश्नासाठी जलसंपदाकडे पाठपुरावा !

By admin | Updated: March 4, 2015 23:37 IST

आळंदीच्या पाणीप्रश्नाबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली.

पुणे : आळंदीच्या पाणीप्रश्नाबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. भामा आसखेडमधून पुण्याला जाणाऱ्या पाइपलाइनमधून पाणी मिळण्यासाठी ‘जेएनएनआरयूएम’ व जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करून मंजुरी मिळवू, असे सांगितले. आळंदीच्या पाणीप्रश्नाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे महापालिका, पिंपरी महापालिका व आळंदी नगरपरिषद यांची बैठक झाली. या बैठकीला पुणे महापालिकेचे महापौर दत्तात्रय धनकवडे, कार्यकारी अभियंता गेडाम, पिंपरी महापालिकेचे नगरअभियंता कांबळे, आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, नगरसेवक राजेंद्र गिलबिले, प्रदीप नवले, रमेश गोगावले, मुख्याधिकारी विनायक औंधकर, वारकरी प्रतिनिधी राजाभाऊ चौपदार आदी उपस्थित होते. पुणे महानगरपालिकेने आळंदी नगरपालिकेला काही मुद्दे उपस्थित करून, आळंदीला या पाइपलाइनमधून पाणी देता येऊ शकत नसल्याचे कळविले आहे. ते मुद्दे आळंदी नगरपालिकेने या वेळी खोडून काढले. मुळात भामा आसखेडमधून आळंदीसाठी 0.१५ टक्के पाणी राखीव आहे. पुणे महापालिकेने पाणी दिल्यास वाढीव कोटा म्हणून त्यांना पाणी मिळेल. आळंदी हे तीर्थक्षेत्र व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने, विशेष बाब म्हणून पाणी देण्यासाठी सरकारकडे प्रयत्न केला जावा. तसेच, प्रस्तूत पाइपलाइनमधून पाणी तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. मात्र, पुण्यासाठी १६00 एम. एम. व्यासाच्या पाइपलाइन पाणी वाहून नेणार आहे. मात्र, कमी व्यासाच्या पाइपलाइनमधून नियंत्रित वॉल्व्हद्वारे मीटर लावून आळंदीत पाणी दिल्यास कुठलाही अडथळा येऊ शकत नसल्याचे सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या परवानगीसाठी प्रयत्न करू, असे सांगत, तांत्रिक मुद्यांचा विचार करून पाणी देता येईल का, याबाबत पुणे महापालिकेने विचार करावा. पुन्हा याबाबत बैठक घेऊ, असे सांगितले. (प्रतिनिधी)तर रस्त्यावर उतरू४बैठकीत रोहिदास तापकीर व राजाभाऊ चौपदार यांनी ठोस भूमिका घेत, ‘जर आम्हाला पाणी मिळाले नाही, तर पाइपलाइनचे काम होऊ देणार नाही. तसेच आळंदीकर नागरिक व वारकरी रस्त्यावर उतरतील,’ असा इशारा दिला.