शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी आवर्तनावर भरारी पथकाची ‘नजर’

By admin | Updated: November 20, 2015 02:45 IST

नीरा डावा कालव्यातून १४ नोव्हेंबरपासून रब्बी आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र, अल्प पर्जन्यमानामुळे वीर, भाटघर धरणातील पाणीपातळी कमालीची घटली आहे.

बारामती : नीरा डावा कालव्यातून १४ नोव्हेंबरपासून रब्बी आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र, अल्प पर्जन्यमानामुळे वीर, भाटघर धरणातील पाणीपातळी कमालीची घटली आहे. यामुळे या आवर्तनाावर पाटबंधारे विभागाने कडक नियंत्रण ठेवण्याचे ठरविले असून भरारी पथकाची ‘नजर’ ठेवण्यात येणार आहे. जुलैै २०१६ अखेर पिण्यासाठी व मंजूर औद्योगिक वापरासाठी पाणी राखून नियोजन करण्यात आले आहे. पाणीचोरी करणाऱ्या शेतकऱ्यांवर सुरुवातीपासून नजर ठेवण्यात येणार आहे. चोरून पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांना सुरुवातीला समज देण्यात आली आहे. कालवा निरीक्षक, पाटकरी यांच्यामार्फत समज देण्यात आली आहे. गरज भासल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब भोसले, शाखाधिकारी शंकरराव चौलंग आदींचा भरारी पथकामध्ये समावेश आहे. कालव्यात पाणी सोडण्यापूर्वी भरारी पथकाने पाहणी करून सायफन काढले आहेत. पिण्याचे पाणी महिन्यातून तीन दिवस पोलीस बंदोबस्तात सोडण्यात येणार आहे. नीरा-डावा कालव्यावर बारामती शहरासह १० मोठ्या पाणीपुरवठा योजना अवलंबून असल्याचे पाटबंधारे खात्याचे उपविभागीय अधिकारी भोसले, शाखा अधिकारी चौलंग यांनी सांगितले.या आवर्तनानंतर १ एप्रिल २०१६ ला उन्हाळी आवर्तन देण्यात येणार आहे. मात्र, या आवर्तनाचा कालावधी उपलब्ध पाणीसाठ्यावर अवलंबून आहेत. (वार्ताहर)इंदापूरच्या २२ गावांंना लवकर पाणी द्या!वितरिका क्रमांक ४९, ५७, ५४ मोठ्या आहेत. त्यामुळे येथील क्षेत्र भिजण्यासदेखील वेळ जातो. परिणामी, या परिसरातून इंदापूर तालुक्यातील २२ गावांना नेहमी उशिरा पाणी मिळते. तोपर्यंत पिके जळून जातात. धरणात पाणीपातळी भरपूर आहे. ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा धरणात आहे. त्यामुळे २२ गावांतील शेतकऱ्यांना लवकरात लवकर पाणी द्यावे, अशी मागणी शेतकरी संघर्ष कृती समितीचे नेते सूर्यकांत रणवरे यांनी केली आहे.